शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

खोतकर-दानवे वाद औरंगाबादेतच मिटणार? 'मातोश्री'वरील बैठक निष्फळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2019 17:41 IST

जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी शिवसेना आमदार अर्जुन खोतकर उत्सुक आहेत. तर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे जालना मतदार संघातून लढण्यासाठी आग्रही आहे.

मुंबई : जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी शिवसेना आमदार अर्जुन खोतकर उत्सुक आहेत. तर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे जालना मतदार संघातून लढण्यासाठी आग्रही आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपा युतीमध्ये जालन्याच्या जागेवरून तिढा निर्माण झाला आहे.या जागेचा तिढा सोडविण्यासाठी आज मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धाव ठाकरे, महिला व बाल कल्याणमंत्री पंकजा मुंडे आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यात बैठक झाली. परंतु ही बैठक निष्फळ ठरली. त्यामुळे यावर उद्या रविवारी औरंगाबादेत तोडगा निघण्याची शक्यता आहे.

मुंबईत आज उद्धव ठाकरे, खोतकर आणि पंकजा मुंडे यांच्यात बैठक झाली. या बैठकीतून काहीही निष्फळ झाले नाही. उद्या औरंगाबाद युतीचा संयुक्त मेळावा आहे. या मेळाव्याआधी यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. त्यासाठी मेळाव्याआधी एका हॉटेलात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, पंकजा मुंडे आणि अर्जुन खोतकर यांच्यात औरंगाबाद येथे एक बैठक होणार आहे.

दरम्यान, याआधी अर्जुन खोतकर यांनी जालन्यातून लोकसभा निवडणूक लढण्यासंदर्भातील निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सोपवला होती. त्यानंतर उद्धव यांनी अप्रत्यक्ष निर्णय देताना खोतकर यांना पंकजा मुंडे यांच्यासोबत मराठावाडा समन्वयकपदी नियुक्त केले होते. परंतु अर्जुन खोतकर यांनी निर्णय मान्य नसल्याचे सांगत, पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली. त्यातच त्यांनी काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांची भेट घेतली होती. त्यावेळी सत्तार यांनी देखील खोतकर यांच्याकडून लवकरच गूड न्यूज मिळेल असे म्हटले होते. त्यामुळे चर्चांना उधाण आले होते. यामुळे आज मातोश्रीवर तातडीने बैठक घेण्यात आली होती. दरम्यान रविवारी होणाऱ्या बैठकीनंतरच अर्जुन खोतकर यांची भूमिका स्पष्ट होणार आहे. 

टॅग्स :Arjun Khotkarअर्जुन खोतकरRaosaheb Danweरावसाहेब दानवेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक