शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
4
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
5
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
6
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
7
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
8
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
9
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
10
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
11
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
12
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
13
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
14
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
15
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
16
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
17
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
18
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
19
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
20
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक नागरी सहकारी बँका कोल्हापूर जिल्ह्यात, ठेवींत किती कोटींची वाढ.. जाणून घ्या

By राजाराम लोंढे | Updated: September 13, 2025 19:08 IST

स्पर्धेमुळेच कारभारावर अंकुश

राजाराम लोंढेकोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक ४५ नागरी सहकारी बँकाकोल्हापूर जिल्ह्यात आहेत. या सगळ्याच बँका आर्थिकदृष्ट्या ताकदवान असून, तब्बल २९ बँकांचा निव्वळ एनपीए शून्य टक्के आहे. यावरून बँकांची आर्थिक सक्षमता निश्चित होते. या बँकांच्या ठेवीत आर्थिक वर्षात तब्बल ९१८ कोटींची वाढ झाली असून, कर्जाच्या तुलनेत तिप्पटीने ठेवीमध्ये वाढ झाली आहे.बँका, पतसंस्था, साखर कारखाने, विकास संस्था, दूध संस्थांचे जाळे काेल्हापूर जिल्ह्यात विणले आहे. राज्याच्या तुलनेत कोल्हापुरात खऱ्या अर्थाने सहकार रुजला आणि वाढल्याने सहकार पंढरी म्हणून ओळखली जाते. इतर जिल्ह्यांत यापेक्षाही अधिक सहकारी संस्था असतील, पण इतक्या सक्षम संस्था महाराष्ट्रात एकाही जिल्ह्यात बघावयास मिळत नाहीत. त्याला येथील शेतकरी कारणीभूत मानला जातो. पश्चिम महाराष्ट्राचा विचार केल्यास सर्वाधिक संस्था कोल्हापुरात आहेतच, त्याचबरोबर वित्तीय संस्थांची संख्याही तुलनेत अधिक आहे. येथे ४१ नागरी सहकारी बँका, १३७२ नागरी, ग्रामीण सहकारी पतसंस्था, ३५० पगार नोकरांच्या पतसंस्था तर एक जिल्हा मध्यवर्ती अशा १७६८ वित्तीय संस्था कार्यरत आहेत.केवळ संस्थांची संख्या अधिक नाहीतर येथील वित्तीय संस्थांमध्ये वर्षाला होणारी प्रगती नेत्रदीपक आहे. मागील २०२३-२४ आर्थिक वर्षापेक्षा २०२४-२५ मध्ये नागरी बँकांच्या ठेवीमध्ये तब्बल ९१८ कोटींची वाढ झाली आहे. कर्जाचे वाटप ३५९ कोटींने अधिक झाले असले तरीही वसुलीचे प्रमाण खूप चांगले आहे. तब्बल २९ बँकांचा निव्वळ एनपीए शून्य टक्के आहे.

स्पर्धेमुळेच कारभारावर अंकुशयेथे नागरी बँकांची संख्या अधिक असल्याने व्यवसायात कमालीची स्पर्धा पाहावयास मिळते. कामकाज चुकीचे केले तर ग्राहक बाजूला जाईल, याची भीती बँक व्यवस्थापनाला असते. त्याचबरोबर या बँकांवरच स्थानिक राजकारण अवलंबून असल्याने नैतिक भीतीही प्रत्येकाच्या मनात असते.पश्चिम महाराष्ट्रात वित्तीय संस्थाजिल्हा - जिल्हा बँक - नागरी बँका - नागरी/ग्रामीण पतसंस्था - पगारदारांच्या पतसंस्था - एकूण संस्था कोल्हापूर - ०१ - ४५ - १३७२ - ३५० - १७६४ सांगली- ०१ - २० - १०२६ - १८० - १२२७ सातारा - ०१ - २२ - ६४७ - २११ - ८८१ 

कोल्हापुरातील बँकांचे विश्वस्त मंडळाबरोबरच सभासद, ग्राहकांचे कौतुक केले पाहिजे. येथे सुरुवातीपासून प्रत्येकाने आर्थिक शिस्त लावून घेतली आहे. त्यानुसारच कामकाज सुरू असल्याने नागरी सहकारी बँका अधिक ताकदीने काम करत आहेत.- अनिल नागराळे, बँकिंगतज्ज्ञ