शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण: 'सरकार हटविण्यासाठी आरोपींनी दलित समाजाला एकत्र केले'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2019 06:06 IST

पुणे पोलिसांचा प्रतिज्ञापत्राद्वारे उच्च न्यायालयात दावा

मुंबई : सरकारला हटविण्याचा माओवाद्यांचा हेतू साध्य करण्यासाठी आरोपी कार्यकर्त्यांनी दलित समाजाला चिथावले, असा दावा पुणे पोलिसांनी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे केला आहे.कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी आरोपी असलेले अरुण फरेरा यांच्या जामीन अर्जाला विरोध करताना पुण्याचे साहाय्यक आयुक्त शिवाजी पवार यांनी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले. फरेरा यांच्यासह वर्नोन गोन्साल्विस, सुधा भारद्वाज, पी. वरावरा राव, गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांनाही या प्रकरणी आरोपी केले आहे. फरेरा आणि गोन्साल्विस यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी न्या. पी. एन. देशमुख यांच्या एकसदस्यीय खंडपीठापुढे झाली. या याचिकांवरील सुनावणी ५ एप्रिलपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.प्रतिज्ञापत्रानुसार, फरेरा आणि अन्य आरोपी बंदी घातलेल्या सीपीआयचे (माओवादी) वरिष्ठ सदस्य आहेत. कायद्याने स्थापित केलेले सरकार हटविण्यासाठी प्रतिबंधित कारवाया करण्यासाठी ते पाठिंबा देतात. सीपीआयला सत्ता हवी आहे आणि ती मिळविणे, हाच त्यांचा उद्देश आहे, हे चौकशीत निष्पन्न झाले.हेतू साध्य करण्यासाठी संघटनेने जुन्या पारंपरिक पद्धतीने युद्ध छेडले नाही; तर लोकांना एकत्र आणून त्यांना चिथावणी देऊन युद्ध छेडले. दलितांच्या स्वाभिमानासाठी, भेदभाव, उच्चभ्रूंकडून होणारे शारीरिक हल्ले या मुद्द्यांवरून सीपीआय त्यांना एकत्र आणून उद्दिष्ट साध्य करू पाहात आहेत, असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.३१ डिसेंबर २०१७ च्या एल्गार परिषदेत फरेरा आणि अन्य आरोपींनी भावना भडकाविणारे भाषण केले. यावेळी दलित समाज मोठ्या प्रमाणावर सहभागी होता. सीपीआयने या परिषदेसाठी निधी पुरविला, असा दावा पोलिसांनी केला आहे. धर्म, जातीच्या नावाखाली लोकांमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी फरेरा व अन्य आरोपींनी एल्गार परिषदेत लोकांमध्ये पॅम्पलेट वाटली. एल्गार परिषदेत दिलेल्या भाषणांचे फलित म्हणजे १ जानेवारी २०१८ चा कोरेगाव भीमा हिंसाचार आहे, असे पोलिसांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. काही महत्त्वाच्या कागदपत्रांवरून, आरोपींच्या घरातून जमा केलेल्या पुराव्यांवरून आरोपी फौजदारी कटात सहभागी असून घडलेल्या गुन्ह्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचा दावा पोलिसांनी न्यायालयात केला.‘दहशत निर्माण करणे हेच ध्येय’काही सक्रिय सदस्यांनी या दलित वर्गाला पद्धतशीर एकत्र आणले. फरेरा, गोन्साल्विस सीपीआयचे वरिष्ठ सदस्य आहेत आणि नवीन सदस्यांना भरती करण्याचे काम या दोघांवर आहे. हिंसाचार करून, समाजात तेढ निर्माण करून केंद्र व राज्य सरकारला हटविण्याचे सीपीआयचे उद्दिष्ट आहे. महत्त्वाच्या व्यक्तींची हत्या करणे, दहशत निर्माण करणे, हे संघटनेचे ध्येय आहे,’ असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

टॅग्स :Bhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचार