शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

"कर्नाटकचे मुख्यमंत्री सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे नाहीत, आमचा भाग आम्हाला मिळणारच", देवेंद्र फडणवीसांनी सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2022 07:29 IST

Maharashtra Karnataka Border Dispute: सर्वोच्च न्यायालयापेक्षा कुणीही मोठे नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्रीही किंवा इतर कुणीही न्यायालयापेक्षा मोठे नाही, असे स्पष्ट करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे.

मुंबई : सर्वोच्च न्यायालयापेक्षा कुणीही मोठे नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्रीही किंवा इतर कुणीही न्यायालयापेक्षा मोठे नाही, असे स्पष्ट करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी काहीही दावा ठोकला तरी महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाणार नाही आणि आमचा सीमा भाग आम्हाला मिळेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. बेळगाव, कारवार, निपाणीसह सीमाभागातील गावांवर आमचा दावा आजचा नाही. त्यामुळे त्याबाबत मी केलेले वक्तव्य चिथावणीखोर नाही. जे रास्त आहे ती मागणी मी केलेली आहे, असेही फडणवीस म्हणाले.  सीमाप्रश्न राज्य निर्मितीपासून सुरू आहे. महाराष्ट्राने सातत्याने यासंदर्भात आपली भूमिका पक्की ठेवली आहे. आपली मागणी घेऊन आपण सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत. न्यायालय योग्य भूमिका घेईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे, असेही ते म्हणाले. 

कर्नाटकची बस अडवून केला निषेध दौंड (जि. पुणे) : अखिल भारतीय मराठा महासंघ दौंड शहर व तालुक्याच्या वतीने शहीद भगतसिंग चौक, दौंड येथे कर्नाटक सरकारची निपाणी-संभाजीनगर बस अडवून कर्नाटक सरकारचा, मुख्यमंत्री बोम्मई यांचा जाहीर निषेध करण्यात आला. निपाणी -  संभाजीनगर बस अडवून ड्रायव्हर कंडक्टरला भगवा पंचा घालून व बसवर निषेधाचे फलक लिहून शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात आले. कर्नाटक राज्यातील बसचे चालक आणि वाहक तसेच बसमधील प्रवाशांच्या सुरक्षेला कुठलाही धोका कार्यकर्त्यांनी पोहोचू दिला नाही. 

कर्नाटकला एक इंचही जागा जाऊ देणार नाहीकर्नाटकला एक इंचसुद्धा जागा जाऊ देणार नाही. सरकार त्यासाठी समर्थ आहे. मी या प्रश्नावर ४० दिवस कर्नाटकमध्ये तुरुंगवास भोगला आहे. जतचा मुद्दा २०१२ चा आहे. त्यावेळी सरकार कोणाचे होते?        - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

काय देता, काय घेता, यावर चर्चा होऊ शकते कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्रातील काही गावे मागत आहेत; परंतु बेळगाव, कारवार, निपाणीसह ते सोडणार असतील तर त्यांना काय देता येईल, यावर चर्चा होऊ शकते. काही न करता कशाचीही मागणी करणे हे शहाणपणाचे लक्षण नाही.     - शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी 

‘त्यांच्या अंगात भूत संचारलंय’कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या अंगात भूत संचारलंय, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. बोम्मई हे वरिष्ठांच्या परवानगीशिवाय बोलले आहेत का? असा सवालही त्यांनी केला. 

कर्नाटक मुख्यमंत्र्यांचा दावा निरर्थकअक्कलकोट, सोलापूरमध्ये शेकडो वर्षांपासून कानडी भाषिक राहत आहेत. ते महाराष्ट्राचे भाग आहेत. त्यामुळे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा दावा निरर्थक आहे.     - डॉ. नीलम गोऱ्हे, उपसभापती, विधान परिषद 

४८ खासदारांनी केंद्राचे लक्ष वेधावे... सीमाप्रश्नावर राज्यातील ४८ खासदारांनी केंद्र शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. संसदेच्या अधिवेशनात आवाज उठवावा. सर्वपक्षीय शिष्टमंडळानेही भेटावे. या लढ्यात राज्य सरकारने ताकदीनं उभं राहायला हवं.    - पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्रKarnatakकर्नाटक