शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

कोपर्डे हवेलीच्या चवळीला मुंबईत भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 11:12 IST

क-हाड तालुक्यातील कोपर्डे हवेली (जि. सातारा) येथील शेतकरी मधुकर चव्हाण यांनी संकरित चवळीचे पीक घेतले असून, या शेंगेला मुंबईच्या बाजारपेठेत चांगला भाव मिळत आहे.

शंकर पोळ (कोपर्डेहवेली, सातारा)

कमी खर्चात जादा उत्पादन देणारी माळव्याची पिके शेतकरी घेतात. कधी दर मिळतो, तर कधी दराअभावी उत्पादन खर्चही निघत नाही, तर कमी खर्च करून घेतलेली पिकेही फायद्याची ठरतात. असेच पीक क-हाड तालुक्यातील कोपर्डे हवेली (जि. सातारा) येथील शेतकरी मधुकर चव्हाण यांनी घेतले. त्यांनी संकरित चवळीचे पीक घेतले असून, या शेंगेला मुंबईच्या बाजारपेठेत चांगला भाव मिळत आहे.

कोपर्डे हवेली येथील मधुकर चव्हाण यांनी कमी खर्चाचे व कमी दिवसांत जादा उत्पादन देणाऱ्या चवळीचे पीक घेतले आहे. २५ गुंठे क्षेत्रावर या पिकाची लागवड करण्यात आली असून, अंतर्गत भुईमुगाचे पीक आहे. साडेचार फुटी सरीत जूनच्या पहिल्या आठवड्यात संकरित चवळीचे टोकण केले. वेल दोन फुटांचे झाल्यानंतर ते तारेवर चढवले. ६५ दिवस पूर्ण झाल्यानंतर चवळीचे तोडे सुरू झाले. एका चवळी शेंगेची लांबी दीड ते दोन फुटांची असून, गडद हिरव्या रंगाची शेंग आहे.

या शेंगा विक्रीसाठी मुंबईच्या बाजारपेठेत पाठवल्या जातात. एका पेंढीत ४० ते ४५ शेंगा बसतात. एक दिवसाआड करून त्याचे तोडे सुरू आहेत. २५० ते ३०० किलो शेंगा मिळतात. इतर माळव्याच्या पिकाच्या तुलनेत चवळीला बरा दर मिळत आहे. सध्याचा दर मुंबई बाजारपेठेत दहा किलोला साधारणपणे २०० ते २५० रुपये आहे. त्यामुळेच ही चवळी मार्के टमध्ये चांगला भाव खात आहे. आतापर्यंत चव्हाण यांचे चवळीचे चार तोडे झाले आहेत. एका तोड्याचा खर्च जाऊन चार ते साडेचार हजार रुपये मिळाले आहेत.

चवळीच्या पिकाचा कालावधी पाच महिन्यांचा आहे. १०० दिवस पूर्ण झाल्यानंतर चवळीच्या उत्पादनात वाढ होणार आहे. महिन्याला ६० हजारांचे उत्पन्न धरले, तर पाच महिन्यांत अंदाजे तीन लाख होतात. खर्च वजा करता चव्हाण यांना अडीच लाखांचा नफा होऊ शकतो. आतापर्यंत १५ हजार रुपये उत्पादन खर्च झाला आहे. या परिसरात संकरित चवळीच्या शेंगांचे प्रथमच उत्पादन घेतले आहे. त्यामुळे अनेक शेतकरी भेटी देत आहेत. अनेकांनी माहिती घेऊन आपल्या जमिनीत चवळी शेंगेचा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या भागात चवळीचे आणखी क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.

चवळीच्या शेंगेला मागणी वाढली असून, साधारणपणे २५ ते ३० रुपये किलो दराने चवळी बाजारात विक्री होत आहे. नाशिक, अकोला जिल्ह्यातील चवळीचे पीक सातारा जिल्ह्यात आले असून, वातावरण पोषक असल्याने भविष्यात या पीक क्षेत्रात वाढ होणार आहे. चवळीच्या शेंगांचे उत्पादन पहिल्यांदाच घेतले असून, मुंबई बाजारपेठेत इतर पिकांच्या तुलनेत जादा दर मिळत आहे, शेंगा भरपूर आहेत, असाच दर राहिला तर खर्च वजा जाता पाच महिन्यांत दोन ते अडीच लाखांचा नफा अपेक्षित आहे, असे मधुकर चव्हाण यांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीvegetableभाज्याMumbaiमुंबई