शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

रायगड-रत्नागिरीच्या समुद्र किनारी मोठ्या प्रमाणात स्टिंगरे मासे, हवामान बदलांचा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2017 16:31 IST

रायगड जिल्ह्यातील नवगाव, वरसोली, सासवणे, मांडवा, सारळ तर रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली समुद्र किनारी मोठय़ा प्रमाणात स्टिंगरे अर्थात पाकट आणि अन्य काही प्रकारचे मासे शनिवारी-रविवारी अचानक येवून थडकल्याने किनारी भागातील कोळी बांधवांमध्ये मोठे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

 - जयंत धुळपअलिबाग - रायगड जिल्ह्यातील नवगाव, वरसोली, सासवणे, मांडवा, सारळ तर रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली समुद्र किनारी मोठय़ा प्रमाणात स्टिंगरे अर्थात पाकट आणि अन्य काही प्रकारचे मासे शनिवारी-रविवारी अचानक येवून थडकल्याने किनारी भागातील कोळी बांधवांमध्ये मोठे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. अलिबाग तालुक्यांतील नवगाव, वरसोली, सासवणे, मांडवा, सारळ या समुद्र किना:यांवर हे मासे आढळून आल्याच्या पाश्र्वभूमीवर सोमवारी मुंबईतील सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिटय़ुटच्या सागरी तज्ज्ञांच्या पथकाने नवगाव येथील समुद्र किना-यांची पाहणी केली. समुद्र तळाला होणारे भौतिक बदल त्याच बरोबर हवामानातील बदल यामुळे हे मासे किना-याकडे आले आहेत. मान्सून समाप्तीच्या वेळी अशा प्रकारे हवामानातील बदल खोल समुद्रात होवू शकता. सागरी प्रदूषणामूळे हे घडलेले नसल्याचे सकृतदर्शनी दिसून येत आहे. माशांचे नमुने घेण्यात आले असून, प्रय़ोगशाळेतील तपासणी अंती अंतिम निष्कर्ष सांगता येईल अशी माहिती  सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिटय़ुटचे संचालक तथा सागरी तज्ज्ञ डॉ.वीरेंद्र सिंग यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.

    रायगड जिल्ह्यातील या किना-यांवर शनिवारी व रविवारी काही ठिकाणी हे मासे दिसून आल्यावर, त्या बाबतची खातरजमा करण्याकरिता सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिटय़ुटला कळविण्यात आले होते. सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिटय़ुटचे संचालक तथा सागरी तज्ज्ञ डॉ.विरेंद्र सिंग व डॉ.रामकुमार आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अलिबाग क्षेत्रीय अधिकारी एम.बी.वाघमारे यांनी नवगांव येथे सत्वर भेट देवून हि पहाणी केली. सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिटय़ुटचा अधिकृत अहवाल येत्या काही दिवसात प्राप्त होईल, अशी माहिती मत्स्य विभागाचे उपायुक्त अविनाश नाखवा यांनी दिली.

    २० ते २५ किलोचा एक स्टींगरे ५०० ते ७०० रूपयांर्पयत विकला जात होता. तर कोळंबी ४० ते ५० रूपये किलो प्रमाणो विकली जात होती. त्यामुळे स्थानिक कोळी बांधव विक्रीमूळे तर खवय्ये मासे खाण्यास मिळाल्याने सुखावले होते.