शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

कर्नाटकाला कोयनेतून दोन टीएमसी पाणी सोडणार- मुख्यमंत्री

By admin | Updated: March 16, 2017 17:57 IST

कोयना नदीतून कृष्णेमध्ये दोन टीएमसी पाणी सोडण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली

ऑनलाइन लोकमतविजयपूर, दि. 16 - दुष्काळी गावांची तहान भागविण्याकरिता महाराष्ट्र धावून आला आहे. कोयना नदीतून कृष्णेमध्ये दोन टीएमसी पाणी सोडण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कर्नाटकातील भाजपा आमदारांनी पाणी सोडण्याची मागणी केल्यानंतर याबाबतची घोषणा करण्यात आली आहे. कर्नाटकात असलेल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कर्नाटकातील बागलकोट, विजापूर आणि बेळगाव जिल्ह्यांसाठी कोयना धरणातून अतिरिक्त 2 टीएमसी पाणी सोडण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन खा. प्रल्हाद जोशी व खा. डॉ. प्रभाकर कोरे यांच्या नेतृत्वाखाली उत्तर कर्नाटकातील भाजपा नेत्यांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिले.मुंबई येथील मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा येथे या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. कर्नाटकात उद्भवलेल्या दुष्काळ परिस्थितीसंदर्भात तसेच विजापूर, बेळगाव, बागलकोट, जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या समस्या व पिण्याच्या पाण्यासाठी होणारी भटकंती लक्षात घेऊन 2 टीएमसी पाणी मार्च अखेर अथवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सोडण्यात यावे, अशी मागणी यावेळी या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली. या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन तातडीने 2 टीएमसी पाणी सोडण्यास संमती दिली. तसेच महाराष्ट्र सरकारच्या पाटबंधारे खात्याचे प्रधान कार्यदर्शी यांना याबाबत संपर्क साधून पाणी सोडण्याची सूचना दिली. यावेळी शेतकर्‍यांच्या हितासाठी एप्रिलच्या पहिल्या सप्ताहात हे पाणी सोडण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. सदरचे पाणी हे कोयना धरणातून कृष्णा नदीमध्ये सोडण्यात येणार आहे.भाजप खासदार डॉ. प्रभाकर कोरे, खासदार प्रल्हाद जोशी, आमदार महांतेश कवटगीमठ, लक्ष्मण सवदी, दुर्योधन ऐहोळे, शशिकला जोल्ले आणि खासदार एम. पी. गद्दीगौडर आदींच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. सविस्तर चर्चेनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन टीएमसी पाणीसाठा कृष्णा नदीपात्रात सोडण्याची ग्वाही दिली. येत्या 1 एप्रिलपासून ही व्यवस्था अंमलात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयामुळे कर्नाटकातील काही गावांना दिलासा मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.