शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
4
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
5
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
6
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
7
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
8
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
9
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
10
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
11
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
12
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
13
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
14
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
15
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
16
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
17
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
18
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
19
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
20
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत

कोजागिरीचा बकरा..

By admin | Updated: October 7, 2014 23:37 IST

.सरकारनामा

काल म्हणे साहेबांनी ईदनिमित्त सगळ्यांकडं अंजीर पाठवले. साखराळेच्या दगडी चाळीतूनच करंड्या रवाना झाल्या. तासगावच्या दोन करंड्या बिर्याणी चापत बसलेल्या संजयकाकांच्या हातात पडल्या. उघडून बघताच काका चपापले, पण गालातल्या गालात हसलेही. कारण एकात होते अंजीर आणि दुसऱ्यात खंजीर! काकांनी ओळखलं. त्यांनी घोरपडे सरकारांकडं अंजीर पाठवून दिले आणि खंजीर मात्र ठेवून घेतले, काही तासगावात वापरायला, तर काही ‘गोपी की टोपी’ हा प्रश्न चिघळल्यावर खानापुरात उपयोगाला येतील म्हणून! बारामतीच्या वस्तादांकडून मिळालेले खंजीराच्या वापराचे धडे साहेब आता चेल्यांनाही देताहेत. (याचा वापर पाठीत वार करण्यासाठी होतो म्हणे!) पंटरनं ही बातमी आबांपर्यंत पोहोचवलीच. शिरखुर्म्याचा वाडगा खाली ठेवून त्यांनी थेट रामपुरी चाकू काढला. सुभाषआप्पांना अर्ज ठेवायला सांगून त्यांनी एक वार केलाच होता. आता आटपाडीच्या तानाजी पाटलांची रसद अनिलभाऊंकडं पाठवून दुसरा वार केला. हे वार जसे काकांवर होते, तसे साहेबांवरही होते. आटपाडीच्या गढीतील अमरबापूंना ‘बॅकिंग’ देणाऱ्या साहेबांवर पुढूनच वार करायचा, हे आबांनी आधीच ठरवलं होतं. तानाजीच्या घरात जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद द्यायला विरोध झाल्यानंतर सभापतीपद द्यायचं आणि नंतर तानाजीला अनिलभाऊंकडं पाठवायचं ‘प्लॅनिंग’ आबांचंच होतं का, याचा साहेबांना अंदाज येईपर्यंत वार झाला होता. (बोलून-चालून आबाही त्याच तालमीतले! इस्लामपूरच्या अंजीर आणि खंजिरांचा अंदाज येताच कवठ्यातील काकांच्या गँगला ‘मोक्का’ लावून सरकारांना कसं एकटं पाडलं होतं... आठवतंय ना?)जतमध्ये शेंडगेंच्या प्रकाशअण्णांना आपल्या ‘गँग’मध्ये घेऊन आबांनी त्यांच्या हातात घड्याळ बांधलं. आपल्याला कवठ्यात प्रकाशअण्णांचं ‘कव्हर’ मिळंल आणि जतमध्ये जगतापांपुढं तयारीचा गडी दिल्याचंही दिसंल. शिवाय साहेबांच्या गँगची कणी कापल्याचं समाधानही पदरात पडंल... हा आबांचा हिशेब... पण साहेबही तयारीचे. त्यांनी जगतापांकडं आपल्या ‘गँग’मार्फत अंजिराची करंडी पाठवली. जाधवांच्या प्रभाकरपंतांकडं खंजीर पाठवून घड्याळाच्या हातावरच वार करायचा ‘मेसेज’ दिला...जाता-जाता : बकरी ईदच्या दुसऱ्यादिवशी कोजागिरी पौर्णिमा. ‘खंजीर, रामपुरी, कुकरी, बर्ची वगैरे वगैरे टाकून द्या’, असा ‘मेसेज’ खुद्द बारामतीच्या वस्तादांकडून आला. त्यामुळं आष्ट्याच्या शिंदेसाहेबांनी सगळ्यांना कोजागिरीच्या दुग्धपानासाठी बोलावलं. शरदाच्या टिपूर चांदण्यात मानसिंगभाऊ, अमरबापू, सुरेशअण्णा, मिरजेचे होनमोरे, शेंडगेंचे प्रकाशअण्णा आणि काही घड्याळवाले दुधाचे पेले घेऊन बसले. (पलूस-कडेगावकरांना तर हुडकून-हुडकून आणलं होतं.) साहेब आणि आबांची वाट बघणं सुरू होतं. चंद्र डोक्यावर आल्याशिवाय साहेब येणार नव्हते, तर ते आलेत म्हटल्यावर आबा येणार नव्हते! चंद्र डोक्यावर यायची वेळ झाली आणि आभाळ भरून आलं... ढगांची गर्दी झाली... काही ढग इस्लामपूरकडंनं तर काही तासगावकडंनं आल्याचं दिसलं... झालं. आता कुठला चंद्र दिसणार दुधाच्या पेल्यात? सगळे गडबडले. वाट पाहून कंटाळले. ‘कोजागिरीचा बकरा केला की काय आम्हाला...’ असं काहीतरी शिंदेसाहेबांच्या कानात सुरेशअण्णा म्हणाल्याचं पहाटे-पहाटे ऐकू आलं. ताजा कलम : सगळे उठल्याचं ‘पंटर’नं कळवलं... आणि आबांनी तासगावच्या गेस्ट हाऊसमध्ये शेळकेंच्या मटणाची फोड तोंडात घातली!- श्रीनिवास नागे