शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

कर्नाटक सीमावाद : महाराष्ट्र पेटला तर या सरकारला भारी पडेल, संजय राऊतांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2022 18:11 IST

तुमच्या अंगात जर मराठी रक्त असेल तर शिवसैनिकांना रोखू नका, राऊतांचं पोलिसांना आवाहन.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आता दिवसेंदिवस चिघळत असल्याचं दिसून येत आहे. बेळगाव-हिरेबागवाडी येथील टोल नाक्यावर महाराष्ट्र पासिंगच्या ट्रकवर कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला होता. या घटनेनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

“या विषयावर महाराष्ट्र जर पेटला तर या सरकारला भारी पडेल. कर्नाटकाचं नंतर पाहू. डोळे मिटून बसलायत, स्वाभिमान, अस्मिता, महाराष्ट्राचा अभिमान, आपल्या लोकांविषयी प्रेम आहे का? की सर्व खोक्यात वाहून गेलं?” असा सवाल राऊत यांनी केला. माध्यमांशी बोलताना राऊत यांनी सरकारवर टीकेचा बाण सोडला.

“पुण्यात पडसाद उमटलेत. महाराष्ट्रासाठी लढणाऱ्या शिवसैनिकांना शिंदे फडणवीस सरकारचे पोलीस लाठ्याकाठ्यांनी बदडतायत, कोल्हापुरातही तेच झालं. तुम्ही कोणाचं काम करताय? तुमच्या अंगात जर मराठी रक्त असेल तर शिवसैनिकांना रोखू नका असं माझं महाराष्ट्र पोलिसांना आवाहन आहे,” असंही ते म्हणाले. “सरकार काय करतंय? मुख्यमंत्री कुठे आहेत? आम्ही त्या काळात बेळगावात जाऊन लाठ्या काठ्या खाल्ल्यात असं ते सांगतात. कधी खाल्ल्यात? सीमाप्रश्नासाठी लाठीकाठी खाल्ली असती तर आज ज्या खुर्चीवर तुम्ही बसले आहात त्या खुर्चीवरून कर्नाटकनं केलेला पाहिला नसता. आमच्या सार्वजनिक संपत्तीचं नुकसान कर्नाटकात केलं जातंय. तुम्ही कुठे भूमिगत झालायत?” असा सवालही त्यांनी केला.

“राज्यात कमकुवत सरकार”“राज्यात अत्यंत दुर्बळ, लाचार, कमकुवत सरकार आहे. या सरकारला पाय नसून खोके आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचं पाणी रोखण्याचं काम कर्नाटकात झालं. यापूर्वीही झालं. त्याला शिवसेनेने चोख उत्तर दिलंय. आजही शिवसेना त्याला प्रत्युत्तर देतेय,” असंही राऊत यांनी नमूद केलं. उद्धव ठाकरेही आज बोलले, आम्ही याधीही गेलोय, यापुढेही जाऊ. बेळगाव, कारवार महाराष्ट्राचा भाग आहे, आमच्या बापाचा आहे. आम्ही शेवटपर्यंत लढत राहू असंही त्यांनी स्पष्ट केलं.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसKarnatakकर्नाटक