शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यातून खोतकर, गोरंट्याल यांच्या पुत्रांची वडिलांच्या विजयासाठी जोरदार तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 18:20 IST

विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर संभाव्य उमेदवारांची तयारी सुरू झाली आहे. त्यानुसार अर्जुन खोतकर आणि कैलाश गोरंट्याल यांचा प्रचार कार्यक्रम सुरू झाला आहे. परंतु, दोघांनाही यावेळी प्रचारात आपल्या मुलांचा हातभार लागत आहे.

- रवींद्र देशमुख

मुंबई - जालना विधानसभा मतदार संघातील विद्यमान शिवसेना आमदार तथा राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि काँग्रेसचे माजी आमदार कैलाश गोरट्याल यांच्यातील लढत राज्यात सर्वात चुरशीची ठरते. कॉलेज जीवनापासून एकमेकांविरुद्ध उभं ठाकणाऱ्या खोतकर-गोरंट्याल यांच्यातील लढतीत 2014 मध्ये खोतकर यांचा निसटता विजय झाला. विजयाच अंतर केवळ 250 मतांच होतं. त्यामुळे याला खोतकरांचा विजय आणि गोरंट्याल यांचा पराभव म्हणावा का, असा प्रश्न उपस्थित होतो. आता हीच लढाई पुढची पिढीही जोपासणार असं चित्र जालन्यात दिसत आहे.  

विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर संभाव्य उमेदवारांची तयारी सुरू झाली आहे. त्यानुसार अर्जुन खोतकर आणि कैलाश गोरंट्याल यांचा प्रचार कार्यक्रम सुरू झाला आहे. परंतु, दोघांनाही यावेळी प्रचारात आपल्या मुलांचा हातभार लागत आहे. अर्जुन खोतकर यांचे चिरंजीव अभिमन्यू खोतकर मागील तीनते चार वर्षांपासून राजकारणात सक्रिय झाले आहेत. त्यांच्याकडे युवा सेना विस्तारक, महाराष्ट्रची जबाबदारीही देण्यात आलेली आहे.

दुसरीकडे गोरंट्याल यांचे चिरंजीव अक्षय गोरंट्याल देखील वडिलांच्या खांद्याला खांदा लावून काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यावर भर देत आहेत. विरोधी पक्षातील युवकांना पक्षात सामावून घेण्यास ते प्रयत्नशील आहेत. तशा पोस्टही शेअर करण्यात येत आहे. एकूणच अक्षय आणि अभिमन्यू राजकारणात स्थिरावण्यासाठी कुटुंबीयांकडून पाठबळ मिळत आहे. त्यामुळे खोतकर-गोरंट्याल कुटुंबातील राजकीय लढतीचा वारसा अक्षय आणि अभिमन्यू पुढे चालवणार असचं दिसत आहे.

टीका न करता काम करण्यावर भर

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडून युवासेना राज्य विस्तारकाची जबाबदारी मिळाली आहे. त्यानुसार मतदारसंघात काम करत आहे. आतापर्यंत 75 गावं आणि काही तांड्यांचा दौरा पूर्ण केला आहे. कुणावरही टीका न करता राजकारण करण्यावर भर असून भविष्यात बेरोजगार युवकांच्या रोजगारासाठी काम करायचा निश्चय केला आहे.