शहरं
Join us  
Trending Stories
1
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
2
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
3
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
4
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
5
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
6
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
7
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
8
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
9
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
10
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
11
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
12
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
13
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
14
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
15
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
16
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
17
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
18
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
19
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
20
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार

कर्नाटकाला कोयनेतून दोन टीएमसी पाणी सोडणार- मुख्यमंत्री

By admin | Updated: March 16, 2017 17:57 IST

कोयना नदीतून कृष्णेमध्ये दोन टीएमसी पाणी सोडण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली

ऑनलाइन लोकमतविजयपूर, दि. 16 - दुष्काळी गावांची तहान भागविण्याकरिता महाराष्ट्र धावून आला आहे. कोयना नदीतून कृष्णेमध्ये दोन टीएमसी पाणी सोडण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कर्नाटकातील भाजपा आमदारांनी पाणी सोडण्याची मागणी केल्यानंतर याबाबतची घोषणा करण्यात आली आहे. कर्नाटकात असलेल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कर्नाटकातील बागलकोट, विजापूर आणि बेळगाव जिल्ह्यांसाठी कोयना धरणातून अतिरिक्त 2 टीएमसी पाणी सोडण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन खा. प्रल्हाद जोशी व खा. डॉ. प्रभाकर कोरे यांच्या नेतृत्वाखाली उत्तर कर्नाटकातील भाजपा नेत्यांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिले.मुंबई येथील मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा येथे या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. कर्नाटकात उद्भवलेल्या दुष्काळ परिस्थितीसंदर्भात तसेच विजापूर, बेळगाव, बागलकोट, जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या समस्या व पिण्याच्या पाण्यासाठी होणारी भटकंती लक्षात घेऊन 2 टीएमसी पाणी मार्च अखेर अथवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सोडण्यात यावे, अशी मागणी यावेळी या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली. या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन तातडीने 2 टीएमसी पाणी सोडण्यास संमती दिली. तसेच महाराष्ट्र सरकारच्या पाटबंधारे खात्याचे प्रधान कार्यदर्शी यांना याबाबत संपर्क साधून पाणी सोडण्याची सूचना दिली. यावेळी शेतकर्‍यांच्या हितासाठी एप्रिलच्या पहिल्या सप्ताहात हे पाणी सोडण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. सदरचे पाणी हे कोयना धरणातून कृष्णा नदीमध्ये सोडण्यात येणार आहे.भाजप खासदार डॉ. प्रभाकर कोरे, खासदार प्रल्हाद जोशी, आमदार महांतेश कवटगीमठ, लक्ष्मण सवदी, दुर्योधन ऐहोळे, शशिकला जोल्ले आणि खासदार एम. पी. गद्दीगौडर आदींच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. सविस्तर चर्चेनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन टीएमसी पाणीसाठा कृष्णा नदीपात्रात सोडण्याची ग्वाही दिली. येत्या 1 एप्रिलपासून ही व्यवस्था अंमलात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयामुळे कर्नाटकातील काही गावांना दिलासा मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.