शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

साखरेचे दर स्थिर ठेवा, ३५०० दर देऊ!

By admin | Updated: October 29, 2016 02:50 IST

साखर विक्रीपासून साठवण्यापर्यंत शेकडो निर्बंध घातले जात आहेत. ऊस उत्पादकांना एफआरपीपेक्षा जादा दर दिल्यास त्यावर पुन्हा कर लादला जातो. सरकारमध्ये असलेल्या

सांगली : साखर विक्रीपासून साठवण्यापर्यंत शेकडो निर्बंध घातले जात आहेत. ऊस उत्पादकांना एफआरपीपेक्षा जादा दर दिल्यास त्यावर पुन्हा कर लादला जातो. सरकारमध्ये असलेल्या खासदार राजू शेट्टी यांनी केंद्राचे साखर उद्योगाचे धोरण निश्चित करून साखरेचे दर स्थिर ठेवले तर उसाला प्रतिटन ३२०० रुपयेच काय, ३५०० रुपये देण्यास आम्ही तयार आहोत, असे आव्हान साखर कारखानदारांनी राजू शेट्टी यांना ‘लोकमत’शी बोलताना दिले. साखरेचे दर वाढविण्यासाठीही शेट्टी यांनी आंदोलने करावीत, असा सल्लाही त्यांनी दिला.यंदाच्या गळीत हंगामासाठी उसाला पहिली उचल म्हणून एकरकमी ३२०० रुपये देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, खासदार राजू शेट्टी यांनी जयसिंगपूर येथील ऊस परिषदेत केली आहे. या मागणीवर सांगली जिल्ह्यातील कारखानदारांमधून उलट-सुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. क्रांती साखर कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड म्हणाले की, शेट्टी यांची दराची मागणी योग्यच आहे. वाढत्या महागाईचा विचार केल्यास शेतकऱ्यांना ३२०० रुपये टनाने ऊस घालूनही परवडत नाही. परंतु, शेट्टींनी केवळ दराची मागणी करून भागणार नाही. सध्या ते केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सहभागी आहेत. त्यांनी उसाच्या दराबद्दल निश्चित आमच्याशी भांडावे, पण साखरेचे दर स्थिर ठेवण्यासाठीही सरकारकडेही भांडावे. केंद्र सरकारचे धोरण साखर उद्योग वाढीसाठीचे नाही. गेल्या सहा महिन्यात साखर निर्यात आणि साठ्याबद्दल तीनवेळा धोरण बदलले. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसात दोनशे ते तीनशे रुपयांनी साखरेचे दर उतरले आहेत. भविष्यात दर उतरणार नाहीत, याची हमी शेट्टी देणार आहेत का? दर स्थिर ठेवण्याची हमी घ्यावी, आम्ही शेतकऱ्यांना प्रतिटन ३५०० रुपये दर देऊ. तर राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील म्हणाले की, ऊस दराबद्दल निश्चित धोरण ठरविलेले नाही. संचालक मंडळाची बैठक घेऊ आणि सांगली जिल्ह्यातील अन्य कारखानदारांबरोबर चर्चा झाल्यानंतर दर जाहीर करू. (प्रतिनिधी) ‘चौदा दिवसांत एकरकमी ‘एफआरपी’ द्यावीच लागेल’यंदाच्या हंगामात तीन हजार रुपये पहिली उचल द्यावी, तसेच प्रतिटन किमान ३७०० रुपये दर द्यावा, आदी मागण्या शेतकरी कामगार पक्षाच्या शिष्टमंडळाने साखर आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्याकडे केली. एकरकमी चौदा दिवसांत एफआरपी देणे कायद्याने बंधनकारक आहे; पण गतवर्षी शेतकरी संघटना व कारखानदार यांच्यात तडजोड झाल्याने दोन हप्ते झाले. यंदा मात्र एकरकमी एफआरपी कारखानदारांना द्यावीच लागेल, असे विपीन शर्मा यांनी शिष्टमंडळाला सांगितल्याची माहिती शेकापचे राज्य सहचिटणीस संपतराव पवार यांनी दिली.