शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कोपर्डे हवेलीच्या चवळीला मुंबईत भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 11:12 IST

क-हाड तालुक्यातील कोपर्डे हवेली (जि. सातारा) येथील शेतकरी मधुकर चव्हाण यांनी संकरित चवळीचे पीक घेतले असून, या शेंगेला मुंबईच्या बाजारपेठेत चांगला भाव मिळत आहे.

शंकर पोळ (कोपर्डेहवेली, सातारा)

कमी खर्चात जादा उत्पादन देणारी माळव्याची पिके शेतकरी घेतात. कधी दर मिळतो, तर कधी दराअभावी उत्पादन खर्चही निघत नाही, तर कमी खर्च करून घेतलेली पिकेही फायद्याची ठरतात. असेच पीक क-हाड तालुक्यातील कोपर्डे हवेली (जि. सातारा) येथील शेतकरी मधुकर चव्हाण यांनी घेतले. त्यांनी संकरित चवळीचे पीक घेतले असून, या शेंगेला मुंबईच्या बाजारपेठेत चांगला भाव मिळत आहे.

कोपर्डे हवेली येथील मधुकर चव्हाण यांनी कमी खर्चाचे व कमी दिवसांत जादा उत्पादन देणाऱ्या चवळीचे पीक घेतले आहे. २५ गुंठे क्षेत्रावर या पिकाची लागवड करण्यात आली असून, अंतर्गत भुईमुगाचे पीक आहे. साडेचार फुटी सरीत जूनच्या पहिल्या आठवड्यात संकरित चवळीचे टोकण केले. वेल दोन फुटांचे झाल्यानंतर ते तारेवर चढवले. ६५ दिवस पूर्ण झाल्यानंतर चवळीचे तोडे सुरू झाले. एका चवळी शेंगेची लांबी दीड ते दोन फुटांची असून, गडद हिरव्या रंगाची शेंग आहे.

या शेंगा विक्रीसाठी मुंबईच्या बाजारपेठेत पाठवल्या जातात. एका पेंढीत ४० ते ४५ शेंगा बसतात. एक दिवसाआड करून त्याचे तोडे सुरू आहेत. २५० ते ३०० किलो शेंगा मिळतात. इतर माळव्याच्या पिकाच्या तुलनेत चवळीला बरा दर मिळत आहे. सध्याचा दर मुंबई बाजारपेठेत दहा किलोला साधारणपणे २०० ते २५० रुपये आहे. त्यामुळेच ही चवळी मार्के टमध्ये चांगला भाव खात आहे. आतापर्यंत चव्हाण यांचे चवळीचे चार तोडे झाले आहेत. एका तोड्याचा खर्च जाऊन चार ते साडेचार हजार रुपये मिळाले आहेत.

चवळीच्या पिकाचा कालावधी पाच महिन्यांचा आहे. १०० दिवस पूर्ण झाल्यानंतर चवळीच्या उत्पादनात वाढ होणार आहे. महिन्याला ६० हजारांचे उत्पन्न धरले, तर पाच महिन्यांत अंदाजे तीन लाख होतात. खर्च वजा करता चव्हाण यांना अडीच लाखांचा नफा होऊ शकतो. आतापर्यंत १५ हजार रुपये उत्पादन खर्च झाला आहे. या परिसरात संकरित चवळीच्या शेंगांचे प्रथमच उत्पादन घेतले आहे. त्यामुळे अनेक शेतकरी भेटी देत आहेत. अनेकांनी माहिती घेऊन आपल्या जमिनीत चवळी शेंगेचा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या भागात चवळीचे आणखी क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.

चवळीच्या शेंगेला मागणी वाढली असून, साधारणपणे २५ ते ३० रुपये किलो दराने चवळी बाजारात विक्री होत आहे. नाशिक, अकोला जिल्ह्यातील चवळीचे पीक सातारा जिल्ह्यात आले असून, वातावरण पोषक असल्याने भविष्यात या पीक क्षेत्रात वाढ होणार आहे. चवळीच्या शेंगांचे उत्पादन पहिल्यांदाच घेतले असून, मुंबई बाजारपेठेत इतर पिकांच्या तुलनेत जादा दर मिळत आहे, शेंगा भरपूर आहेत, असाच दर राहिला तर खर्च वजा जाता पाच महिन्यांत दोन ते अडीच लाखांचा नफा अपेक्षित आहे, असे मधुकर चव्हाण यांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीvegetableभाज्याMumbaiमुंबई