शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीचा कस शेतकऱ्यास प्रयोगशाळेतून कळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2016 04:25 IST

कृषी, उत्पादन आणि सेवा ही तीन क्षेत्रे बलवान झाली, तर देशाचा विकास निश्चित होईल. त्या दृष्टीने भविष्यात शेतकऱ्यांसाठी मृदा आरोग्य कार्ड (स्वॉइल हेल्थ कार्ड) योजना राबविण्यात येणार आहे.

बेळगाव : कृषी, उत्पादन आणि सेवा ही तीन क्षेत्रे बलवान झाली, तर देशाचा विकास निश्चित होईल. त्या दृष्टीने भविष्यात शेतकऱ्यांसाठी मृदा आरोग्य कार्ड (स्वॉइल हेल्थ कार्ड) योजना राबविण्यात येणार आहे. २०१७ मध्ये देशातल्या प्रत्येक शेतकऱ्याकडे हे कार्ड असेल आणि त्याद्वारे आपल्या जमिनीचा कस काय आहे, हे प्रत्येक शेतकऱ्याला प्रयोगशाळेतून मिळालेल्या अहवालाद्वारे समजू शकेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथे सांगितले.येथील सावगाव रोडवरील अंगडी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित शेतकरी मेळाव्यात पंतप्रधान मोदी बोलत होते. प्रारंभी मोदी यांनी किसान पीक विमा योजनेचा प्रारंभ भाताला सुपाद्वारे वारे देऊन केला. या मेळाव्यास उत्तर कर्नाटकमधून एक लाखाहून अधिक शेतकरी उपस्थित होते. व्यासपीठावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष प्रल्हाद जोशी, माजी मुख्यमंत्री बी. एस. येदियुराप्पा केंद्रीय मंत्री अनंतकुमार, सदानंद गौडा, केंद्रीय राज्यमंत्री जी. एम. सिद्धेश, कर्नाटक भाजपचे प्रभारी पी. मुरलीधर राव, ज्येष्ठ नेते ईश्वरप्पा, जगदीश शेट्टर, राज्यसभा सदस्य प्रभाकर कोरे, बेळगावचे खासदार सुरेश अंगडी उपस्थित होते.‘कमी पाण्यातही चांगली शेती करता येते, हे शेतकऱ्यांंनी समजून घ्यायला पाहिजे. सूक्ष्म जल सिंचनाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी आत्मसात करणे आवश्यक आहे. पाणी आणि जमिनीची काळजी शेतकऱ्यांनी घ्यायला पाहिजे. ‘प्रत्येक थेंब अधिक पीक’ ही मानसिकता रुजायला पाहिजे,’ असे सांगून पंतप्रधान म्हणाले की, ‘पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व प्रत्येकाने जाणले पाहिजे. पंतप्रधान कृषी सिंचन योजनेसाठी ५० हजार कोटींचा निधी मंजूर केला आहे. नदी जोडणी प्रकल्प देशाच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्यासाठी राजकारण आणि आपसातील मतभेद बाजूला ठेवले पाहिजेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी आमच्या सरकारने विविध योजना राबविलेल्या आहेत आणि भविष्यातही राबविणार आहे. आयटी क्षेत्रातील संशोधकांनी शेतीतील संशोधनाकडे लक्ष्य द्यावे. नव्या संशोधनामुळेच कृषी क्षेत्राचा विकास होणार आहे.’‘१८ महिन्यांपूर्वी आमचे सरकार सत्तेवर आले. त्या वेळी सगळ्या क्षेत्रांत केवळ भ्रष्टाचार ऐकायला येत होता. जागतिक स्तरावर भारताची पत घसरली होती. भारताला कोणत्याही बाबतीत इतर देश गणतीत घेत नव्हते. देश आर्थिक संकटात होता, पण आज परिस्थिती बदलली आहे. १८ महिन्यांत आमच्या सरकारवर एकही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही. कोणीही खोटा आरोप करायचे धाडस केले नाही.’‘आज सर्वत्र भारताच्या विकासाचा गौरव केला जातोय. हा बदल केवळ १८ महिन्यांत घडला,’ असेही मोदी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)