शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

अतिवृष्टीने चार लाख हेक्टर जमिनीचा खरीप हंगाम वाया

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 06:06 IST

कपाशी, सोयाबीनचा पेरणी कालावधी संपला; रब्बी हंगामाची क्षेत्र वाढ

- गजानन मोहोडलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जुलैमधील संततधार पाऊस, अतिवृष्टीमुळे राज्यातील १० लाख ७० हजार ४१३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. मुख्य पीक असणाऱ्या कपाशी व सोयाबीनचा पेरणी कालावधी आता संपला आहे. त्यामुळे किमान चार लाख हेक्टर क्षेत्र नापेर राहण्याची शक्यता आहे. बाजरी, सूर्यफूल, तूर पिकाकडे शेतकऱ्यांचा कल नसल्याने हे क्षेत्र आता रब्बीमध्ये परिवर्तीत होण्याची शक्यता आहे.

 जुलै महिन्यात चार वेळा अतिवृष्टी व संततधार पाऊस झाला. पंचनामे सुरू असल्याने बाधित क्षेत्रात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. पुरामुळे काठालगतची ९,४८५ हेक्टर शेती खरडून गेली. जोरदार पावसाने पेरणी झालेल्या शेतामधील बियाणे दडपले व   खांडण्या पडल्या आहेत. त्यामुळे किमान तीन लाख हेक्टर क्षेत्रात दुबार पेरणी आटोपणे शक्य झाले. उर्वरित चार लाखांवर हेक्टर क्षेत्र आता रिक्त राहील, असे कृषी विभागाने सांगितले.

 सप्टेंबर अखेरपासून हरभऱ्याची पेरणीखरिपाच्या मुख्य पिकाचा पेरणी कालावधी आता संपला आहे. पर्यायी पीक असणाऱ्या बाजरी, सूर्यफूल, करडई, तूर पिकांकडे शेतकऱ्यांचा फारसा कल नाही. ऑक्टोबर महिन्यापासून रब्बी हरभऱ्याची पेरणी सुरू होणार आहे. त्यामुळे यंदा खरिपाऐवजी रब्बी हंगामात हरभऱ्याचे क्षेत्रवाढ होण्याची शक्यता आहे.

तंबीनंतरही पंचनाम्याची गती वाढेना विभागीय आयुक्तांनी पंचनाम्यासाठी दोन दिवसांचा अवधी क्षेत्रीय यंत्रणेला दिला होता. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील दोन दिवसांच्या आत पंचनामे पूर्ण करण्याचे सांगितले आहे. राज्यात १ ऑगस्टपर्यंत १०.७० लाख बाधित क्षेत्रापैकी फक्त ४,५७,७५१ हेक्टरमधील पंचनामे पूर्ण झाले. ही ४२.७६ टक्केवारी आहे.

खरिपाच्या पेरण्या आटोपल्या. मात्र, जुलै महिन्यातील अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाले. याठिकाणी बाजरी, सूर्यफूल, करडई ही पर्यायी पिके आहेत. सप्टेंबर अखेरपासून हरभरा पेरणी सुरू होणार आहे.- केशवराव मुळे,कृषी सहसंचालक

टॅग्स :Rainपाऊस