शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
3
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
4
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
5
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
6
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
7
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
8
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
9
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
10
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
11
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
12
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
13
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
14
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
15
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
16
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
17
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
18
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
19
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
20
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
Daily Top 2Weekly Top 5

“उद्धवा अजब तुझे सरकार”; कोरेगाव भीमाच्या मुद्यावरून किरीट सोमय्यांची सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2020 15:57 IST

माझा निर्णय फिरविण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुरुवारी सांगितले होते.

मुंबई : कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएकडे वर्ग करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. तसेच, माझा निर्णय फिरविण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुरुवारी सांगितले होते. यावरूनच भाजपने आता उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. तर "उद्धवा अजब तुझे सरकार" असा खोचक टोला भाजप नेते किरीट सोमय्या यांनी लगवाला आहे.

सोमय्या यांनी ट्वीट करत म्हंटले आहे की, भीमा कोरेगाव प्रकरणात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार 22 डिसेंबरला सांगतात एसआयटीमार्फत चौकशी करावी. त्यांनतर 23 जानेवारीला याविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार पोलिसांना निर्देश देतात. तर लगेच 24 जानेवारीला शरद पवार मुख्यमंत्री यांना पत्र पाठवतात. पवारांनी पत्र पाठवताच दुसऱ्या दिवशी 25 जानेवारीला एनआयए हा तपासा स्वता:कडे घेण्याचा प्रयत्न करतात.

एनआयएकडे तपास वर्ग होत असल्याने 27 जानेवारीला राज्य सरकार कडाडून याला विरोध करतात. पुढे हे प्रकरण न्यायालयात गेले. त्यांनतर आता 13 फेबुवारीला महराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख सांगतात की मुख्यमंत्री यांनी निर्देश दिले आहे की, हे तपास आता एनआयएकडे वर्ग करण्यात यावे. त्यामुळे "उद्धवा अजब तुझे सरकार” असे म्हणत किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.