शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मनातील दिवा पेटलेला असावा

By admin | Updated: January 4, 2016 03:07 IST

‘लाल दिवा ही फार छोटी गोष्ट आहे. अनेक लोक पंधरा-पंधरा वर्षे लाल दिवा लावून फिरले. मात्र, काहीच करू शकले नाही. त्यामुळे मनातला लाल दिवा पेटला पाहि

पुणे : ‘लाल दिवा ही फार छोटी गोष्ट आहे. अनेक लोक पंधरा-पंधरा वर्षे लाल दिवा लावून फिरले. मात्र, काहीच करू शकले नाही. त्यामुळे मनातला लाल दिवा पेटला पाहिजे. गाडीचा लाल दिवा पेटून चालणार नाही. ज्याच्या मनातील लाल दिवा पेटतो तेच परिवर्तन करू शकतात. सदाभाऊ खोत यांच्या मनातील दिवा पेटलेला आहे. त्यामुळे ते निश्चित परिवर्तन करून दाखवतील, असे सांगत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक प्रकारे खोत यांना मंत्रीपद मिळणार नसल्याचे सुतोवाच केले.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्या ‘बळीचा आक्रोश’ या पुस्तकाचे प्रकाशन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास गृहराज्यमंत्री राम शिंदे, स्वाभिमानी शेतकरी संघटने अध्यक्ष खासदार राजू शेट्टी, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी, ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद देशमुख, चित्रपट निर्माते कैलास वाणी आदी उपस्थित होते. समारंभात सदाभाऊ खोत यांच्या कार्याचे फडणवीस यांनी कौतुक केले. त्यावेळी सभागृहातील खोत यांच्या एका समर्थकाने ‘लाल दिवा कधी?’ असा प्रश्न विचारला. त्यावर फडणवीस म्हणाले, ‘खोत यांच्यासारख्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या लोकांची आम्हाला गरज आहे. लाल दिवा फार छोटी गोष्ट आहे. मनातला दिवा पेटतो, तोच परिवर्तन घडवून आणू शकतो. खोत यांच्या अनुभवाचा आम्हाला नक्कीच फायदा होईल.’ फडणवीस यांच्या या सूचक वक्तव्यामुळे सदाभाऊ खोत यांना मंत्रीपदासाठी आणखी काही दिवस वाट पहावी लागणार असल्याची चर्चा सभागृहात सुरू झाली. खोत आमच्यात आले, तर शेतकऱ्यांना दिशा आणि त्यांची दशा दाखविण्याचे काम कोण करणार, असा मार्मिक सवाल करत, दानवे यांनीही खोतांच्या उत्साहावर विरजण टाकले. (प्रतिनिधी)नागपूर : शक्ती असलेली व्यक्ती जगण्याची लढाई सहज जिंकते. मात्र, दुर्बलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाजाला त्यांची शक्ती बनावे लागेल. त्यांना उभे करावे लागेल, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केले.पुणे सेवासदन सोसायटी नागपूरतर्फे यावर्षीपासून सुरू करण्यात आलेला रमाबाई रानडे स्मृती शिक्षण प्रबोधन पुरस्कार ‘संज्ञा संवर्धन संस्था, नागपूर’ या संस्थेला देण्यात आला. अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेश्वर उत्तरवार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सरकारमध्ये चांगले काम करणाऱ्यांना बक्षीस व वाईट काम करणाऱ्यांना शिक्षा मिळत नाही, पण समाजात नेहमी चांगले काम करणाऱ्यांचा गौरव होतो. महिलांना बरोबरीने जगता यावे, त्यांना शिक्षणाची संधी मिळावी, यासाठी रमाबाई रानडे यांनी या कामाची सुरुवात केल्याचे सांगून कोणत्याही क्षेत्रात स्त्री-पुरुष या आधारावर मूल्यमापन होऊ नये, असे मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.सेवासदनने विद्यार्थ्यांच्या विकासासाठी स्वत:ला वाहून घेतले, पण काही संस्था खूप डोनेशन घेतात. एक प्रकारे पार्टनरशीप सुरू आहे. शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण व्हावे, पण व्यापारीकरण होऊ नये, शिक्षणाचे दुकान होऊ नये, अशी अपेक्षा गडकरी यांनी व्यक्त केली.