शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
2
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
3
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
4
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
5
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
6
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
7
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
8
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
9
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र; सर्व धर्मीयांनी केला पाकचा निषेध- परराष्ट्र सचिव
10
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
11
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
12
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
13
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
14
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
15
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
16
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
17
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
18
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
19
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
20
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त

सलग चौथ्यावेळीही राज्यात अव्वल ठरणार ‘कोकण पॅटर्न’?

By admin | Updated: June 8, 2015 00:50 IST

कोकण विभागीय मंडळांतर्गत दोन्ही जिल्ह्यात राबवण्यात येणारे शैक्षणिक उपक्रम, गुणवत्ता विकास कार्यक्रम यामुळे कोकण विभाग राज्यात अव्वल आहे,

सागर पाटील -टेंभ्ये -महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल उद्या (सोमवार) दुपारी १ वाजता आॅनलाईन जाहीर होणार आहे. गेली सलग तीन वर्षे कोकण विभागाने राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. चौथ्या वर्षीदेखील कोकण विभाग राज्यात अव्वल असेल, असा विश्वास शिक्षण क्षेत्रातून व्यक्त केला जात आहे. तसे झाल्यास राज्यात कोकण पॅटर्न आपला वेगळा ठसा निर्माण करणार आहे. सलग चार वर्षे राज्यात प्रथम येण्याचा बहुमान केवळ कोकण विभागीय मंडळाच्या नावे नोंद होईल, असा विश्वास कोकणवासीयांच्यावतीने व्यक्त केला जात आहे.कोकण विभागीय मंडळांतर्गत दोन्ही जिल्ह्यात राबवण्यात येणारे शैक्षणिक उपक्रम, गुणवत्ता विकास कार्यक्रम यामुळे कोकण विभाग राज्यात अव्वल आहे, असे मत शिक्षण क्षेत्रातील जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे. यापूर्वी राज्यामध्ये लातूर पॅटर्न सुपरिचित होता. परंतु सलग तीन वर्षे राज्यात प्रथम येण्याची हॅट्ट्रिक साधून कोकणाने आपले वेगळेपण जपले आहे.रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राबविण्यात येणारे शैक्षणिक उपक्रम, शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती, शालेय शिस्त, शिक्षकांकडून केले जाणारे अथक प्रयत्न, पालकांचे सहकार्य व विद्यार्थ्यांची जिद्द यामुळेच गेली तीन वर्षे कोकण विभागीय मंडळाने राज्यात अव्वल स्थान मिळविले आहे.यावर्षी कोकण विभागीय मंडळांतर्गत ४१,५५५ विद्यार्थी इयत्ता दहावीच्या परीक्षेला प्रविष्ठ झाले आहेत. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील २७,९७७, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १३,५७८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. दोन्ही जिल्ह्यात मिळून १०३ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती. सोमवारी दुपारी १ वाजता आॅनलाईन निकाल जाहीर होणार आहे. आता प्रतीक्षा आहे ती कोकणच अव्वल ठरणार का याची..!कोकण विभागीय मंडळांतर्गत येणाऱ्या रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांमध्ये असणारी विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय आहे. राज्यातील अन्य विभागीय मंडळाच्या तुलनेत कोकणातील विद्यार्थी नियमित शाळेत उपस्थित राहणारे आहेत. यामुळे निकालाची टक्केवारी वाढण्यास मदत होते.- आर. बी. गिरी, -प्रभारी अध्यक्ष, कोकण बोर्डकोकण विभागीय मंडळाने आपले स्वतंत्र अस्तित्व राज्यामध्ये निर्माण केले आहे. यामुळे राज्यात वैशिष्ट्यपूर्ण असा कोकण पॅटर्न निर्माण झाला आहे. शाळांमध्ये विद्यार्थी व शिक्षकांमध्ये दिसून येणारी शिस्त राज्यात अन्यत्र पाहायला मिळत नाही. यामुळेच कोकण विभाग राज्यात गेली ३ वर्षे अव्वल आहे. पालकांची विद्यार्थ्याला शिकवण्याची जिद्द वाखाणण्याजोगी आहे.- किरण लोहार, सहसचिव, कोकण विभाग.कोकण विभागाने राज्यात स्वतंत्र कोकण पॅटर्न निर्माण करण्यामागे खऱ्या अर्थाने सर्व शालेय घटकांची मेहनत महत्त्वाची आहे. दोन्ही जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमांमुळे गुणवत्ता वाढीस मदत मिळत असल्याचे मत रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेंद्र अहिरे यांनी व्यक्त केले.