शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचं हिंदुत्व तेंव्हाच पुसल गेलं; जयंत पाटलांचा नितीन गडकरींना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2020 11:46 IST

हिंदुत्वाच्या मुद्दावरून शिवसेना आणि भाजप यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेल्यामुळे शिवसेना आता हिंदुत्वाचा पुरस्कार करू शकत नाही. तर शिवसेनेकडून भाजपने देशभरात केलेल्या विचित्र युत्यांविषयी प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

मुंबई - महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केल्यापासून शिवसेनेवर आपल्या जुन्या मित्रपक्षाकडून दररोज टीका होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सतत टीकेला सामोरे जावे लागत आहे. त्यात आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी उडी घेतली आहे. 

हिंदुत्वाचा विचार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी सांगितले. काँग्रेसने कधी शिवसेनेला समोर उभं राहू दिले नाही. मात्र हिंदुत्वाचा विचार बाजुला ठेवून शिवसेना काँग्रेसला सामील झाली आहे. त्यामुळे जनतेत नाराजी असल्याचे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. त्याला शिवसेना नेते संजय राऊत यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. काश्मीरमध्ये पीडीपीसोबत का गेला होता, असा सवाल राऊत यांनी भाजपला केला आहे. 

शिवसेना-भाजप यांच्या हिंदुत्वाच्या वादात जयंत पाटील यांनी उडी घेत भाजप आणि नितीन गडकरी यांना खोचक टोला लगावला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या साथीत मंत्रीपदाची शपथ घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला होता. त्यावेळी भाजपचं हिंदुत्व पुसलं गेलं आहे. गडकरींची व्याख्या अशी असेल तर भाजपला हिंदुत्वाचा पुरस्कार करता येणार नाही. किंबहुना हिंदु मतं भाजपच्या पारड्यात पडावी, यासाठी गडकरी यांचा प्रयत्न सुरू असल्याचे पाटील म्हणाले. 

दरम्यान हिंदुत्वाच्या मुद्दावरून शिवसेना आणि भाजप यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेल्यामुळे शिवसेना आता हिंदुत्वाचा पुरस्कार करू शकत नाही. तर शिवसेनेकडून भाजपने देशभरात केलेल्या विचित्र युत्यांविषयी प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.