शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
3
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
4
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
5
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
6
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
7
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
8
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
9
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
10
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
11
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
12
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
13
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
14
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
15
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
16
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
17
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
18
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
19
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
20
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...

महाविकास आघाडीच्या अर्थसंकल्पावर केजरीवाल सरकारच्या कामाचे दडपण : रघुनाथदादा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2020 11:00 IST

रिंगरोड आणि विमानतळासाठी निधी दिला आहे. रिंगरोड किंवा विमानतळामुळे कधी आत्महत्या झाल्या नाहीत. हे लक्षात घेऊन सरकारने शेतकरीभिमुख निर्णय़ घ्यायला हवे, अशी अपेक्षा रघुनाथदादा यांनी व्यक्त केली.

मुंबई - महाविकास आघाडीचा पहिला अर्थसंकल्प महाराष्ट्राचा घटता विकासदर आणि राज्यावर असलेला साडेचार लाख कोटींहून अधिक कर्जाच्या दबावाखाली सादर झाल्याचे दिसून येत आहे. सिंचनासाठी असलेल्या बजेटमधून केवळ सिंचन विभागाचे कार्यालय चालू शकते. तर शिक्षण आणि आरोग्यावर केलेल्या तरतुदीवरून या बजेटवर दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकारने केलेल्या कामाचे दडपण दिसत असल्याची टीका शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांनी केली आहे.

सरकारने तरतुदी वाढल्या आहेत. मात्र दर्जा सुधारला नाही. शिक्षकांचे आणि डॉक्टरांचे पगार वाढवून द्यायचे. या मंडळींना खूश करायचं सरकारचं धोरण आहे. मात्र विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाची शिक्षण मिळावे. यासाठी काहीही तरतूद दिसत नाही. केवळ खर्च वाढविण्याचे काम या अर्थसंकल्पातून केल्याचे रघुनाथदादा यांनी म्हटले. 

शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. पवारांची औलाद सांगणार नाही असं म्हणणाऱ्यांनी आपले वचन पूर्ण करायला हवं. दोन लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज असणाऱ्यांना दिलासा देऊ असं म्हटले आहे. हे केवळ गाजर ठरू नये, एवढीच अपेक्षा असल्याचे रघुनाथदादा यांनी सांगितले. राज्यात शेतकरी आत्महत्या सुरूच आहे. तुम्ही रिंगरोड आणि विमानतळासाठी निधी दिला आहे. रिंगरोड किंवा विमानतळासाठी कधी आत्महत्या झाल्या नाहीत. हे लक्षात घेऊन सरकारने शेतकरीभिमुख निर्णय़ घ्यायला हवे, अशी अपेक्षा रघुनाथदादा यांनी व्यक्त केली.