शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
वंचित, कष्टकऱ्यांसाठी लढणारा महान संघर्षयोद्धा हरपला; बाबा आढाव यांच्या निधनानंतर पवार-फडणवीसांकडून म्हणून श्रद्धांजली
3
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
4
"असदुद्दीन ओवेसींचे पूर्वज हिंदू होते, ब्राह्मण कुटुंबात झाला होता जन्म" बृजभूषण शरण सिंह यांचा दावा 
5
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
6
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
7
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
8
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
9
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
10
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
11
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
12
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
13
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
14
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
15
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
16
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
17
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
18
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
19
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
20
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर, सांगलीवर भीषण जलसंकट; ४५० गावे महापुरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 06:14 IST

लष्कराचे मदतकार्य युद्धपातळीवर; ९४ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविले

कोल्हापूर/सांगली/मुंबई : पंचगंगा, कोयना, वारणा, कृष्णा या पश्चिम व दक्षिण महाराष्ट्राच्या जीवनवाहिनी असलेल्या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा व पुणे जिल्ह्यातील सुमारे ४५० गावे महापुराच्या वेढ्यात अडकली आहेत, तर चार जणांना जलसमाधी मिळाली आहे. लष्कर, नौदल, एनडीआरएफ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने सुमारे ९४ हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. मदतकार्य वेगात सुरू असून चार विमाने व दोन हेलिकॉफ्टर दाखल झाली आहेत.गेल्या तीन दिवसांपासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील २0४ गावे पंचगंगा नदीच्या महापुरात अडकली आहेत. लष्कराच्या मदतीने ६0 हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलविले असले, तरी करवीर तालुक्यातील चिखली गावांत २ हजार लोक अडकले आहेत. पावसाचा जोर कायम आहे. पंचगंगेची पाणीपातळी बुधवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५५.४ फूट होती. ती धोक्याच्या पातळीपेक्षा तब्बल १३ फुटांवरून वाहू लागल्याने अक्षरश: जलप्रलय झाला आहे. शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कोल्हापुरात एनडीआरएफची २२ पथके आहेत. मुख्य सचिवांनी केंद्रीय सुरक्षा सचिवांशी संपर्क साधून डोनिअर विमानांद्वारे पूरग्रस्तांचे स्थलांतर करण्याची विनंती केली.सांगली जिल्हा निम्मा पाण्यातकृष्णा, वारणा नद्यांच्या महापुरांनी सांगली जिल्ह्यात हाहाकार उडाला असून, नदीकाठची हजारो लोकवस्ती पाण्याखाली गेली आहे. महापुराने निम्मे सांगली शहर कवेत घेतले आहे. सांगलीत सायंकाळी पाच वाजता आयर्विन पुलाजवळ कृष्णेची पातळी ५५.४ फुटांवर पोहोचली होती. सांगली जिल्ह्यातील ५३ हजारांवर लोकांचे, तर १६ हजार जनावरांचे स्थलांतर करण्यात आले असून, हजारो लोक महापुरात अडकूनच आहेत. पुणे जिल्ह्यात शहरासह ६४ गावे पुराने प्रभावित झाली असून, सुमारे ३,३४३ लोकांना मदत करण्यात आली आहे. पूरग्रस्तांसाठीच्या मदत छावण्यांमध्ये गहू आणि तांदळाचे वाटप करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील सर्व धरणे शंभर टक्के भरली आहेत. रायगड जिल्ह्यात ८ तालुके बाधित असून, सरासरीच्या १०५ टक्के पाऊस झाला आहे. सुमारे तीन हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ३८ धरणे १०० टक्के भरली आहेत. पुरामुळे १३ गावे बाधित झाली आहेत. नाशिक जिल्ह्यात गेल्या ५० वर्षांतील सर्वाधिक विसर्ग सुरू असून, सर्व धरणे ८० टक्क्यांपेक्षा अधिक भरली आहेत. ठाणे जिल्ह्यातील १३ हजार नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले.मुख्यमंत्र्यांनी घेतला पूरस्थितीचा आढावामुंबई : राज्यात ज्या भागात पूर ओसरला आहे, तेथे पिण्याचे शुद्ध पाणी, आरोग्य सुविधा आणि वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज राहावे. पिण्याच्या पाण्याच्या नळजोडण्या पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करावेत. दुर्गम भागात आदिवासी पाड्यांमध्ये, तसेच पूरग्रस्तांसाठीच्या मदत छावण्यांमध्ये अन्न-धान्य, पिण्याचे पाणी आदी सुविधा पुरविण्यात याव्यात. रेल्वे यंत्रणेला पाऊस आणि धरणांच्या विसर्गाबाबतची माहिती देण्याची व्यवस्था करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरSangli Floodसांगली पूर