शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

शरद पवार चर्चेचे दरवाजे कधीच बंद करत नाहीत; जितेंद्र आव्हाडांचं पटेलांना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2024 19:29 IST

संकोच हा मनाच्या मर्यादा दाखवतो. हे त्यांना काय कळणार, हे सत्तेसाठी वाटेल ते करतील असा टोला प्रफुल पटेलांना लगावला आहे.

ठाणे -  Jitendra Awhad on Praful Patel ( Marathi News ) जेव्हा माणसाला मन, हृदय आणि विचार असतात तेव्हा संकोच करतो. मला सत्तेत जायचंय म्हणून काय वाट्टेल ते करेन हे शरद पवारांना मान्य नव्हतं. शरद पवार हे व्यक्ती आहेत जे चर्चेचे दरवाजे कधीच बंद करत नाही. याचा अर्थ तुम्ही इतके वर्ष शरद पवारांसोबत राहून तुम्हाला शरद पवार समजलेच नाहीत असं विधान करत जितेंद्र आव्हाडांनी प्रफुल पटेल यांच्या विधानाला प्रत्युत्तर दिले आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, २ तारखेला मला भाजपासोबत जायचं नाही असं शरद पवारांनी जाहीर केले. त्यांच्याबाबत ५० टक्के ते भाजपासोबत जायला तयार होते असं म्हटलं जातं, हा ५० टक्के शब्द आणला कुठून? प्रफुल पटेल यांच्या डोक्यात काय आहे तेच शरद पवारांच्या मनात असलं पाहिजे असं काही नाही. २००४ साली भाजपासोबत जावूया ही प्रफुल पटेलांची इच्छा होती. पण तेच २००४ मध्ये मनात कुठलाही संकोच न बाळगता मंत्री झाले. माणूस संकोच तेव्हा करतो जेव्हा त्याला एखाद्या होणाऱ्या प्रकाराची लाज वाटते. जेव्हा होणाऱ्या प्रकाराने दु:ख वाटते. तेव्हा तो संकुचित होतो. संकोच हा मनाच्या मर्यादा दाखवतात. पण हे सत्तेसाठी वाटेल ते करतील असा टोला प्रफुल पटेलांना लगावला आहे.

तसेच तुमच्या हिताचे निर्णय घेतले नाहीत म्हणून शरद पवारांना संकोचित म्हणणं हे हास्यास्पद आहे. बातम्यात राहण्यासाठी तुम्हाला शरद पवारांचे नाव घ्यावे लागतात. शरद पवार कुठल्याही पक्षाचे नाव घेत नाही. पटेल शरद पवारांचे नाव घेतात आणि हेडलाईनमध्ये राहतात. पवार तुमच्याबाबत बोलत नाहीत मग कशाला तुम्ही शरद पवारांवर बोलता?. शरद पवार हे सत्तापिपासू नाहीत. १९६० पासून पक्ष संघटनेतून ते पुढे गेलेत.  शरद पवार डोक्यावर टोपली घेऊन गावागावात भाजी विकायचे हे किती जणांना माहिती आहे? असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं.

दरम्यान, सुप्रिया सुळे या शरद पवारांच्या रक्ताची आहे. जर त्यांना राजकीय फायदाच घ्यायचा असता तर त्यांनी सुप्रिया शरद पवार त्यापुढे सुळे लावलं असते. सुप्रिया सुळेंनी पवार नाव लावून घेतलं नाही. या निवडणुका कर्तृत्वावर लढायच्या असतात. तुमची लोकसभेतील कामगिरी किती, जागतिक माहिती किती, निवडणुकीत काही मुद्दे राहिले नाही त्यामुळे अशा मुद्द्यांवर येतात असं जितेंद्र आव्हाडांनी सांगितले आहे.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडPraful Patelप्रफुल्ल पटेलSharad Pawarशरद पवार