शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

लासलगाव - १९८५ नंतर प्रथमच गोणीसह कांदा लिलाव

By admin | Updated: July 26, 2016 16:56 IST

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत १९८५ नंतर व्यापारीवर्गाच्या मागणीमुळे प्रथमच गोणीसह कांदा लिलाव मंगळवार पासून सुरु झाला आहे

ऑनलाइन लोकमत

नाशिक, दि. २६  :- लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत १९८५ नंतर व्यापारीवर्गाच्या मागणीमुळे प्रथमच गोणीसह कांदा लिलाव मंगळवार पासून सुरु झाला आहे . यावेळी बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांच्या हस्ते कांदा गोण्यांचे पूजन करण्यात आले .यावेळी सदस्य सचिन ब्रम्हेचा ,रमेश पालवे, सचिव बी.वाय.होळकर , व्यापारी ओमप्रकाश राका, नितीन जैन ,रमेश शिंदे , वाल्मीकराव जाधव , राठी ,राहुल बरडिया ,संतोष माठा ,उपस्थित होते . बाजार समितीत शेतक-यांनी वाहनातून कांदा १७८६ गोणीत आणला होता .त्या कांद्याला जास्तीजास्त ९५२ रुपये ,सरासरी ८४४ रुपये तर कमीतकमी ४०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला .

रविवारी मनमाड येथे झालेल्या बैठकीत व्यापा-यांनी शेतक-यांकडून अडत न घेता इतर जिल्ह्यातून कांदा गोणीत लिलावासाठी येत असल्याने नाशिक जिल्ह्यातून हि शेतक-यांनी कांदा हा गोणीत आणावा हा निर्णय घेतल्यानंतर मंगलवारी लासलगाव कृषी उत्पन्न समितीत गोणीत कांदा आणत १७ दिवसानंतर लिलाव पूर्ववत सुरु झाला आहे .

दोन आठवड्यांपासून बाजार समितीत कांद्याचे लिलाव बंद असल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला होता . दरम्यान कांदा व्यापा-यांनी सुरु केलेला संप मागे घेतल्याने शेतक-यांच्या आशा पल्लवित झाल्या असल्या तरी गोणी पद्धतीने कांदा लिलाव सुरु करण्याचा निर्णय व्यापा-यांनी घेतल्याने शेतक-यांची घोर निराशा झाली .यामुळे शेतक-यांचा खर्च अडीचपट वाढणार आहे .पूर्वीच्याच लिलाव पद्धतीने व्यापा-यांनी कांदा लिलाव सुरु करावा अशी मागणी बाजार समितीत शेतकरी करताना दिसत होते .

यापुढे अडत हि कांदा खरेदीदारांकडून वसूल केली जाणार असली तरी व्यापा-यांनी गोनी पद्धतीने कांदा लिलाव करण्याचा निर्णय घेतल्याने कांदा निवड करून गोणीत भरून आणावा लागणार असल्याने मजुरी व नवीन कांदा बारदान गोनी विकत घ्यावी लागणार आहे यामुळे शेतक-यांना क्विंटलमागे ९० ते १०० रुपये अतिरिक्त खर्च येणार असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे .व्यापा-यांना होणार हा फायदा ......प्रतवारी केलेला कांदा मिळणार . मजूरवर्ग लागणार नाही . कांद्यासाठी गोण्या लागणार नाही . बाजार समितीतून कांद्याचा लिलाव झाल्याबरोबर गाडी भरून पाठविल्यास होणार आर्थिक फायदा .हे होणार शेतकरीवर्गाचे नुकसान .......कांदा प्रतवारीसाठी मजुरी वर खर्च कांद्यासाठी गोणी वर खर्च. शासनाने हस्तक्षेप करत गोणी पद्धत बंद करावी ........

जयदत्त होळकर शेतक-यांनी कांदा गोणीत भरून आणल्यास त्याचा लिलाव करण्यात येईल व शेतक-यांकडून अडत घेतली जाणार नाही अशी व्यापा-यांनी भूमिका घेतली असल्याने यात शासनाने हस्तक्षेप करत पूर्वीप्रमाणे खुल्या पद्धतीने लिलाव सुरु करावे .