शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये वाद, NDA सरकारमध्ये वाढली डोकेदुखी; बंद दाराआड बैठक घेणार
2
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
3
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
4
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार
5
हृदयद्रावक! रक्षाबंधनासाठी येणाऱ्या भावासोबत आक्रित घडलं, वाट पाहत होत्या बहिणी पण...
6
लफडं! पतीचे हात तोडले अन् १० वर्ष लहान भाच्यासोबत पळाली मामी; नात्याला काळीमा फासणारी कहाणी
7
पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत
8
स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत अद्याप आघाडी नाही; मविआबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, 'मनसे' युतीचे संकेत
9
अमूल, पार्ले-जी, गोदरेज... अमेरिकेच्या टॅक्सपासून वाचण्यासाठी भारतीय कंपन्यांचा 'जुगाड', उचलू शकतात 'हे' पाऊल
10
"तिला कितीदा समजावले, तरीही दुसऱ्या मुलांशी बोलत राहिली"; संतापलेल्या प्रियकराने असा काढला राग अन्...
11
बलात्काराची खोटी तक्रार; माजी महिला बँक कर्मचाऱ्याला अटक
12
...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी
13
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३०,२२८ रुपयांचं फिक्स व्याज, पाहा स्कीमच्या डिटेल्स
14
रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु
15
रशिया-युक्रेन युद्धालाही मिळणार पूर्णविराम? 'या' दिवशी डोनाल्ड ट्रम्प घेणार पुतिन यांची भेट
16
तरुण असो वा वृद्ध.., पोस्टाच्या या जबरदस्त स्कीमनं घरबसल्या करू शकता कमाई; 'या' ट्रिकनं दरवर्षी मिळतील ₹१,११,०००
17
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
18
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
19
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
20
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...

राज्यात खरीप हंगाम धोक्यात, केवळ २४ टक्के क्षेत्रावर पेरण्या; दमदार पावसाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 05:48 IST

रूपेश उत्तरवार । लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : कोकणासह मुंबईत झालेली अतिवृष्टी आणि पुणे, कोल्हापूर, नाशिकचा काही भाग वगळता ...

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोकणासह मुंबईत झालेली अतिवृष्टी आणि पुणे, कोल्हापूर, नाशिकचा काही भाग वगळता राज्याला दमदार पावसाची प्रतिक्षा आहे. जुलै मध्यावर आला तरी पुरेसा पाऊसच नसल्याने राज्यातील खरीप हंगाम धोक्यात आला आहे. आजअखेर केवळ २४ टक्के क्षेत्रावरच खरीपाच्या पेरण्या झाल्याने पाऊस कधी पडणार आणि पेरणी कधी आटोपणार, याचीच चिंता शेतकऱ्यांना आहे.

विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील ७१ तालुक्यांची स्थिती पुरेशा पावसाअभावी चिंताजनक झाली आहे. या ठिकाणी सरासरी २५ ते ५० टक्केच पावसाची नोंद झाली. त्यामुळे पेरण्या रखडल्या आहेत.

राज्यात एक कोटी ४९ लाख हेक्टर क्षेत्र खरिपाच्या लागवडीखाली येते. ५ जुलैपर्यंत ३५ लाख ६७ हजार ९५६ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक पेरणी यवतमाळ जिल्ह्यात झाल्याची नोंद कृषी विभागाने केली आहे. विदर्भातील इतर जिल्ह्यात स्थिती चिंताजनक आहे. अकोल्यात केवळ दोन टक्के, बुलडाणा ३१, वाशिम ७, अमरावती १४, वर्धा ३५, नागपूर ३२, भंडारा २, चंद्रपूर २५, गडचिरोली ४ व गोंदियात केवळ १टक्का क्षेत्रावरच पेरण्या झाल्या. दुष्काळाने अगोदरच खचलेल्या मराठवाड्यातील स्थितीही यापेक्षा वेगळी नाही. लातूर ९ टक्के, उसमानाबाद १२, नांदेड २५, परभणी ३१ आणि हिंगोलीत फक्त ११ टक्के पेरण्या झाल्या आहेत. पेरणीच्या निम्मे क्षेत्र कपाशीचे आहे. १९ लाख १७ हजार ३५८ हेक्टरवर कपाशीची लागवड झाली आहे.महसूल विभागनिहाय पेरणी क्षेत्रसर्वात कमी पेरणी कोकणात दोन टक्के झाली. नाशिक विभाग २७, पुणे विभाग ४, कोल्हापूर २४, औरंगाबाद ३३, लातूर १९, अमरावती ३० तर नागपूर विभागात २२ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत.कृत्रिम पावसासाठी ढगच नाहीतराज्यातील काही भागात पावसाची स्थिती विदारक आहे. अशा भागावर कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे. मात्र आवश्यक ढग या ठिकाणावरून जात नाहीत. पूरक परिस्थिती तयार होताच कृत्रिम पावसाचा प्रयोग होणार आहे. - डॉ.अनिल बोंडे, कृषिमंत्री