शहरं
Join us  
Trending Stories
1
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
2
Mumbai Rains: २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले
3
भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी; अनेक नेत्यांवर जबाबदारी
4
आजचे राशीभविष्य १ जानेवारी २०२६ : नववर्षाचा पहिला दिवस 'या' राशींसाठी ठरणार लाभदायी; वाचा १२ राशींचे सविस्तर भविष्य
5
'नाराज'कीय वातावरण तापले! निष्ठावंतांचा संताप कायम; मंत्री सावेंच्या कारला काळं फासण्याचा प्रयत्न, कराडांना घेराव, पदाधिकाऱ्याच्या कानशिलात
6
नाशिक-अक्कलकोट कॉरिडॉरला हिरवा कंदील, १७ तासांचा प्रवास आणि २०१ किमीचे अंतर वाचणार
7
आजपासून नेमके काय बदलणार? एलपीजी, सीएनजी स्वस्त? पीएफच्या नियमांत मोठे बदल!
8
टीव्ही-फ्रिजसह अनेक उपकरणांवर आजपासून ‘रेटिंग’ बंधनकारक, केंद्र सरकारचा मोठा निर्णय; वीज, इंधनाची होणार बचत
9
मुंबईत रिपब्लिकन पक्षाला १७ ऐवजी १२ जागा : आठवले
10
अल्प बचत योजनांचे व्याजदर सलग सातव्यांदा ‘जैसे थे’च
11
मराठी भाषा ही मराठी माणसांनीच वाचवली पाहिजे! संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांची स्पष्टोक्ती
12
मीरारोड मध्ये नाराज माजी भाजपा नगरसेवकाने उभे केले अपक्षांचे पॅनल 
13
सदानंद दाते राज्याचे नवे पोलिस महासंचालक, असा आहे आतापर्यंतचा कार्यकाळ
14
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
15
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
16
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
17
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
18
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
19
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
20
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

लासलगाव - १९८५ नंतर प्रथमच गोणीसह कांदा लिलाव

By admin | Updated: July 26, 2016 16:56 IST

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत १९८५ नंतर व्यापारीवर्गाच्या मागणीमुळे प्रथमच गोणीसह कांदा लिलाव मंगळवार पासून सुरु झाला आहे

ऑनलाइन लोकमत

नाशिक, दि. २६  :- लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत १९८५ नंतर व्यापारीवर्गाच्या मागणीमुळे प्रथमच गोणीसह कांदा लिलाव मंगळवार पासून सुरु झाला आहे . यावेळी बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांच्या हस्ते कांदा गोण्यांचे पूजन करण्यात आले .यावेळी सदस्य सचिन ब्रम्हेचा ,रमेश पालवे, सचिव बी.वाय.होळकर , व्यापारी ओमप्रकाश राका, नितीन जैन ,रमेश शिंदे , वाल्मीकराव जाधव , राठी ,राहुल बरडिया ,संतोष माठा ,उपस्थित होते . बाजार समितीत शेतक-यांनी वाहनातून कांदा १७८६ गोणीत आणला होता .त्या कांद्याला जास्तीजास्त ९५२ रुपये ,सरासरी ८४४ रुपये तर कमीतकमी ४०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला .

रविवारी मनमाड येथे झालेल्या बैठकीत व्यापा-यांनी शेतक-यांकडून अडत न घेता इतर जिल्ह्यातून कांदा गोणीत लिलावासाठी येत असल्याने नाशिक जिल्ह्यातून हि शेतक-यांनी कांदा हा गोणीत आणावा हा निर्णय घेतल्यानंतर मंगलवारी लासलगाव कृषी उत्पन्न समितीत गोणीत कांदा आणत १७ दिवसानंतर लिलाव पूर्ववत सुरु झाला आहे .

दोन आठवड्यांपासून बाजार समितीत कांद्याचे लिलाव बंद असल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला होता . दरम्यान कांदा व्यापा-यांनी सुरु केलेला संप मागे घेतल्याने शेतक-यांच्या आशा पल्लवित झाल्या असल्या तरी गोणी पद्धतीने कांदा लिलाव सुरु करण्याचा निर्णय व्यापा-यांनी घेतल्याने शेतक-यांची घोर निराशा झाली .यामुळे शेतक-यांचा खर्च अडीचपट वाढणार आहे .पूर्वीच्याच लिलाव पद्धतीने व्यापा-यांनी कांदा लिलाव सुरु करावा अशी मागणी बाजार समितीत शेतकरी करताना दिसत होते .

यापुढे अडत हि कांदा खरेदीदारांकडून वसूल केली जाणार असली तरी व्यापा-यांनी गोनी पद्धतीने कांदा लिलाव करण्याचा निर्णय घेतल्याने कांदा निवड करून गोणीत भरून आणावा लागणार असल्याने मजुरी व नवीन कांदा बारदान गोनी विकत घ्यावी लागणार आहे यामुळे शेतक-यांना क्विंटलमागे ९० ते १०० रुपये अतिरिक्त खर्च येणार असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे .व्यापा-यांना होणार हा फायदा ......प्रतवारी केलेला कांदा मिळणार . मजूरवर्ग लागणार नाही . कांद्यासाठी गोण्या लागणार नाही . बाजार समितीतून कांद्याचा लिलाव झाल्याबरोबर गाडी भरून पाठविल्यास होणार आर्थिक फायदा .हे होणार शेतकरीवर्गाचे नुकसान .......कांदा प्रतवारीसाठी मजुरी वर खर्च कांद्यासाठी गोणी वर खर्च. शासनाने हस्तक्षेप करत गोणी पद्धत बंद करावी ........

जयदत्त होळकर शेतक-यांनी कांदा गोणीत भरून आणल्यास त्याचा लिलाव करण्यात येईल व शेतक-यांकडून अडत घेतली जाणार नाही अशी व्यापा-यांनी भूमिका घेतली असल्याने यात शासनाने हस्तक्षेप करत पूर्वीप्रमाणे खुल्या पद्धतीने लिलाव सुरु करावे .