शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

नियतीनेच देवेंद्र फडणवीसांना घरी बसवले- जितेंद्र आव्हाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 07:10 IST

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता रडत बसले आहेत. ते म्हणताहेत की, वर्गात पहिला आलो तरी मला वर्गाच्या बाहेर बसवले आहे.

कासा : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता रडत बसले आहेत. ते म्हणताहेत की, वर्गात पहिला आलो तरी मला वर्गाच्या बाहेर बसवले आहे. पण नियतीनेच फडणवीसांना घरी बसवले आहे, अशी जोरदार टीका कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली. डहाणू तालुक्यातील कासा येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. या वेळी वाडा येथील आमदार सुनील भुसारा, माजी खासदार शंकर नम, जिजाऊ संघटनेचे प्रमुख नीलेश सांबरे, राष्ट्रवादी डहाणू अध्यक्ष राजेश पारेख, कष्टकरी संघटनेचे ब्रायन लोबो, कॉ. बारक्या मंगात, रफिक घांची, काशीनाथ चौधरी व या भागातील उमेदवार उपस्थित होते.जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले की, भाजपवाले जातीधर्माचे राजकारण करत आहेत. रहिवासी पुरावे मागत आहेत. हा देश आमचा आहे. यांना ६१ सालचे पुरावे कुठून आणणार? या ग्रामीण भागात इंटरनेट नाही. मोखाडा, जव्हारमध्ये अनेक समस्या आहेत. त्यामुळे पाच वर्षे आम्हाला सत्ता द्या. जिल्हा परिषदेत चांगली कामे करून दाखवतो. ही प्रचाराची सभा नाही तर विश्वासाची सभा आहे, असा टोला त्यांनी हाणला. दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कासा भागात येऊन प्रचार करून गेले होते.या वेळी डहाणू तालुक्यातील शिवसेनेचे डहाणू तालुका संघटक संतोष वझे व त्यांचा सहकाऱ्यांनी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या सभेत बोलताना नीलेश सांबरे म्हणाले की, अनेक नेते येऊन आदिवासी व इतर समाजात भांडणे लावत आहेत. पालघर जिल्हा परिषद हंडामुक्त करायची आहे. शिक्षण, आरोग्य याकडे लक्ष देण्याची गरज आहे. या वेळी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते. या वेळी माजी मंत्री शंकर नम यांचेही भाषण झाले.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाड