शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

Kisan Long March : जय किसान!, मोर्चेक-यांच्या सर्व मागण्या मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 06:54 IST

गेली सहा दिवस १८० किलोमीटर पायपीट करत मुंबईत धडकलेल्या शेतकरी, आदिवासींच्या अभूतपूर्व अशा लाल वादळापुढे नमते घेत राज्य सरकारने मोर्चेक-यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याने आंदोलनाची यशस्वी सांगता झाली.

मुंबई : गेली सहा दिवस १८० किलोमीटर पायपीट करत मुंबईत धडकलेल्या शेतकरी, आदिवासींच्या अभूतपूर्व अशा लाल वादळापुढे नमते घेत राज्य सरकारने मोर्चेक-यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याने आंदोलनाची यशस्वी सांगता झाली. मागण्या मान्य झाल्याची घोषणा होताच आझाद मैदानात ‘जय किसान’च्या ना-यासह टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.महाराष्टÑ किसान सभेच्या नेतृत्वाखाली नाशिकहून ६ मार्च रोजी निघालेला हजारो शेतकºयांचा लाँग मार्च रविवारी मुंबईत धडकला. मात्र मुंबईच्या जनजीवनात कुठेही अडथळा आला नाही. परीक्षेला जाणाºया विद्यार्थ्यांची अडचण होऊ नये म्हणून रात्रीतून हे मोर्चेकरी आझाद मैदानाकडे रवाना झाले. सोमवारी दुपारी एकच्या सुमारास मोर्चेकºयांचे शिष्टमंडळ विधानभवनात पोहोचले आणि तब्बल अडीच तास मुख्यमंत्री, काही मंत्री, विरोधी पक्षनेते, वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत त्यांची बैठक झाली. मोर्चेकºयांच्या सर्व मागण्या मान्य करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसे लेखी दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलन मागे घेण्यात आल्याची घोषणा माकपाचे आमदार जे.पी.गावित यांनी आझाद मैदानावर मोर्चेकºयांसमोर केली. मंत्री चंद्रकात पाटील, गिरीश महाजन आणि एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शेतकºयांना चर्चेचा तपशील वाचून दाखवण्यात आला. शेतकºयांच्या परतीसाठी मध्य रेल्वेने विशेष रेल्वेगाड्यांची व्यवस्था केली.१८० किमीच्या पायपिटीमुळे अनेक शेतकºयांचे पाय सोलून निघाले.सोशल मीडियावरही याबद्दल प्रचंडहळहळ व्यक्त होत होती. या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, एकनाथ शिंदे,पांडुरंग फुंडकर, विष्णू सावरा आणि सुभाष देशमुख हे मंत्री, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, शेकापचे आ. जयंत पाटील, आ. कपिल पाटील, किसान सभेचे सचिव कॉ. अजित नवले, राज्य अध्यक्ष किसन गुजर, माजी आमदार नरसय्या आडम, इंद्रजित गावित, इरफान शेख, उमेश देशमुख, सुनील चौधरी, सावळीरावम पवार आदी उपस्थित होते.>या मागण्या केल्या मान्य२००१-०८ दरम्यान वंचित शेतकºयांनाही कर्जमाफी कृषीबरोबरच मुदत कर्जालाही माफी केंद्राची वाट न पाहता बोंडअळी नुकसानभरपाईजीर्ण रेशन कार्ड बदलून मिळणार संजय गांधी, श्रावणबाळ योजनेचे मानधन वाढणार महाराष्ट्राचे पाणी गुजरातला देणार नाहीवनजमिनीचे दावे सहा महिन्यांत काढणार निकाली

टॅग्स :Kisan Sabha Long Marchकिसान सभा लाँग मार्च