शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

कोरेगाव- भीमा हिंसाचारामागे माओवादी संघटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 00:40 IST

सत्यशोधन समिती अहवालातून निष्कर्ष; हिंदुत्ववादी गटाचा नाही संबंध

पुणे : कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी रोजी झालेला हिंसाचार हा माओवादी विचारांच्या संघटनेकडून केला होता. खोटा इतिहास पसरवून जातीय तेढ निर्माण करणाऱ्या फुटीरतावादी गटाचा हा पूर्वनियोजित कट होता. यामध्ये आंबेडकरी व हिंदुत्ववादी गटाचा काहीही संबंध नाही, असा निष्कर्ष सत्यशोधन समितीने तयार केलेल्या अहवालातून काढला आहे. पुण्यात पत्रकार परिषद घेऊन या अहवालाचे प्रकाशन करण्यात आले.समितीच्या माजी लष्करी अधिकारी कॅप्टन स्मिता गायकवाड व इतर सदस्यांनी हा अहवाल तयार केला आहे. विवेक विचार मंचने तो प्रकाशित केला आहे. यावेळी गायकवाड यांच्यासह माजी खासदार प्रदीप रावत उपस्थित होते. यावेळी गायकवाड यांनी अहवालाचे डिजिटल सादरीकरण केले.गायकवाड यांनी, या हिंसाचारामागील सूत्रधार अनुषंगाने ३१ डिसेंबरला शनिवरवाड्यावरील एल्गार परिषद आयोजक असलेल्या कबीर कला मंच, रिपब्लिकन पँथर या संशयित गटाची चौकशी करावी अशी मागणी केली. एटीएसने जानेवारीत अटक केलेले संशयित माओवादी कोरेगाव भीमाला गेल्याचे व एल्गार परिषद आयोजक सुधीर ढवळे, हर्षाली पोतदार याच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे एल्गार परिषद व कोरेगाव हिंसाचाराचे लागेबांधे आहेत, त्यांची चौकशी करावी असेही ते म्हणाले. खºया अर्थाने पोलिसच या हिंसाचाराला जबाबदार असून कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक आणि शहर पोलिस आयुक्तांनी या प्रकरणामध्ये राज्य शासनाची दिशाभूल केली, असा आरोपही त्यांनी केला.

प्रकाश आंबेडकरांना भाजपाची कावीळपूजा सकट मृत्यू प्रकरणाबद्दल सर्वांनाच संवेदना आहे, मात्र यामागे संघाचा हात असल्याचा दावा करणे म्हणजे प्रकाश आंबेडकरांकडून ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रकार सुरू आहे. दंगल रोखता न येणे हे स्थानिक पोलिसांचे अपयश असून आंबेडकर यांना संघाची कावीळ झाली आहे, असा टोला रावत यांनी लगावला. 

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगाव