शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

'त्या' तोतऱ्यावर महाराष्ट्राला अभिमान; किरीट सोमय्यांचा उद्धव ठाकरेंसह हसन मुश्रीफांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2023 13:20 IST

उद्धव ठाकरे सरकारने कमी उद्धटपणा केला होता का? अडीच वर्ष सरकार होते पण मला हात लावू शकले नाहीत. कारण मी काहीही चुकीचे केले नाही असं सोमय्या म्हणाले.

मुंबई - हसन मुश्रीफांनी कोट्यवधीची लूट केलीय, भ्रष्टाचार केला हे सत्य आहे. आयकर, ईडी, सीबीआय, सहकार मंत्रालयाने सगळ्यांनी चौकशी केली. हा घोटाळा १०० कोटींपेक्षा जास्त आहे. त्यामुळे कारवाई तर होणारच. ४० हजार शेतकऱ्यांच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार केलीत. शेतकऱ्यांकडून १० हजार घेतलेत. ते शेतकरी कुठे आहेत? हसन मुश्रीफ कुटुंबाने मनी लॉन्ड्रिंग केली आहे. सेटलमेंटचे अर्ज का केले? आयकर खात्याच्या ऑर्डरविरोधात हायकोर्टात कोण गेले? चोरी केली ती पकडली गेली त्यामुळे आता सेटलमेंटची भाषा करावी लागली असा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्यांनी केला आहे. 

किरीट सोमय्या म्हणाले की, राज्यातील जनतेला लुटले, पैसे परत केले. १ डझन नेत्यांवर आताही चौकशी, कारवाई सुरू आहे. न्यायालयावर आमचा विश्वास आहे. अनिल परब, सदानंद कदम यांच्यावर कारवाई सुरू आहे. अनिल परबांवर १२ खटले आहेत. उद्धव ठाकरेंचे भागीदार रवींद्र वायकर यांनी लहान मुलांच्या खेळाच्या मैदानावर ५०० कोटी रुपयांचे हॉटेल बांधले. या लुटारूंना हिशोब द्यावा लागेल असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत उद्धव ठाकरे सरकारने कमी उद्धटपणा केला होता का? अडीच वर्ष सरकार होते पण मला हात लावू शकले नाहीत. कारण मी काहीही चुकीचे केले नाही. ९१ वर्षाच्या आईवर आरोप केले. पत्नी-मुलांवर आरोप केले. आम्ही कुठल्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहे. विरोधी पक्ष एकत्र येतात, पत्रक काढतात. जर मी गुन्हा केला, दादागिरी केली तर मला अटक का केली नाही? माझ्यावर इतके गुन्हे दाखल केले पण सिद्ध झाले नाही. धमक्या देणे बंद करा. लुटीचा पैसा जनतेच्या तिजोरीत जमा करा असंही किरीट सोमय्यांनी म्हटलं. 

दरम्यान, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून कोट्यवधीचे बोगस कर्ज घेतले ते परत करा. चोरी केली ही कबूल करा. शिक्षेला सामोरे जा. हसन मुश्रीफांवर अडीच वर्षाच्या काळापासून कारवाई सुरू आहे. उद्धव ठाकरेंनी कारवाई दाबण्याचा प्रयत्न केला. आता हे घोटाळे बाहेर आले. भाजपा नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होते मग कारवाई का केली नाही. आजही पुरावे असतील तर कोर्टात जा, संबंधित यंत्रणांना भेटा असं आव्हान किरीट सोमय्यांनी विरोधकांना केले आहे. 

'त्या' तोतऱ्यावर महाराष्ट्राला अभिमान प्रत्येकाची पीडा समजून घेतली पाहिजे. ठाकरे म्हणतात, तोतऱ्या, ज्यांची संस्कृती तशी भाषा, या तोतऱ्याने तुमच्या बायकोचे १९ बंगले पाडले, गायब केले त्याबाबत हिशोब द्या ना. या तोतऱ्यावर महाराष्ट्राला अभिमान आहे. ज्या शिव्या द्यायच्या त्या द्या. १९ बंगले कुठे गायब केले त्याचे उत्तर द्या असं आव्हान किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंना दिलं आहे.  

टॅग्स :Kirit Somaiyaकिरीट सोमय्याUddhav Thackerayउद्धव ठाकरेHasan Mushrifहसन मुश्रीफ