शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
3
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
4
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
5
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
6
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
7
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
8
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
9
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
10
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
11
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
12
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
13
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
14
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
15
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
16
Extra Marital Affairs:मुलाचं लग्न ठरलं आणि होणाऱ्या सूनेच्या बापावरच जडला महिलेचा जीव; लग्नाआधीच दोघे गेले पळून
17
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
18
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
19
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
20
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!

जयकुमार गोरेंना मित्र पक्षाविरुद्धच द्यावी लागणार कडवी झुंज !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2019 11:54 IST

आपण भाजपमध्ये जाणार नसल्याचे विजयकुमार गोरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले होते. भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये गोरे भाजपमध्ये येण्यास धडपडत असल्याचे बोलले जात होते. त्यावर गोरे यांनी जोरदार टीका केली होती.

मुंबई - युद्धात आणि प्रेमात सर्व काही क्षम्य असतं अस म्हणत असतानाच राजकारणात सर्वकाही सदासर्वकाळ नसते असं म्हणण्याची वेळ आली आहे. एकमेकांचे समर्थक असणारे उद्या कट्टर विरोधक होतात, तर आज विरोधक असणारे अचानक समर्थक होतात. मात्र यामुळे अनेकदा मतदार संघातील समिकरणेच बदलतात. याचाच प्रत्येय मान-खटाव मतदार संघातील काँग्रेस आमदार जयकुमार गोरे यांना येण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसविरुद्ध काम करणारे गोरे यांनी भाजप प्रवेश नाकारला असला तरी, आघाडीतून निवडणुकीला सामोरे जाताना गोरे यांना अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

जयकुमार गोरे यांनी माढा लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले होते. त्याच आमदार गोरे यांची काँग्रेसने विधीमंडळातील प्रतोद म्हणून नेमणूक केली होती. त्यामुळे गोरे काँग्रेसमध्ये राहणार हे निश्चितच आहे. तसेच ते मान-खटाव मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार राहतील यावरही शंका घेण्याचे कारण नाही.

तत्पूर्वी, आपण भाजपमध्ये जाणार नसल्याचे विजयकुमार गोरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले होते. भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये गोरे भाजपमध्ये येण्यास धडपडत असल्याचे बोलले जात होते. त्यावर गोरे यांनी जोरदार टीका केली होती. त्यामुळे गोरे यांचा देखील भाजपमध्ये जाण्याचा कोणताही मनोदय नसल्याचे दिसून आले. परंतु, राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकीत झालेली चर्चा गोरे यांच्यासाठी अडचण निर्माण करणारी ठरू शकते.

मान-खटाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी गोरे यांच्याविरुद्ध भूमिका घेणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच लोकसभा निवडणुकीत आघाडीच्या उमेदवाराविरुद्ध भूमिका घेणाऱ्याला स्वाभिमान जागृत ठेवून धडा शिकवण्याचा निर्धार केला आहे.

२०१४ विधानसभा निवडणुकीत जयकुमार गोरे यांना ७५ हजार ७०७ मते मिळाली होती. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या शेखर गोरे यांना ५२ हजार ३५७ मते मिळाली होती. तर राष्ट्रवादीचे सदाशिव पोळ यांना ३५ हजार ५६२ आणि शिवसेनेच्या रणजीत देशमुख यांना ३१ हजार ३२ मते मिळाली होती. आघाडीच्या उमेदवारासाठी राष्ट्रवादीची ३५ हजार मते निर्णायक ठरणार आहेत. त्यामुळे मतदार संघातील राष्ट्रवादीच्या नेत्यांची सजजूत काढण्याचे आव्हान जयकुमार गोरे यांच्यासमोर आहे.