शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
2
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
3
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
4
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
5
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
6
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
7
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
8
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
9
विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर  
10
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
11
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
12
ना कोळसा, ना डिझेल, ना वीज, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन या इंधनावर चालणार? चाचणी यशस्वी
13
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
14
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे
15
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
16
गाजलेल्या शिक्षक हत्येतील आरोपी कळंबा जेलमधून पसार, कावळेसादच्या दरीत सापडला होता मृतदेह
17
नवरत्न कंपनीला संरक्षण मंत्रालयाकडून मोठी ऑर्डर, 1060% वधारला आहे शेअर; गुंतवणूकदारांना केलंय मालामाल!
18
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
19
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
20
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!

खडसेंच्या ‘बदल्या’ रोखल्या!

By admin | Updated: June 10, 2016 05:38 IST

जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी (निवड श्रेणी) आणि तहसीलदारांच्या ११० बदल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोखल्या

यदु जोशी,

मुंबई- महसूलमंत्री असताना एकनाथ खडसे यांनी सुचविलेल्या अतिरिक्त जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी (निवड श्रेणी) आणि तहसीलदारांच्या ११० बदल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोखल्या असून त्यांचे प्रस्ताव योग्य चॅनेलमधूनच पाठवा, असे आदेश दिले आहेत. महसूल खात्यातील बदल्यांचे प्रस्ताव विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील नागरी सेवा मंडळाकडून प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे येतात. कोणत्या बदल्या पात्र आहेत आणि कोणत्या अपात्र याचा शेरा ही समिती देते. त्यानंतर फाइल महसूलमंत्र्यांकडून मुख्यमंत्र्यांकडे जाते. अतिरिक्त जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी (निवड श्रेणी) आणि एकाच ठिकाणी तीन वर्षांपेक्षा कमी सेवा झालेल्या तहसीलदारांच्या बदल्यांचे अधिकार मुख्यमंत्र्यांना असतात. पण त्याचे प्रस्ताव महसूलमंत्र्यांकडून जातात. बोटावर मोजण्याइतके बदल सुचवून मुख्यमंत्री बरेचदा जसेच्या तसे प्रस्ताव मंजूर करतात, असा अनुभव आहे. मात्र, खडसे यांनी सुचविलेल्या बदल्यांचे प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी मंजूर केले नाहीत. शिवाय, ते योग्य प्रक्रियेनुसार आणि टप्प्यांप्रमाणे आलेले होते की नाही याची तपासणी करण्यास सांगितले आहे. बदल्यांमध्ये योग्य प्रक्रियेचा अवलंब केला गेला नसेल तर तो करून नव्याने प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देशही त्यांनी दिले असल्याचे सूत्रांनी सांगितले. कोणत्याही अधिकाऱ्याची तो राहत असलेल्या तालुका वा जिल्ह्यात बदली देऊ नये, असे आदेश निवडणूक आयोगाने दिलेले आहेत. निवृत्तीला दीड वर्षे वा त्यापेक्षा कमी कालावधी असलेल्या अधिकाऱ्यांना त्यातून वगळण्यात आले आहे. मात्र, महसूलमंत्र्यांकडून प्रस्तावित झालेल्या काही प्रकरणांत हा नियम धाब्यावर बसवून काही अधिकाऱ्यांना त्यांच्या जिल्ह्यात बदली सुचविण्यात आली होती, अशी माहिती मिळते.खडसे यांनी राज्यमंत्री संजय राठोड यांना एकही अधिकार दिलेला नव्हता. संतप्त राठोड राजीनामा द्यायला मातोश्रीवर गेले होते. मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी अनेकदा तक्रार केली. राठोड यांना अधिकार द्यावेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तरीही राठोड अधिकारशून्य राहिले. आज महसूल विभागाला कॅबिनेट मंत्री नाही अन् राज्यमंत्र्यास कसलाच अधिकार नाही, अशी अवस्था आहे. >गाठीभेटी संस्कृतीचा महासंघाला संशयमहसूल विभागांमधील बदल्यांमध्ये गाठीभेटी संस्कृतीद्वारे अर्थपूर्ण व्यवहार झाले का याबाबत उलटसुलट शंका आहे. राजपत्रित अधिकारी महासंघाचे नेते ग.दि. कुलथे म्हणाले की, यंदा दोन-तीन विभागांमध्ये असे व्यवहार झाल्याच्या तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत. याविषयी योग्य वेळी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करू.