शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

"कर्नाटकचे मुख्यमंत्री सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे नाहीत, आमचा भाग आम्हाला मिळणारच", देवेंद्र फडणवीसांनी सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2022 07:29 IST

Maharashtra Karnataka Border Dispute: सर्वोच्च न्यायालयापेक्षा कुणीही मोठे नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्रीही किंवा इतर कुणीही न्यायालयापेक्षा मोठे नाही, असे स्पष्ट करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे.

मुंबई : सर्वोच्च न्यायालयापेक्षा कुणीही मोठे नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्रीही किंवा इतर कुणीही न्यायालयापेक्षा मोठे नाही, असे स्पष्ट करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी काहीही दावा ठोकला तरी महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाणार नाही आणि आमचा सीमा भाग आम्हाला मिळेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. बेळगाव, कारवार, निपाणीसह सीमाभागातील गावांवर आमचा दावा आजचा नाही. त्यामुळे त्याबाबत मी केलेले वक्तव्य चिथावणीखोर नाही. जे रास्त आहे ती मागणी मी केलेली आहे, असेही फडणवीस म्हणाले.  सीमाप्रश्न राज्य निर्मितीपासून सुरू आहे. महाराष्ट्राने सातत्याने यासंदर्भात आपली भूमिका पक्की ठेवली आहे. आपली मागणी घेऊन आपण सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत. न्यायालय योग्य भूमिका घेईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे, असेही ते म्हणाले. 

कर्नाटकची बस अडवून केला निषेध दौंड (जि. पुणे) : अखिल भारतीय मराठा महासंघ दौंड शहर व तालुक्याच्या वतीने शहीद भगतसिंग चौक, दौंड येथे कर्नाटक सरकारची निपाणी-संभाजीनगर बस अडवून कर्नाटक सरकारचा, मुख्यमंत्री बोम्मई यांचा जाहीर निषेध करण्यात आला. निपाणी -  संभाजीनगर बस अडवून ड्रायव्हर कंडक्टरला भगवा पंचा घालून व बसवर निषेधाचे फलक लिहून शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात आले. कर्नाटक राज्यातील बसचे चालक आणि वाहक तसेच बसमधील प्रवाशांच्या सुरक्षेला कुठलाही धोका कार्यकर्त्यांनी पोहोचू दिला नाही. 

कर्नाटकला एक इंचही जागा जाऊ देणार नाहीकर्नाटकला एक इंचसुद्धा जागा जाऊ देणार नाही. सरकार त्यासाठी समर्थ आहे. मी या प्रश्नावर ४० दिवस कर्नाटकमध्ये तुरुंगवास भोगला आहे. जतचा मुद्दा २०१२ चा आहे. त्यावेळी सरकार कोणाचे होते?        - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

काय देता, काय घेता, यावर चर्चा होऊ शकते कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्रातील काही गावे मागत आहेत; परंतु बेळगाव, कारवार, निपाणीसह ते सोडणार असतील तर त्यांना काय देता येईल, यावर चर्चा होऊ शकते. काही न करता कशाचीही मागणी करणे हे शहाणपणाचे लक्षण नाही.     - शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी 

‘त्यांच्या अंगात भूत संचारलंय’कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या अंगात भूत संचारलंय, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. बोम्मई हे वरिष्ठांच्या परवानगीशिवाय बोलले आहेत का? असा सवालही त्यांनी केला. 

कर्नाटक मुख्यमंत्र्यांचा दावा निरर्थकअक्कलकोट, सोलापूरमध्ये शेकडो वर्षांपासून कानडी भाषिक राहत आहेत. ते महाराष्ट्राचे भाग आहेत. त्यामुळे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा दावा निरर्थक आहे.     - डॉ. नीलम गोऱ्हे, उपसभापती, विधान परिषद 

४८ खासदारांनी केंद्राचे लक्ष वेधावे... सीमाप्रश्नावर राज्यातील ४८ खासदारांनी केंद्र शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. संसदेच्या अधिवेशनात आवाज उठवावा. सर्वपक्षीय शिष्टमंडळानेही भेटावे. या लढ्यात राज्य सरकारने ताकदीनं उभं राहायला हवं.    - पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्रKarnatakकर्नाटक