शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

महाराष्ट्रातील कापूस शेतीचा ताळेबंद तोट्यात

By admin | Updated: February 17, 2015 00:33 IST

निसर्गाच्या अवकृपेमुळे पांढरं सोनं समजलं जाणाऱ्या कापसाचं उत्पादन एकरी अवघ्या ३ ते ४ क्विंटलवर येऊन ठेपल्याने कापूस शेतीचा ताळेबंद तोट्यात आला आहे.

ब्रह्मानंद जाधव- मेहकर निसर्गाच्या अवकृपेमुळे पांढरं सोनं समजलं जाणाऱ्या कापसाचं उत्पादन एकरी अवघ्या ३ ते ४ क्विंटलवर येऊन ठेपल्याने कापूस शेतीचा ताळेबंद तोट्यात आला आहे. कापसाचा उत्पादन खर्च एकरी २३ हजार ३५० रुपये असून, उत्पन्न १८ हजार रुपयांपर्यंत होत आहे. खर्च जास्त व उत्पादन कमी होत असल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं पांढरं सोनं मातीमोल झालं आहे.पावसाच्या हुलकावणीमुळे खरीप हंगामातील पीक लागवडीची मुदत संपल्याने बहुतांश शेतकऱ्यांना कापसावरच अवलंबून राहावे लागले. त्यामुळे सन २०१३-१४ च्या कापूस हंगामाच्या तुलनेत सन २०१४-१५ च्या हंगामात कापसाची लागवड १० टक्क्यांनी वाढली. राज्यात सुमारे ४१ लाख हेक्टर क्षेत्रावर, तर विदर्भात सुमारे १७ लाख हेक्टर क्षेत्रावर कपाशी पेरणी करण्यात आली; परंतु पावसाने लांब दडी मारल्यामुळे राज्यातील ४१ लाख हेक्टरवरील कपाशी पिकाला फटका बसला आहे. पावसाच्या हुलकावणीबरोबरच कपाशी पिकावर पॅराविल्टसारख्या विविध भयावहरोगांचे आक्रमण मध्यंतरी झाले होते. परिणामी राज्यातील कापूस उत्पादनात ३० टक्के घट झाली. सद्य:स्थितीत कापूस वेचणीचा हंगाम शेवटच्या टप्प्यात असून, एकरी सुमारे ३ ते ४ क्विंटलच कापसाचे उत्पादन होत आहे. शेतकऱ्यांना कापसाला एकरी खर्च २३ हजार ३५० रुपये आला असून, उत्पन्न मात्र केवळ १८ हजार रुपयांपर्यंत होत आहे. त्यामुळे कापूस उत्पादनात शेतकऱ्यांना तोटा सोसावा लागत आहे. परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. ४पश्चिम वऱ्हाडात शेतकरी सोयाबीनला पसंती देतात; परंतु यावर्षी मान्सून उशिरा आल्याने सोयाबीनच्या पेरणीची मुदत निघून गेली. त्यामुळे पश्चिम वऱ्हाडातील शेतकऱ्यांना कापसाकडे वळावे लागले. बुलडाणा जिल्ह्यात ७ हजार ८५० हेक्टर क्षेत्र, अकोला जिल्ह्यात ८ हजार ६७५ हेक्टर क्षेत्र, तर वाशिम जिल्ह्यात ६ हजार ७२५ हेक्टर क्षेत्रावर कपाशी पेरणी करण्यात आली; परंतु नैसर्गिक संकटामुळे पश्चिम वऱ्हाडातील तिन्ही जिल्ह्यातील २३ हजार २५० हेक्टर क्षेत्रावरील कपाशी पिकाला फटका बसला. कापसाला भाव मिळेना४गत चार वर्षांपासून कापसाला भाव मिळत नसल्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना झळ सोसावी लागत आहे. यावर्षी कापसाला सरासरी ४ हजार रुपये भाव मिळत आहे. २०१३-१४ साली कापसाला सुमारे ३ हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला होता. त्याआधी सन २०१२-१३ मध्ये ३ हजार ५०० रुपये व सन २०११-१२ मध्ये ३ हजार रुपये असे दर होते. गत चार वर्षांपासून भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे.कपाशीचा एकरी ताळेबंदपूर्व मशागत१८०० रुपयेबियाणे१५०० रुपयेलागवड मजुरी७५० रुपयेखत४८०० रुपयेफवारणी मजुरी२५०० रुपयेफवारणी औषधी४५०० रुपयेआंतर मशागत३५०० रुपयेकापूस वेचणी४००० रुपयेएकूण खर्च२३३५० रुपयेसरासरी उत्पन्न४ क्विंटलप्रति क्विं.दर४५०० रुपयेमिळकत१८००० रुपयेनुकसान५३५० रुपये