शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
2
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
3
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
4
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
5
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
6
मुलं पुढे निघून जातात, ब्रेकअपनंतर मुलींचं लग्न अवघड होतं! अलाहाबाद उच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता
7
Viral Video : ताडपत्री अन् झावळ्या बघून झोपडी समजलात का? आत वाकून बघाल तर शॉकच व्हाल!
8
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
9
जगन्नाथाच्या रथापुढे होते 'सोन्याच्या' झाडूने स्वच्छता; कोणी सुरू केली ही प्रथा? आता कोण करतं? वाचा!
10
Gold Silver Rates 27 June: सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, आता 'इतकी' झाली १० ग्राम सोन्याची किंमत
11
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघाताच्या चौकशीत संयुक्त राष्ट्रांची मदत घेतली जाणार नाही; भारताने प्रस्ताव फेटाळला
12
गोलंदाजांचा कहर...एकही फलंदाज टिकेना! फक्त एक फिफ्टी अन् २ दिवसांत पडल्या २४ विकेट्स!
13
कोलकाता हादरलं! लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक
14
१ लाखाचे झाले १५ लाख! 'या' मल्टीबॅगर शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल, आता NSE वर एंट्री घेणार
15
Viral Video: कॅनडात ‘शंकर भगवान की जय’चा नारा; भारतीय विद्यार्थ्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल
16
पाकने डोकं लावायचा प्रयत्न केला, पण भारताने खोड मोडली! युएईमार्गे भारतात येणारे ३९ कंटेनर जप्त
17
मास्क लावून नको त्या खासगी क्षणाचे करायचे 'लाईव्ह स्ट्रिमिंग'; जोडप्याला पोलिसांनी केली अटक
18
भाजपाच्या महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष निवडीला वेग येणार, किरेन रिजिजूंवर सोपवली मोठी जबाबदारी, केली निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती
19
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
20
एकाच दिवसात या शेअरमध्ये ६२० रुपयांची तेजी, ब्रोकरेजनं दिलं ₹२१,४०९ चं टार्गेट; तुमच्याकडे आहे का?

महाराष्ट्रातील कापूस शेतीचा ताळेबंद तोट्यात

By admin | Updated: February 17, 2015 00:33 IST

निसर्गाच्या अवकृपेमुळे पांढरं सोनं समजलं जाणाऱ्या कापसाचं उत्पादन एकरी अवघ्या ३ ते ४ क्विंटलवर येऊन ठेपल्याने कापूस शेतीचा ताळेबंद तोट्यात आला आहे.

ब्रह्मानंद जाधव- मेहकर निसर्गाच्या अवकृपेमुळे पांढरं सोनं समजलं जाणाऱ्या कापसाचं उत्पादन एकरी अवघ्या ३ ते ४ क्विंटलवर येऊन ठेपल्याने कापूस शेतीचा ताळेबंद तोट्यात आला आहे. कापसाचा उत्पादन खर्च एकरी २३ हजार ३५० रुपये असून, उत्पन्न १८ हजार रुपयांपर्यंत होत आहे. खर्च जास्त व उत्पादन कमी होत असल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं पांढरं सोनं मातीमोल झालं आहे.पावसाच्या हुलकावणीमुळे खरीप हंगामातील पीक लागवडीची मुदत संपल्याने बहुतांश शेतकऱ्यांना कापसावरच अवलंबून राहावे लागले. त्यामुळे सन २०१३-१४ च्या कापूस हंगामाच्या तुलनेत सन २०१४-१५ च्या हंगामात कापसाची लागवड १० टक्क्यांनी वाढली. राज्यात सुमारे ४१ लाख हेक्टर क्षेत्रावर, तर विदर्भात सुमारे १७ लाख हेक्टर क्षेत्रावर कपाशी पेरणी करण्यात आली; परंतु पावसाने लांब दडी मारल्यामुळे राज्यातील ४१ लाख हेक्टरवरील कपाशी पिकाला फटका बसला आहे. पावसाच्या हुलकावणीबरोबरच कपाशी पिकावर पॅराविल्टसारख्या विविध भयावहरोगांचे आक्रमण मध्यंतरी झाले होते. परिणामी राज्यातील कापूस उत्पादनात ३० टक्के घट झाली. सद्य:स्थितीत कापूस वेचणीचा हंगाम शेवटच्या टप्प्यात असून, एकरी सुमारे ३ ते ४ क्विंटलच कापसाचे उत्पादन होत आहे. शेतकऱ्यांना कापसाला एकरी खर्च २३ हजार ३५० रुपये आला असून, उत्पन्न मात्र केवळ १८ हजार रुपयांपर्यंत होत आहे. त्यामुळे कापूस उत्पादनात शेतकऱ्यांना तोटा सोसावा लागत आहे. परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. ४पश्चिम वऱ्हाडात शेतकरी सोयाबीनला पसंती देतात; परंतु यावर्षी मान्सून उशिरा आल्याने सोयाबीनच्या पेरणीची मुदत निघून गेली. त्यामुळे पश्चिम वऱ्हाडातील शेतकऱ्यांना कापसाकडे वळावे लागले. बुलडाणा जिल्ह्यात ७ हजार ८५० हेक्टर क्षेत्र, अकोला जिल्ह्यात ८ हजार ६७५ हेक्टर क्षेत्र, तर वाशिम जिल्ह्यात ६ हजार ७२५ हेक्टर क्षेत्रावर कपाशी पेरणी करण्यात आली; परंतु नैसर्गिक संकटामुळे पश्चिम वऱ्हाडातील तिन्ही जिल्ह्यातील २३ हजार २५० हेक्टर क्षेत्रावरील कपाशी पिकाला फटका बसला. कापसाला भाव मिळेना४गत चार वर्षांपासून कापसाला भाव मिळत नसल्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना झळ सोसावी लागत आहे. यावर्षी कापसाला सरासरी ४ हजार रुपये भाव मिळत आहे. २०१३-१४ साली कापसाला सुमारे ३ हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला होता. त्याआधी सन २०१२-१३ मध्ये ३ हजार ५०० रुपये व सन २०११-१२ मध्ये ३ हजार रुपये असे दर होते. गत चार वर्षांपासून भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे.कपाशीचा एकरी ताळेबंदपूर्व मशागत१८०० रुपयेबियाणे१५०० रुपयेलागवड मजुरी७५० रुपयेखत४८०० रुपयेफवारणी मजुरी२५०० रुपयेफवारणी औषधी४५०० रुपयेआंतर मशागत३५०० रुपयेकापूस वेचणी४००० रुपयेएकूण खर्च२३३५० रुपयेसरासरी उत्पन्न४ क्विंटलप्रति क्विं.दर४५०० रुपयेमिळकत१८००० रुपयेनुकसान५३५० रुपये