शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
2
भारतीय सैन्यानं केली पाकची फजिती; पत्रकार परिषदेत फोटो दाखवत खोट्या दाव्याची पोलखोल
3
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमाची घोषणा, पोस्टर पाहून भडकले नेटकरी, म्हणाले- "लाज वाटत नाही?"
4
Operation Sindoor Live Updates: भारताच्या २६ ठिकाणांवर पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न
5
भारताच्या हल्ल्यानंतर झालेलं नुकसान लपवण्यासाठी पाकिस्तानची धडपड, काय काय करतंय वाचाच 
6
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तान बिथरला! पंतप्रधान शाहबाज यांचं आणखी एक नापाक पाऊल; अण्वस्त्रांशी थेट संबंध
7
कॅश, एटीएम, युपीआय... पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान सीतारामन यांचे बँकांना अलर्ट राहण्याचे निर्देश
8
Vikram Gaikwad Death: राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचं निधन
9
India vs Pakistan : जीडीपी, जॉब आणि डेव्हलपमेंटमध्ये पाकिस्तानची दूरपर्यंत भारताशी तुलना नाही; पाहा 'ही' आकडेवारी
10
India Pakistan Tension : पाकिस्तानच्या मिसाईलचे तुकडे हरियाणाच्या शेतात! सेनेने घेतले ताब्यात; दिल्लीवर होता निशाणा 
11
शिवाजी साटम यांच्या कमबॅकनंतर पार्थ समथानची CID 2 मधून एक्झिट; म्हणाला, "हे आधीच..."
12
India Pakistan: आणखी एक घाव! भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवादी लॉन्चिंग पॅड्स उडवले, व्हिडीओ बघा
13
India Pakistan Tension : खेळ महत्त्वाचा; पण आधी देश! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा खास संदेश
14
भारताविरोधात पाकिस्तानचं ऑपरेशन 'बुनयान उल मरसूस'; काय आहे या शब्दाचा अर्थ?
15
पाकिस्तानकडून भारताच्या नागरी वस्त्यांवर भ्याड हल्ले; घरांचे नुकसान, काही जखमी
16
Tarot Card: एकावेळी एका गोष्टीवर लक्ष द्या, नाहीतर तारांबळ उडेल; आगामी आठवडा संयम पाहणारा!
17
"मसूद अजहर-हाफिज सईद बिनधास्त फिरत आहेत...", 'गोपी बहू'नं पाकिस्तानला दाखवला आरसा, म्हणाली - युद्ध व्हायलाच पाहिजे...
18
Virat Kohli Test Retirement: रोहित शर्मानंतर विराट कोहलीचाही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय? BCCI ला दिली माहिती
19
इंटरनॅशनल मॉनेटरी फंड की 'टेररिस्ट फंड'? पाकिस्तानला IMF च्या फंडिंगवर भडकल्या प्रियंका चतुर्वेदी
20
India Pakistan Tension : उडवून टाकलं! भारत-पाक हल्ल्यादरम्यान अमृतसरमध्ये पाडले ड्रोन

कल्याण: ‘डम्पिंग’मुले युवकाचे लग्न मोडले

By admin | Updated: June 11, 2016 11:04 IST

आधारवाडी डम्पिंग ग्राउंडच्या परिसरात वास्तव्य करणाऱ्या विवाहोत्सुक मुलांची लग्ने दुर्गंधी, धूर आणि कोंडणारा श्वास यामुळे मोडत आहेत

