शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

कोल्हापूर, सांगलीवर भीषण जलसंकट; ४५० गावे महापुरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 06:14 IST

लष्कराचे मदतकार्य युद्धपातळीवर; ९४ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविले

कोल्हापूर/सांगली/मुंबई : पंचगंगा, कोयना, वारणा, कृष्णा या पश्चिम व दक्षिण महाराष्ट्राच्या जीवनवाहिनी असलेल्या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा व पुणे जिल्ह्यातील सुमारे ४५० गावे महापुराच्या वेढ्यात अडकली आहेत, तर चार जणांना जलसमाधी मिळाली आहे. लष्कर, नौदल, एनडीआरएफ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने सुमारे ९४ हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. मदतकार्य वेगात सुरू असून चार विमाने व दोन हेलिकॉफ्टर दाखल झाली आहेत.गेल्या तीन दिवसांपासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील २0४ गावे पंचगंगा नदीच्या महापुरात अडकली आहेत. लष्कराच्या मदतीने ६0 हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलविले असले, तरी करवीर तालुक्यातील चिखली गावांत २ हजार लोक अडकले आहेत. पावसाचा जोर कायम आहे. पंचगंगेची पाणीपातळी बुधवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५५.४ फूट होती. ती धोक्याच्या पातळीपेक्षा तब्बल १३ फुटांवरून वाहू लागल्याने अक्षरश: जलप्रलय झाला आहे. शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कोल्हापुरात एनडीआरएफची २२ पथके आहेत. मुख्य सचिवांनी केंद्रीय सुरक्षा सचिवांशी संपर्क साधून डोनिअर विमानांद्वारे पूरग्रस्तांचे स्थलांतर करण्याची विनंती केली.सांगली जिल्हा निम्मा पाण्यातकृष्णा, वारणा नद्यांच्या महापुरांनी सांगली जिल्ह्यात हाहाकार उडाला असून, नदीकाठची हजारो लोकवस्ती पाण्याखाली गेली आहे. महापुराने निम्मे सांगली शहर कवेत घेतले आहे. सांगलीत सायंकाळी पाच वाजता आयर्विन पुलाजवळ कृष्णेची पातळी ५५.४ फुटांवर पोहोचली होती. सांगली जिल्ह्यातील ५३ हजारांवर लोकांचे, तर १६ हजार जनावरांचे स्थलांतर करण्यात आले असून, हजारो लोक महापुरात अडकूनच आहेत. पुणे जिल्ह्यात शहरासह ६४ गावे पुराने प्रभावित झाली असून, सुमारे ३,३४३ लोकांना मदत करण्यात आली आहे. पूरग्रस्तांसाठीच्या मदत छावण्यांमध्ये गहू आणि तांदळाचे वाटप करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील सर्व धरणे शंभर टक्के भरली आहेत. रायगड जिल्ह्यात ८ तालुके बाधित असून, सरासरीच्या १०५ टक्के पाऊस झाला आहे. सुमारे तीन हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ३८ धरणे १०० टक्के भरली आहेत. पुरामुळे १३ गावे बाधित झाली आहेत. नाशिक जिल्ह्यात गेल्या ५० वर्षांतील सर्वाधिक विसर्ग सुरू असून, सर्व धरणे ८० टक्क्यांपेक्षा अधिक भरली आहेत. ठाणे जिल्ह्यातील १३ हजार नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले.मुख्यमंत्र्यांनी घेतला पूरस्थितीचा आढावामुंबई : राज्यात ज्या भागात पूर ओसरला आहे, तेथे पिण्याचे शुद्ध पाणी, आरोग्य सुविधा आणि वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज राहावे. पिण्याच्या पाण्याच्या नळजोडण्या पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करावेत. दुर्गम भागात आदिवासी पाड्यांमध्ये, तसेच पूरग्रस्तांसाठीच्या मदत छावण्यांमध्ये अन्न-धान्य, पिण्याचे पाणी आदी सुविधा पुरविण्यात याव्यात. रेल्वे यंत्रणेला पाऊस आणि धरणांच्या विसर्गाबाबतची माहिती देण्याची व्यवस्था करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरSangli Floodसांगली पूर