शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

११.५ लाख आदिवासींचे खावटी अनुदान रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 06:39 IST

खावटी अनुदान योजनेंतर्गत प्रतिकुटुंब ४ हजारांचे अनुदान दिले जाणार आहे. त्यात दोन हजार रुपये वस्तू स्वरुपात, तर दोन हजार रुपये रोख स्वरुपात बँक, डाक खात्यात वितरित केले जाणार होते.

- अविनाश साबापुरेलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनामुळे हाताला काम नसलेल्या मजुरांना उदरनिर्वाह करता यावा म्हणून राज्य शासनाने खावटी अनुदान वाटपाचा निर्णय घेतला. मात्र, पहिले लाॅकडाऊन संपून आता दुसऱ्यांदा लाॅकडाऊन करण्याची वेळ आली, तरी शासनाने अनुदान वाटप केलेले नाही. ११ लाख ५५ हजार गरीब आदिवासी बांधवांचे सर्वेक्षण कधीचेच आटोपले असून, अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरी अनुदान वाटपाचा निर्णय व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

खावटी अनुदान योजनेंतर्गत प्रतिकुटुंब ४ हजारांचे अनुदान दिले जाणार आहे. त्यात दोन हजार रुपये वस्तू स्वरुपात, तर दोन हजार रुपये रोख स्वरुपात बँक, डाक खात्यात वितरित केले जाणार होते. या योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळामार्फत करण्यात येणार होती. त्यासाठी चारही अपर आदिवासी विकास आयुक्त व ठिकठिकाणच्या प्रकल्प कार्यालयांच्या माध्यमातून लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. आश्रमशाळा शिक्षकांनी घरोघरी फिरून सर्वेक्षण केले. शासनाने एकंदर ४८६ कोटींचा निधी सप्टेंबरमध्येच मंजूर केला होता.  

मार्च महिन्यात मुदत संपणारnगरीब आदिवासींसाठी शासनाने १९७८ पासून खावटी कर्ज योजना सुरू केली. त्यात ७० टक्के कर्ज स्वरुपात व ३० टक्के अनुदान स्वरुपात रक्कम मिळत होती. मात्र, २०१३-१४ मध्ये ती बंद करण्यात आली. nखास कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या योजनेला पुनर्जीवित करून कर्जाऐवजी शंभर टक्के अनुदान असा बदल करण्यात आल्याने आदिवासींना आनंद झाला होता. nही योजना केवळ २०२०-२१ या एकाच आर्थिक वर्षापुरती असल्यामुळे येत्या ३१ मार्च रोजी योजनेची मुदत संपत आहे.

शुद्ध हेतूने पुनर्जीवित केलेल्या खावटी योजनेस विलंब होणे हे आदिवासींचे दुर्दैव आहे. मूळ हेतू साध्य होत नसेल तर काय अर्थ?- प्रमोद घोडाम, महासचिव बिरसा क्रांतिदलखावटी अनुदान वाटप करण्यासाठी लाभार्थ्यांचे सर्वेक्षण झाले आहे. अनुदान वाटप सुरू करण्याबाबत मंत्रालयाकडून सूचना नाहीत.- नितीन पाटील, व्यवस्थापक, आदिवासी विकास महामंडळ, नाशिक