शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
4
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
5
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
6
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
7
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
8
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
9
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
10
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
11
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
12
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
13
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
14
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
15
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
16
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
17
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
18
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

लक्ष्मीच्या पावलांनी लेकीचे स्वागत

By admin | Updated: October 27, 2015 00:04 IST

राज्यात पहिला उपक्रम : मुलगी झाल्यास प्रसूती मोफत, चांगला प्रतिसाद

भीमगोंडा देसाई -- कोल्हापूर येथील जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या ‘लक्ष्मीचे पाऊल’ उपक्रमामुळे ‘बेटी बचाओ’ चळवळीला बळ मिळत आहे. मुलगी झाल्यास मोफत प्रसूती सेवा दिली जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात या चळवळीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशा प्रकारचा उपक्रम राबविणारी कोल्हापूर जिल्हा परिषद ही राज्यातील पहिली असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. ‘मुलगाच वंशाचा दिवा’ या भ्रामक समजुतीमुळे स्त्री-भ्रूणहत्येचे प्रमाण वाढते आहे. त्यामुळेच मुलींची संख्या कमी होत आहे. समाजात त्याचा गंभीर परिणाम जाणवत आहे. सर्वच घटकांतून ‘मुलगी वाचवा’ अभियान राबविले जात आहे. विविध प्रकारे मुलींच्या जन्माचे स्वागत केले जात आहे. शासन व प्रशासनाच्या स्तरावरून जाणीवपूर्वक, नियोजनबद्धरीत्या विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. सेव्ह द बेबी गर्ल, बेटी बचाओ-बेटी पढाओ या अभियानांतर्गत जागृृती केली जात आहे. ‘लेक वाचवा’ अभियानांतर्गत मुलींंच्या जन्माचे प्रमाण वाढविण्यासाठी रुग्णालयीन प्रसूतीचे प्रमाण वाढविणे, बालमृत्यू, मातामृत्यूचे प्रमाण कमी करणे यासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेतर्फे दोन महिन्यांपासून ‘लक्ष्मीचे पाऊल’ हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमातून वैद्यकीय सेवा देण्यासाठी जिल्ह्यातील आठ रुग्णालयांची निवड केली आहे. संबंधित रुग्णालयात नैसर्गिक प्रसूतीद्वारे मुलगी झाली तर सर्व सेवा मोफत आहेत. मुलगा झाला तर फक्त एक हजार रुपये शुल्क आकारण्यात येते. सिझेरियन शस्त्रक्रिया झाल्यास औषधे व सर्व उपचारांसह ४ हजार ५०० रुपये घेतले जातात. जननी सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना मोफत वाहनसेवा देण्यात येते. जोखमीच्या गरोदर मातांना व बालकांवर आवश्यक उपचार केले जातात. उपक्रम सुरू झाल्यानंतर आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यांत ७५ प्रसूती झाल्या. यापैकी १२ नैसर्गिक, ६२ सिझेरियन, गुंतागुंतीच्या एक अशा शस्त्रक्रियेचा समावेश होता. १२ लाख ९२ हजारांची बचत सिझेरियन शस्त्रक्रियेसाठी सध्या २५ हजार रुपये घेतले जातात. याप्रमाणे या उपक्रमांतर्गत झालेल्या प्रसूतीसाठी १५ लाख ७५ हजार रुपयांचा खर्च होऊ शकला असता. तथापि, या उपक्रमातून निवड केलेल्या रुग्णालयांत या शस्त्रक्रिया २ लाख ८३ हजार रुपयांमध्ये झाल्या आहेत. तब्बल १२ लाख ९२ हजार रुपयांची बचत झाली आहे. जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी आरोग्य विभागातर्फे ‘लक्ष्मीचे पाऊल’ हा उपक्रम राबविला जात आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. उपक्रमांतर्गत निवडलेल्या रुग्णालयांत उपचार घेतल्यामुळे प्रसूतीसाठीचे पैसे वाचत आहेत. - अविनाश सुभेदार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ)