शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

कुश कटारिया हत्येतील दोषी आयुष पुगलियाची हत्या; कैद्यांमधील आपापसातील वादातून झाली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2017 13:30 IST

कुश कटारिया हत्येतील दोषी आयुष पुगलियाची कारागृहात हत्या करण्यात आली आहे.

ठळक मुद्देकुश कटारिया हत्येतील दोषी आयुष पुगलियाची कारागृहात हत्या करण्यात आली आहे.कैद्यांमध्ये झालेल्या आपापसातील वादातून आयुष पुगलियाची हत्या झाल्याचं समोर आलं आहे. आयुषच्या डोक्यात वीट मारून त्याची हत्या झाली आहे. 

नागपूर, दि. 11-नागपूर शहराला हादरवून सोडणाऱ्या कुश कटारिया हत्येतील दोषी आयुष पुगलियाची कारागृहात हत्या करण्यात आली आहे. नागपूर मध्यवर्ती कारागृहात कैद्यांमध्ये झालेल्या आपापसातील वादातून आयुष पुगलियाची हत्या झाल्याचं समोर आलं आहे. सोमवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली असल्याचं समजतं आहे. तुरुंगातील दोन गटांमध्ये झालेल्या वादातून ही हत्या झाली आहे त्यामुळे तुरुंगातील सुरक्षाव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आयुषचं त्याच्यासोबत असणाऱ्या एका कैद्याबरोबर सकाळी भांडण झालं होतं. हे भांडण विकोपाला गेलं आणि आयुषची हत्या झाली आहे. आयुषच्या डोक्यात फरशी मारून त्याची हत्या करण्यात आली. दरम्यान, मृतक आरोपीचे भाऊ नागपूर मध्यवर्ती कारागृहासमोर निषेध म्हणून बसले आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं खंडणी, अपहरण आणि खून प्रकरणी दोषी ठरवलेला पुगलिया तिहेरी जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. तुरुंग प्रशासनानं धंतोली पोलीस ठाण्याला याबाबतची माहिती दिली. नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपची शिक्षा भोगत असलेला आरोपी सुरज विशेषराव कोटनाके याने आयुषची हत्या केल्याचं समोर आलं आहे. सुरज कोटनाके हा चंद्रपुरातील राजोराचा राहणारा आहे. सुरजने 2014 मध्ये एकाची हत्या केली होती. या हत्येप्रकरणी 2015 मध्ये त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. आयुष आणि सुरजमध्ये दोन दिवसांपूर्वी भांडण झालं होतं. त्या भांडणाचा आज उद्रेक होऊन हा संपूर्ण प्रकार घडला आहे. 

कुश कटारियाची हत्या नेमकी कशी झाली?  ८ वर्षांचा मुलगा कुश कटारिया याचं ११ ऑक्टोबर २०११ रोजी घरातून अपहरण झालं होतं. कुश हा शुभम बैद व रिद्म पुरिया या दोन मित्रांसोबत घरात खेळत होता. दरम्यान, आरोपी आयुषने चॉकलेटचे आमिष दाखवून कुशला स्वत:कडे बोलावलं होतं. कुणालाही दिसू नये म्हणून तो कुश गॅलरीतून खाली उतरतपर्यंत पुढे निघून गेला. कुश त्याच्या मागे धावत आला. यानंतर आयुष कुशला दुचाकीवर बसवून परिसरातून निघून गेला. सायंकाळी ६ च्या सुमारास त्याने खंडणीसाठी कटारियांच्या घरी दूरध्वनी केला. ‘दोन कोटी रुपये द्या अन्यथा कुशला ठार मारेन, पोलिसांना माहिती दिल्यास खबरदार’, अशी धमकी त्याने दिली. कुशचे अपहरण झाल्याचे पुढे आल्यावर गुन्हे शाखा पोलिसांसह संपूर्ण यंत्रणेने कुशचा शोध घेतला, पण काहीच फायदा झाला नाही. कुश आयुषच्या मागे गेला होता, अशी माहिती मिळाल्यानंतर आयुषला ताब्यात घेण्यात आले. पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर आयुषने हत्येची कबुली दिली. आयुषने कुशची सूर्यनगरातील एका निर्माणाधीन इमारतीत नेऊन अत्यंत निर्घृण हत्या केली होती. आयुषने आधी कुशच्या डोक्यावर विटेने जोरदार प्रहार केला. कुश रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्यावर आरोपीने कटरने कुशचा गळा कापला. यानंतर तो कुशचा मृतदेह पाण्याच्या टाकीत टाकून घटनास्थळावरून निघून गेला.

टॅग्स :Murderखून