शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

पुरवणी परीक्षेतही कर्नाटक नंबर वन

By admin | Updated: June 10, 2015 02:08 IST

कर्नाटकात दहावीची परीक्षा झाल्यानंतर एका महिन्यात निकालही लागला. नापास विद्यार्थ्यांसाठी १५ ते २२ जूनअखेर पुरवणी परीक्षेचे आयोजन केले आहे.

भीमगोंडा देसाई, कोल्हापूरकर्नाटकात दहावीची परीक्षा झाल्यानंतर एका महिन्यात निकालही लागला. नापास विद्यार्थ्यांसाठी १५ ते २२ जूनअखेर पुरवणी परीक्षेचे आयोजन केले आहे. पुरवणी परीक्षेत पास झाल्यानंतर नियमित विद्यार्थ्यांसोबत पुढील वर्गात बसता येणार आहे. त्यामुळे निकालाबरोबरच पुरवणी परीक्षा घेण्याची कर्नाटक माध्यमिक परीक्षा मंडळाची १४ वर्षांची परंपरा कायम राखली आहे. मंडळाने केलेल्या दाव्याप्रमाणे वेळेत निकाल लावून पुरवणी परीक्षा घेण्यातील ‘नंबर वन’ यंदाही राखला आहे. कर्नाटकात माध्यमिक परीक्षा मंडळाने यंदा दहावीची परीक्षा ३० मार्च ते १३ एप्रिलअखेर घेतली. या परीक्षेला राज्यातून साडेआठ लाख विद्यार्थी बसले होते. निकाल १२ मे रोजी लावला. केवळ ३० दिवसांत निकाल लागला. वेळेत निकाल लागल्यामुळे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रम निवडण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला. १५ जूनपासून नापास विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षेचे आयोजन केले आहे. यामुळे मुख्य परीक्षेसाठी केलेला अभ्यास विस्मृतीत जाण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षा देता येणार आहे. कर्नाटकात विभागनिहाय पेपर तपासणीसाठी तात्पुरती केंदे्र निर्माण केली जातात, हे वेळेत निकाल लागण्याचे महत्त्वाचे कारण आहे. महाराष्ट्रात शिक्षकांना शाळेत उत्तरपत्रिका तपासणीसाठी दिल्या जातात. बहुतांश शिक्षक शाळेत वेळ मिळत नाही म्हणून त्या घरी घेऊन जातात. परिणामी उत्तरपत्रिका तपासणीसाठी विलंब लागतो. निकालही उशिरानेच जाहीर होतो. पारदर्शकता राहत नाही. निकाल जितक्या लवकर जाहीर होईल, तितका अधिक वेळ विद्यार्थी व पालक यांना पुढील करिअरची, अभ्यासक्रमांची दिशा ठरवून शिक्षण संस्था निवडण्यासाठी मिळतो. निकाल काय लागणार यासंबंधी विद्यार्थ्यांचा तणावाचा कालावधी कमी होतो. म्हणून निकाल लवकर लागावा, अशी पालक व विद्यार्थ्यांची अपेक्षा असते. प्रत्येक वर्षी कर्नाटक आणि महाराष्ट्रात दहावीची परीक्षा सर्वसाधारणपणे एकाच महिन्यात होत असते. अचूक नियोजनाअभावी महाराष्ट्रात वेळेवर निकाल लागत नाहीत. याउलट कर्नाटक परीक्षा मंडळाच्या प्रशासनाने वेळेत निकाल लावण्यातील आघाडी कायम राखली आहे. कर्नाटक परीक्षा मंडळाचा आदर्श घेऊन, महाराष्ट्रातही आता वेळेत निकाल लावून, पुढील वर्षापासून दहावी आणि बारावी परीक्षांतील नापास विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षा घेण्याचा निर्णय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी जाहीर केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील नापास विद्यार्थ्यांना वर्ष वाया न घालविता पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे.‘लोकमत’वर अभिनंदनाचा वर्षाव...दहावी, बारावीतील नापास विद्यार्थ्यांसाठी कर्नाटकात पुरवणी परीक्षा कशी व केव्हा घेतली जाते, यंत्रणा कशी राबविली जाते, त्याचा फायदा विद्यार्थ्यांना कसा होतो, याबाबत ‘लोकमत’ने मालिका प्रसिद्ध केली. त्यामुळेच महाराष्ट्रातही पुरवणी परीक्षेचा निर्णय झाला. त्याबद्दल ‘लोकमत’चे मंगळवारी दिवसभर अनेकांनी अभिनंदन केले.