शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

क्रांती मोर्चाचे आता "मराठा जोडो अभियान"

By admin | Updated: May 29, 2017 17:25 IST

मुंबईसह ठाणे, पालघर, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी मिळून महामुंबई टीम स्थापन केली आहे. या समितीने पत्रकार परिषद घेत मराठा जोडो अभियानाची घोषणा केली.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 29 - मुंबईसह ठाणे, पालघर, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी मिळून महामुंबई टीम स्थापन केली आहे. या समितीने पत्रकार परिषद घेत मराठा जोडो अभियानाची घोषणा केली.
६ जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळ्यादिवशी रायगडावर विविध उपक्रम राबवण्यात येतील, अशी माहिती समन्वयक वीरेंद्र पवार यांनी दिली.शैक्षणिक मागासलेपण दूर करण्यासाठी महामुंबई टीम मुंबई विभागातील विद्यार्थ्यांसाठी काम करेल. महामुंबईतील महाविद्यालयांत मराठा विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा, त्यांच्या शुल्काबाबत ही टीम काम करणार आहे. ९ ऑगस्टच्या मोर्चामध्ये महामुंबई टीम नियोजन करेल. खासदार राजू शेट्टी यांच्या आत्मक्लेश आंदोलनात मराठा क्रांती मोर्चाचा पाठिंबा असेल.
९ ऑगस्ट हा एकच सकल मराठा समाजाचा एकमेव मोर्चा असेल. फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र मराठा समाज त्याला बळी पडणार नाही. इतर मोर्चांना संघटना विरोध करणार नसून केवळ शुभेच्छा दिल्या जातील.
 
शिक्षण मंत्र्यांना ८ दिवसांचा अल्टीमेटम...
शिक्षण मंत्री विनोद तावडे स्वत: मराठा समाजाचे असून मराठा विद्यार्थ्यांना स्वतंत्र आरक्षण देण्याची जबाबदारी त्यांची आहे. ४८ टक्के जागांमध्ये स्थानिक विद्यार्थ्यांना परप्रांतियांशीही स्पर्धा करावी लागते. त्यामुळे ८ दिवसांत मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी ठोस घोषणा केली नाही, तर पालक व विद्यार्थी रस्त्यावर उतरतील, असा इशारा पवार यांनी दिला आहे.