शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
2
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
3
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
5
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
6
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
7
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
8
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
9
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
10
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
11
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
12
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
13
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
14
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
15
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसेतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
16
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
17
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
18
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
19
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
20
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
Daily Top 2Weekly Top 5

Kisan Long March : जय किसान!, मोर्चेक-यांच्या सर्व मागण्या मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 06:54 IST

गेली सहा दिवस १८० किलोमीटर पायपीट करत मुंबईत धडकलेल्या शेतकरी, आदिवासींच्या अभूतपूर्व अशा लाल वादळापुढे नमते घेत राज्य सरकारने मोर्चेक-यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याने आंदोलनाची यशस्वी सांगता झाली.

मुंबई : गेली सहा दिवस १८० किलोमीटर पायपीट करत मुंबईत धडकलेल्या शेतकरी, आदिवासींच्या अभूतपूर्व अशा लाल वादळापुढे नमते घेत राज्य सरकारने मोर्चेक-यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याने आंदोलनाची यशस्वी सांगता झाली. मागण्या मान्य झाल्याची घोषणा होताच आझाद मैदानात ‘जय किसान’च्या ना-यासह टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.महाराष्टÑ किसान सभेच्या नेतृत्वाखाली नाशिकहून ६ मार्च रोजी निघालेला हजारो शेतकºयांचा लाँग मार्च रविवारी मुंबईत धडकला. मात्र मुंबईच्या जनजीवनात कुठेही अडथळा आला नाही. परीक्षेला जाणाºया विद्यार्थ्यांची अडचण होऊ नये म्हणून रात्रीतून हे मोर्चेकरी आझाद मैदानाकडे रवाना झाले. सोमवारी दुपारी एकच्या सुमारास मोर्चेकºयांचे शिष्टमंडळ विधानभवनात पोहोचले आणि तब्बल अडीच तास मुख्यमंत्री, काही मंत्री, विरोधी पक्षनेते, वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत त्यांची बैठक झाली. मोर्चेकºयांच्या सर्व मागण्या मान्य करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसे लेखी दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलन मागे घेण्यात आल्याची घोषणा माकपाचे आमदार जे.पी.गावित यांनी आझाद मैदानावर मोर्चेकºयांसमोर केली. मंत्री चंद्रकात पाटील, गिरीश महाजन आणि एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शेतकºयांना चर्चेचा तपशील वाचून दाखवण्यात आला. शेतकºयांच्या परतीसाठी मध्य रेल्वेने विशेष रेल्वेगाड्यांची व्यवस्था केली.१८० किमीच्या पायपिटीमुळे अनेक शेतकºयांचे पाय सोलून निघाले.सोशल मीडियावरही याबद्दल प्रचंडहळहळ व्यक्त होत होती. या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, एकनाथ शिंदे,पांडुरंग फुंडकर, विष्णू सावरा आणि सुभाष देशमुख हे मंत्री, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, शेकापचे आ. जयंत पाटील, आ. कपिल पाटील, किसान सभेचे सचिव कॉ. अजित नवले, राज्य अध्यक्ष किसन गुजर, माजी आमदार नरसय्या आडम, इंद्रजित गावित, इरफान शेख, उमेश देशमुख, सुनील चौधरी, सावळीरावम पवार आदी उपस्थित होते.>या मागण्या केल्या मान्य२००१-०८ दरम्यान वंचित शेतकºयांनाही कर्जमाफी कृषीबरोबरच मुदत कर्जालाही माफी केंद्राची वाट न पाहता बोंडअळी नुकसानभरपाईजीर्ण रेशन कार्ड बदलून मिळणार संजय गांधी, श्रावणबाळ योजनेचे मानधन वाढणार महाराष्ट्राचे पाणी गुजरातला देणार नाहीवनजमिनीचे दावे सहा महिन्यांत काढणार निकाली

टॅग्स :Kisan Sabha Long Marchकिसान सभा लाँग मार्च