शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

‘लालपरी’ला मिळाली ‘शिवशाही’ची साथ, उन्हाळी सुट्टीनिमित्त ९०० विशेष एसटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 03:29 IST

उन्हाळी सुट्टीनिमित्त गावी जाण्यासाठी नागरिकांची प्रथम पसंती एसटी महामंडळाला असते. यानुसार महामंडळाने १५ एप्रिल ते १५ मे या कालावधीत राज्यभर ९०० विशेष एसटी चालवण्यास सुरुवात केली आहे.

- महेश चेमटेमुंबई : उन्हाळी सुट्टीनिमित्त गावी जाण्यासाठी नागरिकांची प्रथम पसंती एसटी महामंडळाला असते. यानुसार महामंडळाने १५ एप्रिल ते १५ मे या कालावधीत राज्यभर ९०० विशेष एसटी चालवण्यास सुरुवात केली आहे. तसेच वातानुकूलित शिवशाहीच्या पहिल्या टप्प्यातील तब्बल ७०० शिवशाही महामंडळाच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. यामुळे प्रवाशांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या एसटीला ‘लालपरी’सह ‘शिवशाही’चीदेखील साथ मिळाल्याने प्रवाशांना दिलासा मिळत आहे.महामंडळाच्या नियमांप्रमाणे १५ एप्रिल ते १५ मे हा तीस दिवसांचा काळ साधारणपणे प्रवासी गर्दीचा काळ मानला जातो. या कालावधीत उन्हाळी विशेष फेऱ्या चालवण्याचे नियोजन महामंडळाचे असते. यानुसार सद्य:स्थितीत आंतरप्रादेशिक मार्गावर आणि ३१६ एसटी, मुंबई-पुणे प्रदेशांतर्गत प्रत्येकी ३१६ जादा एसटी सुरू आहेत. त्याचबरोबर विदर्भात १०४ एसटी, मराठवाड्यात ११७ आणि खानदेश भागात ९७ एसटी उन्हाळी विशेष (जादा) म्हणून सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र एकीकडे जादा एसटीच्या विशेष फेºयांनी प्रवासी सुखावले असले तरी दुसरीकडे महामंडळाच्या योजनेचा ‘एसटीचे तिकीट दाखवा, ३० रुपयांत चहा-नाष्टा मिळवा’ या योजनेचा बोजवारा उडाल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. यामुळे विशेष एसटीसह महामंडळाने अधिकृत हॉटेल थांब्यावरदेखील या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचे मत प्रवाशांनी व्यक्त केले.विक्रमी उत्पन्नाची आशाउन्हाळी सुट्टीनिमित्त महामंडळाने राज्यभर सुमारे ९०० जादा एसटी चालवण्याचा निर्णय घेतला. एका एसटीमध्ये आसन क्षमता सरासरी ५० असते. १५ एप्रिल ते १५ मे या काळात लग्नाचे १७ मुहूर्त आहेत. लग्नसराईसाठी वातानुकूलित शिवशाहीदेखील योग्य दराने मिळत असल्याने महामंडळाला यंदाच्या उन्हाळी सुट्टीमधून विक्रमी उत्पन्नाची आशा आहे.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