शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
2
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
3
डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
4
प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, समोर आलं असं कारण
5
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
6
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
7
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
8
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!
9
आलिया भटच्या 'अल्फा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली, 'या' कारणामुळे घेतला निर्णय
10
खळबळजनक! बायकोची हत्या; मृतदेहासह दीड वर्षांच्या लेकाला खोलीत बंद करून पळाला नवरा
11
IAS बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं...; UPSC तयारी करणाऱ्या युवतीने का उचललं टोकाचं पाऊल?
12
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
13
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
15
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
16
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
17
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
18
Tulsi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
19
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
20
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास

कीर्तिकर-कदम वाद, मुख्यमंत्र्यांकडून संवाद, भेटीनंतर रामदास कदम म्हणाले, १०० टक्के वाद मिटला, पण... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2023 20:38 IST

Gajanan Kirtikar- Ramdas Kadam Dispute: भविष्यात आपापसात वाद झाले तर  ते मुख्य नेत्यांकडे बोललं पाहिजे. प्रेसनोट काढून माध्यमांकडे जाऊ नये, अशी सूचना कीर्तिकर यांना द्यावी, अशी विनंती मी मुख्यमंत्र्यांकडे केली, असेही रामदास कदम म्हणाले. 

शिंदे गटातील दोन ज्येष्ठ नेते असलेल्या रामदास कदम आणि खासदार गजानन कीर्तिकर यांच्यात रंगलेल्या वादामुळे शिवसेना शिंदे गटाची कोंडी झाली होती. गजानन कीर्तिकर यांनी प्रेसनोटमधून गद्दार असा उल्लेख करत आरोप केल्यानंतर संतप्त झालेल्या रामदास कदम यांनी गजानन कीर्तिकर यांच्यावर बेछूट आरोप केले होते. दरम्यान, या वादानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही नेत्यांशी संवाद साधला होता. आता मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर हा वाद १०० टक्के मिटला आहे, असे रामदास कदम यांनी सांगितले आहे. आता भविष्यात आपापसात वाद झाले तर  ते मुख्य नेत्यांकडे बोललं पाहिजे. प्रेसनोट काढून माध्यमांकडे जाऊ नये, अशी सूचना कीर्तिकर यांना द्यावी, अशी विनंती मी मुख्यमंत्र्यांकडे केली, असेही रामदास कदम म्हणाले. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर रामदास कदम म्हणाले की, गजानन कीर्तिकर आणि रामदास कदम यांच्यामध्ये दिवाळीत फटाके फुटत होते. दिवाळीमध्ये शिमगादेखील लोकांना पाहायला मिळाला. तो भविष्यात दोघांकडून होता कामा नये. कीर्तिकर काल मुख्यमंत्र्यांना भेटून आले. त्यांची भूमिका सांगितली. मी मुख्यमंत्र्याना सांगितलं की, भविष्यात आपापसात वाद झाले तर  ते मुख्य नेत्यांकडे बोललं पाहिजे. प्रेसनोट काढून माध्यमांकडे जाऊ नये, अशी सूचना कीर्तिकर यांना द्यावी, अशी विनंती मी मुख्यमंत्र्यांकडे केली. सर्वजण आपल्यावर विश्वास ठेऊन आले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत उद्धव ठाकरे गटापेक्षा कितीतरी जास्त यश आपल्याला मिळालं आहे. अशा परिस्थितीत दोन नेतेच आपापसात भांडताहेत हे चित्र योग्य नाही. याची जाणीव मलाही आहे, असे रामदास कदम यांनी सांगितले.

यावेळी वैयक्तिक आरोप करणं कितपत योग्य आहे असं विचारलं असता रामदास कदम म्हणाले की, मी कीर्तिकर यांच्याबाबत जी विधानं केली ती अगदी योग्य होती, असं मला वाटतं. कारण कीर्तिकर यांनी रामदास कदम यांच्यावर गद्दारीचा शिक्का आहे. असे बोलणं योग्य आहे का? पक्षासाठी मी कफन बांधून लढलोय. निष्ठावंत शिवसैनिक म्हणून माझ्याकडे पाहिलं जातं. कुठलीही शाहनिशा न करता मला राजकारणातून संपवण्याकरता एखादी प्रेसनोट काढणं हे कितपण योग्य आहे. असा सवालही रामदास कदम यांनी उपस्थित केला. या प्रेसनोटमध्ये गजानन कीर्तिकर यांनी लिहिलंय की ३३ वर्षांपूर्वी मी त्यांना कांदिवलीमध्ये पाडण्याचा प्रयत्न केला होता. पण कांदिवलीला शाखाप्रमुख म्हणून मी जे काम केलं होतं, त्या जोरावर गजानन कीर्तिकर निवडून आले होते. आता एवढ्या वर्षांनंतर कीर्तिकरांना मी त्यांना पाडण्याचा प्रयत्न केला होता, याची आठवण झाली का, आपण एक बोट दाखवतो तेव्हा चार बोटं आपल्याकडे असतात. हे लक्षात ठेवलं पाहिजे असेही कदम यांनी यावेळी सांगितले. आता भविष्यात असं काही बोलायचं नाही. जर काही प्रश्न असतील तर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे मांडायचे असे निश्चित झाले आहे, असेही रामदास कदम म्हणाले.

आता मी प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून गजानन कीर्तिकर यांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो. आमच्यातील वाद संपला आहे. १०० टक्के मिटला आहे. कुठेही मनात शंका राहिलेली नाही. उत्तर-पश्चिम मतदारसंघामध्ये गजानन कीर्तिकर खासदार आहेत. तेच निवडणूक लढवतील. ते निवडणूक लढवत असतील तर मला काहीही अचडण नाही. मला पक्षामध्ये मतभेद ठेवायचे नाहीत. मी मुख्यमंत्र्यांना शब्द दिला आहे, त्यानुसार मी हा वाद थांबवतोय, असेही रामदास कदम यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Ramdas Kadamरामदास कदमGajanan Kirtikarगजानन कीर्तीकरEknath Shindeएकनाथ शिंदे