शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका
3
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
4
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
5
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
6
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
7
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
8
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
9
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
10
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
11
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
12
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
13
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
14
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
15
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
16
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
17
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
18
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
19
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
20
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख

रायगड-रत्नागिरीच्या समुद्र किनारी मोठ्या प्रमाणात स्टिंगरे मासे, हवामान बदलांचा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2017 16:31 IST

रायगड जिल्ह्यातील नवगाव, वरसोली, सासवणे, मांडवा, सारळ तर रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली समुद्र किनारी मोठय़ा प्रमाणात स्टिंगरे अर्थात पाकट आणि अन्य काही प्रकारचे मासे शनिवारी-रविवारी अचानक येवून थडकल्याने किनारी भागातील कोळी बांधवांमध्ये मोठे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

 - जयंत धुळपअलिबाग - रायगड जिल्ह्यातील नवगाव, वरसोली, सासवणे, मांडवा, सारळ तर रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली समुद्र किनारी मोठय़ा प्रमाणात स्टिंगरे अर्थात पाकट आणि अन्य काही प्रकारचे मासे शनिवारी-रविवारी अचानक येवून थडकल्याने किनारी भागातील कोळी बांधवांमध्ये मोठे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. अलिबाग तालुक्यांतील नवगाव, वरसोली, सासवणे, मांडवा, सारळ या समुद्र किना:यांवर हे मासे आढळून आल्याच्या पाश्र्वभूमीवर सोमवारी मुंबईतील सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिटय़ुटच्या सागरी तज्ज्ञांच्या पथकाने नवगाव येथील समुद्र किना-यांची पाहणी केली. समुद्र तळाला होणारे भौतिक बदल त्याच बरोबर हवामानातील बदल यामुळे हे मासे किना-याकडे आले आहेत. मान्सून समाप्तीच्या वेळी अशा प्रकारे हवामानातील बदल खोल समुद्रात होवू शकता. सागरी प्रदूषणामूळे हे घडलेले नसल्याचे सकृतदर्शनी दिसून येत आहे. माशांचे नमुने घेण्यात आले असून, प्रय़ोगशाळेतील तपासणी अंती अंतिम निष्कर्ष सांगता येईल अशी माहिती  सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिटय़ुटचे संचालक तथा सागरी तज्ज्ञ डॉ.वीरेंद्र सिंग यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.

    रायगड जिल्ह्यातील या किना-यांवर शनिवारी व रविवारी काही ठिकाणी हे मासे दिसून आल्यावर, त्या बाबतची खातरजमा करण्याकरिता सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिटय़ुटला कळविण्यात आले होते. सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिटय़ुटचे संचालक तथा सागरी तज्ज्ञ डॉ.विरेंद्र सिंग व डॉ.रामकुमार आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अलिबाग क्षेत्रीय अधिकारी एम.बी.वाघमारे यांनी नवगांव येथे सत्वर भेट देवून हि पहाणी केली. सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिटय़ुटचा अधिकृत अहवाल येत्या काही दिवसात प्राप्त होईल, अशी माहिती मत्स्य विभागाचे उपायुक्त अविनाश नाखवा यांनी दिली.

    २० ते २५ किलोचा एक स्टींगरे ५०० ते ७०० रूपयांर्पयत विकला जात होता. तर कोळंबी ४० ते ५० रूपये किलो प्रमाणो विकली जात होती. त्यामुळे स्थानिक कोळी बांधव विक्रीमूळे तर खवय्ये मासे खाण्यास मिळाल्याने सुखावले होते.