कल्याण : आधारवाडी डम्पिंग ग्राउंडच्या परिसरात वास्तव्य करणाऱ्या विवाहोत्सुक मुलांची लग्ने दुर्गंधी, धूर आणि कोंडणारा श्वास यामुळे मोडत आहेत, अशी धक्कादायक माहिती हाती आली आहे. आम्हाला मुलगा पसंत आहे, पण तुम्ही आधारवाडीच्या जवळचे घर बदलायला तयार असाल तर आम्ही मुलगी देऊ, असे चक्क मुलींचे वडील आणि मुली सांगू लागल्याने या परिसरात राहणारी तरुण मुले हवालदिल झाली आहेत.डम्पिंगजवळील इमारतींत राहणाऱ्या व स्वत: पौरोहित्य करणाऱ्या अमोल जोशी यांना हा अनुभव आला आहे. या परिसरातील नागरिकांच्या एका शिष्टमंडळाने शुक्रवारी महापौर राजेंद्र देवळेकर यांची भेट घेतली. त्यावेळी आधारवाडी परिसरातील रहिवाशांना दुर्गंधीचा त्रास होतो. सतत आग लागण्याच्या घटना घडल्याने धुरामुळे त्यांचे डोळे चुरचुरतात, त्यांना श्वसनाचे विकार जडले आहेत, अशा तक्रारी करतानाच या भागातील उपवर मुलांची लग्ने जमत नसल्याची बाबही पुढे आली. जोशी हे ‘नीळकंठधारा’ इमारतीत राहतात. त्यांच्या आईचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे घरात अमोल व त्याचे वृद्ध वडील राहतात. मुलाचे दोनाचे चार हात करण्यासाठी वडिलांनी मुलगी पाहण्यास सुरुवात केली. मुलीच्या घरच्या मंडळींनी अमोलची चौकशी केली. लग्न जमण्याच्या बेतात होते. मात्र, त्याला अडसर आला तो आधारवाडी डम्पिंगचा. अमोलला आपली मुलगी दिल्यास तिला उर्वरित आयुष्य दुर्गंधी, धूर याचा जाच सहन करत काढावे लागणार, याची जाणीव झाल्याने त्या मुलीने व तिच्या आईवडिलांनी चक्क नकार कळवला. नकाराचे कारण ऐकून अमोल व त्याच्या वडिलांना धक्काच बसला. मात्र, नंतर चौकशी केली असता असा नकार मिळणारा काही तो एकटा नाही. आधारवाडी डम्पिंगच्या जवळ राहणारा मुलगा करायला अनेक वधू सर्रास नकार देत आहेत.अमोलने सांगितले की, मी पौरोहित्य करून चरितार्थ चालवतो. वडिलांनी घर घेतले होते. आता लग्नासाठी नकार आल्याने लागलीच नवे घर घेणे कसे शक्य आहे. कल्याणमध्ये ५० ते ६० लाखांच्या घरात फ्लॅटच्या किमती आहेत. त्यामुळे तूर्तास लग्नाचा विचार सोडला आहे. अमोलचे जमत आलेले लग्न तुटल्याने सोसायटीत राहणाऱ्या अन्य मुलांवर हेच संकट येऊ नये, याकरिता महिला व पुरुषांनी पुढाकार घेऊन महापौरांची भेट घेतली. त्यामध्ये नेहा रानडे, शलाका दळवी, सुनंदा शेटे, रश्मी बिरवाडकर यांच्यासह योगेश ठाकरे, प्रकाश बोरोले यांचा समावेश होता. स्थानिक नगरसेवक मोहन उगले हेही डम्पिंग ग्राउंडच्या प्रश्नाकडे लक्ष देत नसल्याचा आरोप त्यांनी केला. सुनंदा शेटे यांनी सांगितले की, त्या सहा वर्षांपासून ‘नीळकंठधारा’ सोसायटीत राहतात. इतकी तीव्र दुर्गंधी येते की, गेल्या काही वर्षांत दुर्गंधीमुळे त्यांचे जेवण जाण्याचे प्रमाण घटले आहे. आमच्या आरोग्यावर त्याचा दुष्परिणाम होत आहे. डम्पिंग ग्राउंडच्या कचऱ्याला आपोआप आग लागत नाही तर लावली जाते. हे त्यांनी डोळ्यांदेखत पाहिले आहे, असे त्यांनी महापौरांना सांगितले.रश्मी बिरवाडकर यांनी सांगितले की, त्या या परिसरात २० वर्षांपासून राहत आहे. ज्यावेळी घर घेतले तेव्हा डम्पिंगचा त्रास इतका नव्हता. डम्पिंग ग्राउंड बंद होणार, हे गेली कित्येक वर्षे आम्ही ऐकतो आहोत. आमचे सगळे आयुष्यच दुर्गंधी आणि धुराच्या लोटात जाणार की काय, असा आर्त सवाल त्यांनी केला.नेहा रानडे या १६ वर्षांपासून तेथे राहत आहेत. त्यांनी सांगितले की, आमच्या मुलांची लग्ने मोडू लागली. पूर्वी मुली निमूटपणे दिल्या घरी जात होत्या. आता त्या शिकल्यासवरल्या. त्यांना त्यांचे हित कळते. (प्रतिनिधी)फडणवीसांना दाखवणार काळे झेंडेयेत्या १७ जून रोजी कल्याण-डोंबिवली महापालिकेने ‘स्मार्ट सिटी शिखर परिषदे’चेआयोजन केले आहे. या परिषदेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. त्यावेळी आधारवाडी परिसरातील रहिवासी त्यांना काळे झेंडे दाखवून निषेध करणार असल्याचा इशारा नागरिकांनी दिला.डम्पिंगच्या प्रश्नावर महासभेत नेहमीच मी आवाज उठवतो. डम्पिंग ग्राउंड हटवणार, असे आश्वासन मी रहिवाशांना कधीच दिले नव्हते. हा मोठा प्रश्न आहे. तो एक-दोन दिवसांत चुटकीसरशी सुटणार नाही. मी नागरिकांच्या बाजूनेच आहे.मोहन उगले, स्थानिक नगरसेवककाळे झेंडे दुकानात लगेच मिळतात. मात्र, ते दाखवून प्रश्न सुटत नाही. महापालिकेकडून डम्पिंग ग्राउंड हटवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वी आघाडी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे हा प्रश्न रखडला होता. आता राज्यात आणि महापालिकेत युतीची सत्ता असल्याने हा प्रश्न लवकर मार्गी लागेल. -राजेंद्र देवळेकर, महापौर, कल्याण-डोंबिवली