शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

CAA: मोदींच्या रूपाने हिटलरचा पुनर्जन्म: जितेंद्र आव्हाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2019 11:00 IST

औरंगाबादमध्ये नागरिकत्व कायद्याचा विरोधात काढण्यात आलेल्या आंदोलनात आव्हाड यांनी आपल्या भाषणातून भाजपवर जोरदार हल्ला चढवला.

मुंबई: नागरिकत्व कायद्याचा विरोधात देशभरात आंदोलन सुरु असून राज्यात सुद्धा याचे राजकीय पडसाद उमटत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर राष्ट्रवादी-काँग्रेसच्या नेत्यांकडून भाजपवर टीका करण्यात येत आहे.  याच मुद्यावरून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

देशात स्वातंत्र्यानंतर ही सर्वात मोठी लढाई आहे. मुस्लिमांचे नाव समोर करुन हिंदूंना गाफील ठेवण्याची ही नीती आहे. आसाम राज्यात १४ लाख हिंदू बांधवांकडे कागदपत्रे नाहीत. महाराष्ट्रातही ऊसतोड कामगार, पारधी समाज, असे अनेक समाज आहेत ज्यांच्याकडे पूर्वजांची कागदपत्रे सापडणार नाहीत. त्यामुळे नागरिकत्व कायद्याचा फटका त्यांना सुद्धा बसणार असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला.

तर मोदींच्या रुपाने 'हिटलर'चा पुनर्जन्म झाला आहे. लवकरच सोशल मीडियासाठी कायदा आणणार आहेत. तेव्हा तुम्ही काढलेले फोटो किंवा तुम्ही कोणासोबत संभाषण केले, हे सुद्धा मोदी यांना कळणार आहे. त्यांना तसेही दुसऱ्यांच्या घरात डोकावण्याची सवय असल्याचा खोचक टोला आव्हाड यांनी मोदींना लगावला.

औरंगाबादमध्ये नागरिकत्व कायद्याचा विरोधात काढण्यात आलेल्या आंदोलनात आव्हाड यांनी आपल्या भाषणातून भाजपवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी त्यांनी आपल्या कवितेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जहरी टीका केली. हा लढा हिंदू-मुस्लीम नव्हे तर हेगडेवार,गोळवलकर यांच्या विचारांच्या विरोधातील असल्याचे सुद्धा आव्हाड म्हणाले.