शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
5
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
6
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
7
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
8
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
9
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
10
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
11
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
12
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
13
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
14
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
15
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
20
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण : राष्ट्रपती, पंतप्रधानांना पत्रे लिहून प्रसिद्धी मिळविण्यावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2018 00:47 IST

कोरेगाव भीमा प्रकरणी कायदेशीर प्रक्रिया पार न पाडता थेट राष्ट्रपती, पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविण्याच्या वृत्तीवर उच्च न्यायालयाने शुक्रवारी टीका केली.

मुंबई : कोरेगाव भीमा प्रकरणी कायदेशीर प्रक्रिया पार न पाडता थेट राष्ट्रपती, पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविण्याच्या वृत्तीवर उच्च न्यायालयाने शुक्रवारी टीका केली.अलिकडे अशी पत्रे लिहून प्रसिद्धी मिळविण्याची वृत्ती वाढत आहे, असे परखड मत कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर न्या. एस. एस. शिंदे व न्या. मृदुला भाटकर यांच्या खडपीठाने मांडले.याआधीही सतीश गायकवाड यांनी कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी केलेल्या अटकेच्या कारवाईची एनआयएकडून चौकशी व्हावी, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात केली आहे. त्यापाठोपाठ अब्दुल चौधरी यांनी या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्यात यावी, यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली.या याचिकाकर्त्यांनी राष्ट्रपती, पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून अनेक लोकांवर आरोप केले आहेत. शेजारी देशालाही सोडले नाही. अशाप्रकारे कायदेशीर प्रक्रिया डावलून राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना थेट पत्र लिहिणे, हा दुर्देवी प्रकार आहे, असे मत न्यायालयाने नोंदवले.पोलीस ठाण्यात किंवा दंडाधिकाऱ्यांकडे जाऊन कोणत्याही व्यक्ती आपल्या तक्रारीचे निवारण करू शकतात. मात्र थेट पत्र लिहून ते प्रसिद्धी मिळवू इच्छितात, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.माओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून अटक केलेल्या आरोपींसंबंधी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. त्यावरील सुनावणी १२ सप्टेंबरला आहे. त्यामुळे आम्ही या याचिकेवरील सुनावणी १७ सप्टेंबरला ठेवत आहोत, असे न्यायालयाने स्पष्ट केले. गेल्यावर्षी ३१ डिसेंबरला झालेल्या एल्गार परिषदेमागे माओवाद्यांचा हात असल्याच्या संशयावरून सुधीर ढवळे, रोना विल्सन, सुरेंद्र गडलिंग, शोमा सेन आणि महेश राऊत यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या चिथावणीखोर भाषणामुळे दुसºया दिवशी कोरेगाव भीमाचा हिंसाचार घडला, असा पोलिसांचा दावा आहे. २८ आॅगस्टला पोलिसांनी आणखी पाच लोकांना अटक केली. त्यात वेर्नोन गोन्साल्विस, अरुण फेरारी, सुधा भारद्वाज व गौतम नवलखा यांचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या पाचही व्यक्ती १२ सप्टेंबरपर्यंत नजरकैदेत आहेत. हिंसाचार घडवून केंद्र आणि राज्य सरकार उलथवून टाकण्याचा त्यांचा कट होता, असे पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले होते.सुनावणी १७ सप्टेंबरलाअटक आरोपींसंबंधी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. त्यावरील सुनावणी १२ सप्टेंबरला असल्याने या याचिकेवरील सुनावणी १७ सप्टेंबरला ठेवत आहोत, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

टॅग्स :Courtन्यायालयBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचार