शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
3
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
4
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
5
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
6
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
7
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
8
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
10
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
11
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
12
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
13
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
14
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
15
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
16
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
17
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
18
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
19
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
20
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली

कोरेगाव भीमा हिंसाचार : प्रकाश आंबेडकर यांनी दिली होती ‘बंद’ची हाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 06:27 IST

भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी कोरेगाव भीमा हिंसाचारानंतर, अनिश्चित काळासाठी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिल्याचे ठाणे येथे राहणाऱ्या एका साक्षीदाराने चौकशी आयोगाला मंगळवारी सांगितले.

मुंबई : भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी कोरेगाव भीमा हिंसाचारानंतर, अनिश्चित काळासाठी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिल्याचे ठाणे येथे राहणाऱ्या एका साक्षीदाराने चौकशी आयोगाला मंगळवारी सांगितले. मिलिंद एकबोटे यांच्या वतीने अ‍ॅड. नितीन प्रधान यांनी साक्षीदाराची उलटतपासणी घेतली. कोरेगाव भीमा हिंसाचारानंतर प्रकाश आंबेडकर यांनी अनिश्चित काळासाठी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली का? आणि परिस्थिती हाताबाहेर जात आहे, हे बघून त्यांनीच बंद मागे घेण्याचा   आदेश दिला का, असे प्रश्न प्रधान  यांनी साक्षीदाराला केले. त्यावर साक्षीदाराने होकारार्थी उत्तर दिले.तसेच पुण्यात ३१ डिसेंबरला झालेल्या एल्गार परिषदेचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर होते आणि त्यांनीच दुसºया दिवशी म्हणजे १ जानेवारीला कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी मोठ्या संख्येने जमण्याचे आवाहन केले होते का, या प्रश्नावर उत्तर देताना साक्षीदाराने आपण हे सर्व वर्तमानपत्रात वाचल्याचे आयोगाला सांगितले.कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला २०० वर्षे पूर्ण झाल्याने, या साक्षीदाराने व त्यांच्या मंडळाच्या सहकाºयांनी विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठीएक बस भरून माणसे नेली होती. मात्र, विजयस्तंभापर्यंत पोहोचण्यापूर्वीच तेथे हिंसाचार सुरू झाल्याने, त्या सर्वांना जीव वाचवत परतावे लागले. त्यांच्या बसला आगही लावण्यात आली. कोरेगाव भीमा घटनेनंतर २ जानेवारीला ठाणे येथील श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवायला गेलो असता, पोलिसांनी तक्रार नोंदविण्यात टाळाटाळ केली आणि आम्हालाच पोलीस ठाण्यात डांबून ठेवले, असे या साक्षीदाराने सांगितले. त्यानंतर, आम्ही काही लोकांनाफोन करून पोलीस ठाण्यात बोलाविले. मात्र, त्या लोकांबरोबर मोठा जमाव आला. पोलीस तक्रार घेत नसल्याने जमावातील काही लोकांनी संबंधित परिसरातील आजूबाजूची दुकाने जबरदस्तीने बंद केली, अशीही माहिती या साक्षीदाराने आयोगाला दिली. राज्य सरकारही या साक्षीदाराची उलटतपासणी घेणार आहे.मुदतवाढीसाठी सरकारला अर्जकोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने नियुक्तकेलेल्या आयोगाची मुदत ५ आॅक्टोबरला संपत आहे. मात्र, अद्यापमुंबईतील काही साक्षीदारांची व पुण्यातील साक्षीदारांची साक्ष नोंदविण्याचेकाम पूर्ण झालेले नाही. त्यासाठी आणखी किती काळ लागेल, हे सांगतायेत नाही. याबाबत आयोगाला मुदतवाढ देण्यासंदर्भात काही दिवसांपूर्वीचअर्ज केला असून, राज्य सरकारच्या अधिसूचनेची प्रतीक्षा असल्याचेआयोगाच्या सचिवांनी सांगितले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरnewsबातम्या