शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
2
लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
3
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
4
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
5
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
6
Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
7
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीने एक्सपेन्स रेशोचे नियम बदलले, कमाईवर थेट परिणाम
8
खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...
9
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
10
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
11
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
12
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
13
५ राजयोगात मार्गशीर्ष अमावास्या २०२५: ९ राशींवर लक्ष्मी कुबेर कृपा, कल्पनेपलीकडे यश-पैसा-लाभ!
14
Creta ला टक्कर देण्यासाठी येतेय Mahindra ची नवी 'मिड-साईज' SUV; असे असेल डिझाईन अन् खासियत
15
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: वर्षातली शेवटची आणि प्रभावशाली रात्र; आठवणीने करा 'हे' ५ उपाय!
16
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
17
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
18
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
19
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
20
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील कापूस शेतीचा ताळेबंद तोट्यात

By admin | Updated: February 17, 2015 00:33 IST

निसर्गाच्या अवकृपेमुळे पांढरं सोनं समजलं जाणाऱ्या कापसाचं उत्पादन एकरी अवघ्या ३ ते ४ क्विंटलवर येऊन ठेपल्याने कापूस शेतीचा ताळेबंद तोट्यात आला आहे.

ब्रह्मानंद जाधव- मेहकर निसर्गाच्या अवकृपेमुळे पांढरं सोनं समजलं जाणाऱ्या कापसाचं उत्पादन एकरी अवघ्या ३ ते ४ क्विंटलवर येऊन ठेपल्याने कापूस शेतीचा ताळेबंद तोट्यात आला आहे. कापसाचा उत्पादन खर्च एकरी २३ हजार ३५० रुपये असून, उत्पन्न १८ हजार रुपयांपर्यंत होत आहे. खर्च जास्त व उत्पादन कमी होत असल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं पांढरं सोनं मातीमोल झालं आहे.पावसाच्या हुलकावणीमुळे खरीप हंगामातील पीक लागवडीची मुदत संपल्याने बहुतांश शेतकऱ्यांना कापसावरच अवलंबून राहावे लागले. त्यामुळे सन २०१३-१४ च्या कापूस हंगामाच्या तुलनेत सन २०१४-१५ च्या हंगामात कापसाची लागवड १० टक्क्यांनी वाढली. राज्यात सुमारे ४१ लाख हेक्टर क्षेत्रावर, तर विदर्भात सुमारे १७ लाख हेक्टर क्षेत्रावर कपाशी पेरणी करण्यात आली; परंतु पावसाने लांब दडी मारल्यामुळे राज्यातील ४१ लाख हेक्टरवरील कपाशी पिकाला फटका बसला आहे. पावसाच्या हुलकावणीबरोबरच कपाशी पिकावर पॅराविल्टसारख्या विविध भयावहरोगांचे आक्रमण मध्यंतरी झाले होते. परिणामी राज्यातील कापूस उत्पादनात ३० टक्के घट झाली. सद्य:स्थितीत कापूस वेचणीचा हंगाम शेवटच्या टप्प्यात असून, एकरी सुमारे ३ ते ४ क्विंटलच कापसाचे उत्पादन होत आहे. शेतकऱ्यांना कापसाला एकरी खर्च २३ हजार ३५० रुपये आला असून, उत्पन्न मात्र केवळ १८ हजार रुपयांपर्यंत होत आहे. त्यामुळे कापूस उत्पादनात शेतकऱ्यांना तोटा सोसावा लागत आहे. परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. ४पश्चिम वऱ्हाडात शेतकरी सोयाबीनला पसंती देतात; परंतु यावर्षी मान्सून उशिरा आल्याने सोयाबीनच्या पेरणीची मुदत निघून गेली. त्यामुळे पश्चिम वऱ्हाडातील शेतकऱ्यांना कापसाकडे वळावे लागले. बुलडाणा जिल्ह्यात ७ हजार ८५० हेक्टर क्षेत्र, अकोला जिल्ह्यात ८ हजार ६७५ हेक्टर क्षेत्र, तर वाशिम जिल्ह्यात ६ हजार ७२५ हेक्टर क्षेत्रावर कपाशी पेरणी करण्यात आली; परंतु नैसर्गिक संकटामुळे पश्चिम वऱ्हाडातील तिन्ही जिल्ह्यातील २३ हजार २५० हेक्टर क्षेत्रावरील कपाशी पिकाला फटका बसला. कापसाला भाव मिळेना४गत चार वर्षांपासून कापसाला भाव मिळत नसल्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना झळ सोसावी लागत आहे. यावर्षी कापसाला सरासरी ४ हजार रुपये भाव मिळत आहे. २०१३-१४ साली कापसाला सुमारे ३ हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला होता. त्याआधी सन २०१२-१३ मध्ये ३ हजार ५०० रुपये व सन २०११-१२ मध्ये ३ हजार रुपये असे दर होते. गत चार वर्षांपासून भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे.कपाशीचा एकरी ताळेबंदपूर्व मशागत१८०० रुपयेबियाणे१५०० रुपयेलागवड मजुरी७५० रुपयेखत४८०० रुपयेफवारणी मजुरी२५०० रुपयेफवारणी औषधी४५०० रुपयेआंतर मशागत३५०० रुपयेकापूस वेचणी४००० रुपयेएकूण खर्च२३३५० रुपयेसरासरी उत्पन्न४ क्विंटलप्रति क्विं.दर४५०० रुपयेमिळकत१८००० रुपयेनुकसान५३५० रुपये