शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

११.५ लाख आदिवासींचे खावटी अनुदान रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 06:39 IST

खावटी अनुदान योजनेंतर्गत प्रतिकुटुंब ४ हजारांचे अनुदान दिले जाणार आहे. त्यात दोन हजार रुपये वस्तू स्वरुपात, तर दोन हजार रुपये रोख स्वरुपात बँक, डाक खात्यात वितरित केले जाणार होते.

- अविनाश साबापुरेलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनामुळे हाताला काम नसलेल्या मजुरांना उदरनिर्वाह करता यावा म्हणून राज्य शासनाने खावटी अनुदान वाटपाचा निर्णय घेतला. मात्र, पहिले लाॅकडाऊन संपून आता दुसऱ्यांदा लाॅकडाऊन करण्याची वेळ आली, तरी शासनाने अनुदान वाटप केलेले नाही. ११ लाख ५५ हजार गरीब आदिवासी बांधवांचे सर्वेक्षण कधीचेच आटोपले असून, अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरी अनुदान वाटपाचा निर्णय व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

खावटी अनुदान योजनेंतर्गत प्रतिकुटुंब ४ हजारांचे अनुदान दिले जाणार आहे. त्यात दोन हजार रुपये वस्तू स्वरुपात, तर दोन हजार रुपये रोख स्वरुपात बँक, डाक खात्यात वितरित केले जाणार होते. या योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळामार्फत करण्यात येणार होती. त्यासाठी चारही अपर आदिवासी विकास आयुक्त व ठिकठिकाणच्या प्रकल्प कार्यालयांच्या माध्यमातून लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. आश्रमशाळा शिक्षकांनी घरोघरी फिरून सर्वेक्षण केले. शासनाने एकंदर ४८६ कोटींचा निधी सप्टेंबरमध्येच मंजूर केला होता.  

मार्च महिन्यात मुदत संपणारnगरीब आदिवासींसाठी शासनाने १९७८ पासून खावटी कर्ज योजना सुरू केली. त्यात ७० टक्के कर्ज स्वरुपात व ३० टक्के अनुदान स्वरुपात रक्कम मिळत होती. मात्र, २०१३-१४ मध्ये ती बंद करण्यात आली. nखास कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या योजनेला पुनर्जीवित करून कर्जाऐवजी शंभर टक्के अनुदान असा बदल करण्यात आल्याने आदिवासींना आनंद झाला होता. nही योजना केवळ २०२०-२१ या एकाच आर्थिक वर्षापुरती असल्यामुळे येत्या ३१ मार्च रोजी योजनेची मुदत संपत आहे.

शुद्ध हेतूने पुनर्जीवित केलेल्या खावटी योजनेस विलंब होणे हे आदिवासींचे दुर्दैव आहे. मूळ हेतू साध्य होत नसेल तर काय अर्थ?- प्रमोद घोडाम, महासचिव बिरसा क्रांतिदलखावटी अनुदान वाटप करण्यासाठी लाभार्थ्यांचे सर्वेक्षण झाले आहे. अनुदान वाटप सुरू करण्याबाबत मंत्रालयाकडून सूचना नाहीत.- नितीन पाटील, व्यवस्थापक, आदिवासी विकास महामंडळ, नाशिक