शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

राज्यात खरीप हंगाम धोक्यात, केवळ २४ टक्के क्षेत्रावर पेरण्या; दमदार पावसाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 05:48 IST

रूपेश उत्तरवार । लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : कोकणासह मुंबईत झालेली अतिवृष्टी आणि पुणे, कोल्हापूर, नाशिकचा काही भाग वगळता ...

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोकणासह मुंबईत झालेली अतिवृष्टी आणि पुणे, कोल्हापूर, नाशिकचा काही भाग वगळता राज्याला दमदार पावसाची प्रतिक्षा आहे. जुलै मध्यावर आला तरी पुरेसा पाऊसच नसल्याने राज्यातील खरीप हंगाम धोक्यात आला आहे. आजअखेर केवळ २४ टक्के क्षेत्रावरच खरीपाच्या पेरण्या झाल्याने पाऊस कधी पडणार आणि पेरणी कधी आटोपणार, याचीच चिंता शेतकऱ्यांना आहे.

विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील ७१ तालुक्यांची स्थिती पुरेशा पावसाअभावी चिंताजनक झाली आहे. या ठिकाणी सरासरी २५ ते ५० टक्केच पावसाची नोंद झाली. त्यामुळे पेरण्या रखडल्या आहेत.

राज्यात एक कोटी ४९ लाख हेक्टर क्षेत्र खरिपाच्या लागवडीखाली येते. ५ जुलैपर्यंत ३५ लाख ६७ हजार ९५६ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक पेरणी यवतमाळ जिल्ह्यात झाल्याची नोंद कृषी विभागाने केली आहे. विदर्भातील इतर जिल्ह्यात स्थिती चिंताजनक आहे. अकोल्यात केवळ दोन टक्के, बुलडाणा ३१, वाशिम ७, अमरावती १४, वर्धा ३५, नागपूर ३२, भंडारा २, चंद्रपूर २५, गडचिरोली ४ व गोंदियात केवळ १टक्का क्षेत्रावरच पेरण्या झाल्या. दुष्काळाने अगोदरच खचलेल्या मराठवाड्यातील स्थितीही यापेक्षा वेगळी नाही. लातूर ९ टक्के, उसमानाबाद १२, नांदेड २५, परभणी ३१ आणि हिंगोलीत फक्त ११ टक्के पेरण्या झाल्या आहेत. पेरणीच्या निम्मे क्षेत्र कपाशीचे आहे. १९ लाख १७ हजार ३५८ हेक्टरवर कपाशीची लागवड झाली आहे.महसूल विभागनिहाय पेरणी क्षेत्रसर्वात कमी पेरणी कोकणात दोन टक्के झाली. नाशिक विभाग २७, पुणे विभाग ४, कोल्हापूर २४, औरंगाबाद ३३, लातूर १९, अमरावती ३० तर नागपूर विभागात २२ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत.कृत्रिम पावसासाठी ढगच नाहीतराज्यातील काही भागात पावसाची स्थिती विदारक आहे. अशा भागावर कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे. मात्र आवश्यक ढग या ठिकाणावरून जात नाहीत. पूरक परिस्थिती तयार होताच कृत्रिम पावसाचा प्रयोग होणार आहे. - डॉ.अनिल बोंडे, कृषिमंत्री