शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण: 'सरकार हटविण्यासाठी आरोपींनी दलित समाजाला एकत्र केले'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2019 06:06 IST

पुणे पोलिसांचा प्रतिज्ञापत्राद्वारे उच्च न्यायालयात दावा

मुंबई : सरकारला हटविण्याचा माओवाद्यांचा हेतू साध्य करण्यासाठी आरोपी कार्यकर्त्यांनी दलित समाजाला चिथावले, असा दावा पुणे पोलिसांनी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे केला आहे.कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी आरोपी असलेले अरुण फरेरा यांच्या जामीन अर्जाला विरोध करताना पुण्याचे साहाय्यक आयुक्त शिवाजी पवार यांनी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले. फरेरा यांच्यासह वर्नोन गोन्साल्विस, सुधा भारद्वाज, पी. वरावरा राव, गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांनाही या प्रकरणी आरोपी केले आहे. फरेरा आणि गोन्साल्विस यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी न्या. पी. एन. देशमुख यांच्या एकसदस्यीय खंडपीठापुढे झाली. या याचिकांवरील सुनावणी ५ एप्रिलपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.प्रतिज्ञापत्रानुसार, फरेरा आणि अन्य आरोपी बंदी घातलेल्या सीपीआयचे (माओवादी) वरिष्ठ सदस्य आहेत. कायद्याने स्थापित केलेले सरकार हटविण्यासाठी प्रतिबंधित कारवाया करण्यासाठी ते पाठिंबा देतात. सीपीआयला सत्ता हवी आहे आणि ती मिळविणे, हाच त्यांचा उद्देश आहे, हे चौकशीत निष्पन्न झाले.हेतू साध्य करण्यासाठी संघटनेने जुन्या पारंपरिक पद्धतीने युद्ध छेडले नाही; तर लोकांना एकत्र आणून त्यांना चिथावणी देऊन युद्ध छेडले. दलितांच्या स्वाभिमानासाठी, भेदभाव, उच्चभ्रूंकडून होणारे शारीरिक हल्ले या मुद्द्यांवरून सीपीआय त्यांना एकत्र आणून उद्दिष्ट साध्य करू पाहात आहेत, असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.३१ डिसेंबर २०१७ च्या एल्गार परिषदेत फरेरा आणि अन्य आरोपींनी भावना भडकाविणारे भाषण केले. यावेळी दलित समाज मोठ्या प्रमाणावर सहभागी होता. सीपीआयने या परिषदेसाठी निधी पुरविला, असा दावा पोलिसांनी केला आहे. धर्म, जातीच्या नावाखाली लोकांमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी फरेरा व अन्य आरोपींनी एल्गार परिषदेत लोकांमध्ये पॅम्पलेट वाटली. एल्गार परिषदेत दिलेल्या भाषणांचे फलित म्हणजे १ जानेवारी २०१८ चा कोरेगाव भीमा हिंसाचार आहे, असे पोलिसांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. काही महत्त्वाच्या कागदपत्रांवरून, आरोपींच्या घरातून जमा केलेल्या पुराव्यांवरून आरोपी फौजदारी कटात सहभागी असून घडलेल्या गुन्ह्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचा दावा पोलिसांनी न्यायालयात केला.‘दहशत निर्माण करणे हेच ध्येय’काही सक्रिय सदस्यांनी या दलित वर्गाला पद्धतशीर एकत्र आणले. फरेरा, गोन्साल्विस सीपीआयचे वरिष्ठ सदस्य आहेत आणि नवीन सदस्यांना भरती करण्याचे काम या दोघांवर आहे. हिंसाचार करून, समाजात तेढ निर्माण करून केंद्र व राज्य सरकारला हटविण्याचे सीपीआयचे उद्दिष्ट आहे. महत्त्वाच्या व्यक्तींची हत्या करणे, दहशत निर्माण करणे, हे संघटनेचे ध्येय आहे,’ असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

टॅग्स :Bhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचार