शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
5
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
6
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
7
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
8
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
9
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
10
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
11
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
12
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
13
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
14
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
15
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
16
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
17
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
18
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
19
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
20
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध

पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक नागरी सहकारी बँका कोल्हापूर जिल्ह्यात, ठेवींत किती कोटींची वाढ.. जाणून घ्या

By राजाराम लोंढे | Updated: September 13, 2025 19:08 IST

स्पर्धेमुळेच कारभारावर अंकुश

राजाराम लोंढेकोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक ४५ नागरी सहकारी बँकाकोल्हापूर जिल्ह्यात आहेत. या सगळ्याच बँका आर्थिकदृष्ट्या ताकदवान असून, तब्बल २९ बँकांचा निव्वळ एनपीए शून्य टक्के आहे. यावरून बँकांची आर्थिक सक्षमता निश्चित होते. या बँकांच्या ठेवीत आर्थिक वर्षात तब्बल ९१८ कोटींची वाढ झाली असून, कर्जाच्या तुलनेत तिप्पटीने ठेवीमध्ये वाढ झाली आहे.बँका, पतसंस्था, साखर कारखाने, विकास संस्था, दूध संस्थांचे जाळे काेल्हापूर जिल्ह्यात विणले आहे. राज्याच्या तुलनेत कोल्हापुरात खऱ्या अर्थाने सहकार रुजला आणि वाढल्याने सहकार पंढरी म्हणून ओळखली जाते. इतर जिल्ह्यांत यापेक्षाही अधिक सहकारी संस्था असतील, पण इतक्या सक्षम संस्था महाराष्ट्रात एकाही जिल्ह्यात बघावयास मिळत नाहीत. त्याला येथील शेतकरी कारणीभूत मानला जातो. पश्चिम महाराष्ट्राचा विचार केल्यास सर्वाधिक संस्था कोल्हापुरात आहेतच, त्याचबरोबर वित्तीय संस्थांची संख्याही तुलनेत अधिक आहे. येथे ४१ नागरी सहकारी बँका, १३७२ नागरी, ग्रामीण सहकारी पतसंस्था, ३५० पगार नोकरांच्या पतसंस्था तर एक जिल्हा मध्यवर्ती अशा १७६८ वित्तीय संस्था कार्यरत आहेत.केवळ संस्थांची संख्या अधिक नाहीतर येथील वित्तीय संस्थांमध्ये वर्षाला होणारी प्रगती नेत्रदीपक आहे. मागील २०२३-२४ आर्थिक वर्षापेक्षा २०२४-२५ मध्ये नागरी बँकांच्या ठेवीमध्ये तब्बल ९१८ कोटींची वाढ झाली आहे. कर्जाचे वाटप ३५९ कोटींने अधिक झाले असले तरीही वसुलीचे प्रमाण खूप चांगले आहे. तब्बल २९ बँकांचा निव्वळ एनपीए शून्य टक्के आहे.

स्पर्धेमुळेच कारभारावर अंकुशयेथे नागरी बँकांची संख्या अधिक असल्याने व्यवसायात कमालीची स्पर्धा पाहावयास मिळते. कामकाज चुकीचे केले तर ग्राहक बाजूला जाईल, याची भीती बँक व्यवस्थापनाला असते. त्याचबरोबर या बँकांवरच स्थानिक राजकारण अवलंबून असल्याने नैतिक भीतीही प्रत्येकाच्या मनात असते.पश्चिम महाराष्ट्रात वित्तीय संस्थाजिल्हा - जिल्हा बँक - नागरी बँका - नागरी/ग्रामीण पतसंस्था - पगारदारांच्या पतसंस्था - एकूण संस्था कोल्हापूर - ०१ - ४५ - १३७२ - ३५० - १७६४ सांगली- ०१ - २० - १०२६ - १८० - १२२७ सातारा - ०१ - २२ - ६४७ - २११ - ८८१ 

कोल्हापुरातील बँकांचे विश्वस्त मंडळाबरोबरच सभासद, ग्राहकांचे कौतुक केले पाहिजे. येथे सुरुवातीपासून प्रत्येकाने आर्थिक शिस्त लावून घेतली आहे. त्यानुसारच कामकाज सुरू असल्याने नागरी सहकारी बँका अधिक ताकदीने काम करत आहेत.- अनिल नागराळे, बँकिंगतज्ज्ञ