शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची लागणार होती वर्णी, भाजपासोबतची बोलणी अडली; अखेर छगन भुजबळांनी संधी साधली!
2
“मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा; जागावाटपाची चर्चा नको, मित्रपक्षांवर टीका टाळा”
3
अनिल गोटेंनी टाळे ठोकलेल्या खोलीत पैशांचे घबाड सापडले; कुलूप तोडून पोलीस आत गेले... 
4
जगभर विनाश होईल, आर्थिक मंदी येईल...; बाबा वेंगाची भयानक भाकितं, जगाचा अंतही सांगून टाकला!
5
"पती निर्दोष, दोनदा पाकिस्तानला गेला कारण..."; शहजादला अटक होताच ढसाढसा रडली रझिया
6
दीपिका पादुकोणचे नखरेच जास्त! मानधन अन् अटी ऐकून दिग्दर्शकाने 'या' सिनेमातून काढलं
7
माझे लग्न पाकिस्तानात करून द्या, ज्योती मल्होत्राची विनंती; चॅटिंग आणि डायरीच्या नोंदीतील माहिती
8
कान्समध्ये पहिल्यांदाच झळकली मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे, ग्लॅमरस लूकने गाजवलं रेड कार्पेट
9
Supriya Sule : "माणसं सैतानासारखी एवढी निर्दयी कशी वागू शकतात?"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला संताप
10
अमेरिकेतून आले 'निराशेचे' संकेत! सेन्सेक्स-निफ्टी धडाम, 'या' १० शेअर्सचं सर्वाधिक नुकसान
11
धुळ्यात 'रात्रीस खेळ चाले...' : विधिमंडळाच्या आमदारांच्या समितीतील सदस्यांसाठी ठेवले साडेपाच कोटी; रेस्ट हाऊसमध्ये सापडले घबाड!
12
दोघांच्या सहमतीनेच शरीरसंबंध घडले; बलात्कारप्रकरणातून शास्त्रज्ञाची सुटका
13
राष्ट्रवादीची राजेंद्र हगवणेंवर कारवाई; पक्षातून बडतर्फ केलं, वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी अजित पवारांनी कारवाईचे दिले आदेश
14
रितेशच्या 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार टीव्ही अभिनेता, 'सुख म्हणजे...' मालिकेत केलंय काम
15
Jyoti Malhotra : ४ वेळा मुंबईला गेलेली ज्योती मल्होत्रा; गर्दीच्या ठिकाणांचे फोटो आणि व्हिडीओ कोणाला पाठवले?
16
अमेरिकेत इस्रायली दुतावासाच्या दोन कर्मचाऱ्यांची हत्या; ज्यूइश म्युझिअमबाहेर गोळीबार
17
धक्कादायक आकडेवारी! जगातली निम्मी संपत्ती फक्त १% लोकांकडे, भारताचा नंबर कितवा?
18
Jyoti Malhotra : राजस्थानमध्ये कुठे आणि कोणाच्या घरी थांबली होती ज्योती मल्होत्रा? व्हिडीओही बनवला अन्... 
19
डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा बायोपिक रुपेरी पडद्यावर येणार, दिग्दर्शक ओम राऊतची घोषणा
20
नटीनं मारली मिठी...! मुंबई इंडियन्सने IPL प्लेऑफ्समध्ये प्रवेश करताच सिद्धार्थचं वानखेडेवर सेलिब्रेशन, व्हिडीओ व्हायरल

साखरेचे दर स्थिर ठेवा, ३५०० दर देऊ!

By admin | Updated: October 29, 2016 02:50 IST

साखर विक्रीपासून साठवण्यापर्यंत शेकडो निर्बंध घातले जात आहेत. ऊस उत्पादकांना एफआरपीपेक्षा जादा दर दिल्यास त्यावर पुन्हा कर लादला जातो. सरकारमध्ये असलेल्या

सांगली : साखर विक्रीपासून साठवण्यापर्यंत शेकडो निर्बंध घातले जात आहेत. ऊस उत्पादकांना एफआरपीपेक्षा जादा दर दिल्यास त्यावर पुन्हा कर लादला जातो. सरकारमध्ये असलेल्या खासदार राजू शेट्टी यांनी केंद्राचे साखर उद्योगाचे धोरण निश्चित करून साखरेचे दर स्थिर ठेवले तर उसाला प्रतिटन ३२०० रुपयेच काय, ३५०० रुपये देण्यास आम्ही तयार आहोत, असे आव्हान साखर कारखानदारांनी राजू शेट्टी यांना ‘लोकमत’शी बोलताना दिले. साखरेचे दर वाढविण्यासाठीही शेट्टी यांनी आंदोलने करावीत, असा सल्लाही त्यांनी दिला.यंदाच्या गळीत हंगामासाठी उसाला पहिली उचल म्हणून एकरकमी ३२०० रुपये देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, खासदार राजू शेट्टी यांनी जयसिंगपूर येथील ऊस परिषदेत केली आहे. या मागणीवर सांगली जिल्ह्यातील कारखानदारांमधून उलट-सुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. क्रांती साखर कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड म्हणाले की, शेट्टी यांची दराची मागणी योग्यच आहे. वाढत्या महागाईचा विचार केल्यास शेतकऱ्यांना ३२०० रुपये टनाने ऊस घालूनही परवडत नाही. परंतु, शेट्टींनी केवळ दराची मागणी करून भागणार नाही. सध्या ते केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सहभागी आहेत. त्यांनी उसाच्या दराबद्दल निश्चित आमच्याशी भांडावे, पण साखरेचे दर स्थिर ठेवण्यासाठीही सरकारकडेही भांडावे. केंद्र सरकारचे धोरण साखर उद्योग वाढीसाठीचे नाही. गेल्या सहा महिन्यात साखर निर्यात आणि साठ्याबद्दल तीनवेळा धोरण बदलले. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसात दोनशे ते तीनशे रुपयांनी साखरेचे दर उतरले आहेत. भविष्यात दर उतरणार नाहीत, याची हमी शेट्टी देणार आहेत का? दर स्थिर ठेवण्याची हमी घ्यावी, आम्ही शेतकऱ्यांना प्रतिटन ३५०० रुपये दर देऊ. तर राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील म्हणाले की, ऊस दराबद्दल निश्चित धोरण ठरविलेले नाही. संचालक मंडळाची बैठक घेऊ आणि सांगली जिल्ह्यातील अन्य कारखानदारांबरोबर चर्चा झाल्यानंतर दर जाहीर करू. (प्रतिनिधी) ‘चौदा दिवसांत एकरकमी ‘एफआरपी’ द्यावीच लागेल’यंदाच्या हंगामात तीन हजार रुपये पहिली उचल द्यावी, तसेच प्रतिटन किमान ३७०० रुपये दर द्यावा, आदी मागण्या शेतकरी कामगार पक्षाच्या शिष्टमंडळाने साखर आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्याकडे केली. एकरकमी चौदा दिवसांत एफआरपी देणे कायद्याने बंधनकारक आहे; पण गतवर्षी शेतकरी संघटना व कारखानदार यांच्यात तडजोड झाल्याने दोन हप्ते झाले. यंदा मात्र एकरकमी एफआरपी कारखानदारांना द्यावीच लागेल, असे विपीन शर्मा यांनी शिष्टमंडळाला सांगितल्याची माहिती शेकापचे राज्य सहचिटणीस संपतराव पवार यांनी दिली.