शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

अतिवृष्टीने चार लाख हेक्टर जमिनीचा खरीप हंगाम वाया

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 06:06 IST

कपाशी, सोयाबीनचा पेरणी कालावधी संपला; रब्बी हंगामाची क्षेत्र वाढ

- गजानन मोहोडलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जुलैमधील संततधार पाऊस, अतिवृष्टीमुळे राज्यातील १० लाख ७० हजार ४१३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. मुख्य पीक असणाऱ्या कपाशी व सोयाबीनचा पेरणी कालावधी आता संपला आहे. त्यामुळे किमान चार लाख हेक्टर क्षेत्र नापेर राहण्याची शक्यता आहे. बाजरी, सूर्यफूल, तूर पिकाकडे शेतकऱ्यांचा कल नसल्याने हे क्षेत्र आता रब्बीमध्ये परिवर्तीत होण्याची शक्यता आहे.

 जुलै महिन्यात चार वेळा अतिवृष्टी व संततधार पाऊस झाला. पंचनामे सुरू असल्याने बाधित क्षेत्रात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. पुरामुळे काठालगतची ९,४८५ हेक्टर शेती खरडून गेली. जोरदार पावसाने पेरणी झालेल्या शेतामधील बियाणे दडपले व   खांडण्या पडल्या आहेत. त्यामुळे किमान तीन लाख हेक्टर क्षेत्रात दुबार पेरणी आटोपणे शक्य झाले. उर्वरित चार लाखांवर हेक्टर क्षेत्र आता रिक्त राहील, असे कृषी विभागाने सांगितले.

 सप्टेंबर अखेरपासून हरभऱ्याची पेरणीखरिपाच्या मुख्य पिकाचा पेरणी कालावधी आता संपला आहे. पर्यायी पीक असणाऱ्या बाजरी, सूर्यफूल, करडई, तूर पिकांकडे शेतकऱ्यांचा फारसा कल नाही. ऑक्टोबर महिन्यापासून रब्बी हरभऱ्याची पेरणी सुरू होणार आहे. त्यामुळे यंदा खरिपाऐवजी रब्बी हंगामात हरभऱ्याचे क्षेत्रवाढ होण्याची शक्यता आहे.

तंबीनंतरही पंचनाम्याची गती वाढेना विभागीय आयुक्तांनी पंचनाम्यासाठी दोन दिवसांचा अवधी क्षेत्रीय यंत्रणेला दिला होता. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील दोन दिवसांच्या आत पंचनामे पूर्ण करण्याचे सांगितले आहे. राज्यात १ ऑगस्टपर्यंत १०.७० लाख बाधित क्षेत्रापैकी फक्त ४,५७,७५१ हेक्टरमधील पंचनामे पूर्ण झाले. ही ४२.७६ टक्केवारी आहे.

खरिपाच्या पेरण्या आटोपल्या. मात्र, जुलै महिन्यातील अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाले. याठिकाणी बाजरी, सूर्यफूल, करडई ही पर्यायी पिके आहेत. सप्टेंबर अखेरपासून हरभरा पेरणी सुरू होणार आहे.- केशवराव मुळे,कृषी सहसंचालक

टॅग्स :Rainपाऊस