शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

कोरेगाव भीमा हिंसाचार : प्रकाश आंबेडकर यांनी दिली होती ‘बंद’ची हाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 06:27 IST

भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी कोरेगाव भीमा हिंसाचारानंतर, अनिश्चित काळासाठी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिल्याचे ठाणे येथे राहणाऱ्या एका साक्षीदाराने चौकशी आयोगाला मंगळवारी सांगितले.

मुंबई : भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी कोरेगाव भीमा हिंसाचारानंतर, अनिश्चित काळासाठी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिल्याचे ठाणे येथे राहणाऱ्या एका साक्षीदाराने चौकशी आयोगाला मंगळवारी सांगितले. मिलिंद एकबोटे यांच्या वतीने अ‍ॅड. नितीन प्रधान यांनी साक्षीदाराची उलटतपासणी घेतली. कोरेगाव भीमा हिंसाचारानंतर प्रकाश आंबेडकर यांनी अनिश्चित काळासाठी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली का? आणि परिस्थिती हाताबाहेर जात आहे, हे बघून त्यांनीच बंद मागे घेण्याचा   आदेश दिला का, असे प्रश्न प्रधान  यांनी साक्षीदाराला केले. त्यावर साक्षीदाराने होकारार्थी उत्तर दिले.तसेच पुण्यात ३१ डिसेंबरला झालेल्या एल्गार परिषदेचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर होते आणि त्यांनीच दुसºया दिवशी म्हणजे १ जानेवारीला कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी मोठ्या संख्येने जमण्याचे आवाहन केले होते का, या प्रश्नावर उत्तर देताना साक्षीदाराने आपण हे सर्व वर्तमानपत्रात वाचल्याचे आयोगाला सांगितले.कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला २०० वर्षे पूर्ण झाल्याने, या साक्षीदाराने व त्यांच्या मंडळाच्या सहकाºयांनी विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठीएक बस भरून माणसे नेली होती. मात्र, विजयस्तंभापर्यंत पोहोचण्यापूर्वीच तेथे हिंसाचार सुरू झाल्याने, त्या सर्वांना जीव वाचवत परतावे लागले. त्यांच्या बसला आगही लावण्यात आली. कोरेगाव भीमा घटनेनंतर २ जानेवारीला ठाणे येथील श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवायला गेलो असता, पोलिसांनी तक्रार नोंदविण्यात टाळाटाळ केली आणि आम्हालाच पोलीस ठाण्यात डांबून ठेवले, असे या साक्षीदाराने सांगितले. त्यानंतर, आम्ही काही लोकांनाफोन करून पोलीस ठाण्यात बोलाविले. मात्र, त्या लोकांबरोबर मोठा जमाव आला. पोलीस तक्रार घेत नसल्याने जमावातील काही लोकांनी संबंधित परिसरातील आजूबाजूची दुकाने जबरदस्तीने बंद केली, अशीही माहिती या साक्षीदाराने आयोगाला दिली. राज्य सरकारही या साक्षीदाराची उलटतपासणी घेणार आहे.मुदतवाढीसाठी सरकारला अर्जकोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने नियुक्तकेलेल्या आयोगाची मुदत ५ आॅक्टोबरला संपत आहे. मात्र, अद्यापमुंबईतील काही साक्षीदारांची व पुण्यातील साक्षीदारांची साक्ष नोंदविण्याचेकाम पूर्ण झालेले नाही. त्यासाठी आणखी किती काळ लागेल, हे सांगतायेत नाही. याबाबत आयोगाला मुदतवाढ देण्यासंदर्भात काही दिवसांपूर्वीचअर्ज केला असून, राज्य सरकारच्या अधिसूचनेची प्रतीक्षा असल्याचेआयोगाच्या सचिवांनी सांगितले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरnewsबातम्या