शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
2
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
3
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
4
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
5
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
6
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
7
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
8
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
9
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
10
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
11
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
12
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
13
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
14
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
15
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
16
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
17
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
18
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
19
IPL 2026 Auction: विस्फोटक फलंदाज आयपीएल २०२६ च्या मिनी ऑक्शनमध्ये अनसोल्ड, नाव ऐकून चकीत व्हाल!
20
बाई, हा काय प्रकार... LinkedIn वर फुल-टाइम गर्लफ्रेंडची व्हॅकन्सी, लोक विचारतात सॅलरी किती?
Daily Top 2Weekly Top 5

जयकुमार गोरेंना मित्र पक्षाविरुद्धच द्यावी लागणार कडवी झुंज !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2019 11:54 IST

आपण भाजपमध्ये जाणार नसल्याचे विजयकुमार गोरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले होते. भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये गोरे भाजपमध्ये येण्यास धडपडत असल्याचे बोलले जात होते. त्यावर गोरे यांनी जोरदार टीका केली होती.

मुंबई - युद्धात आणि प्रेमात सर्व काही क्षम्य असतं अस म्हणत असतानाच राजकारणात सर्वकाही सदासर्वकाळ नसते असं म्हणण्याची वेळ आली आहे. एकमेकांचे समर्थक असणारे उद्या कट्टर विरोधक होतात, तर आज विरोधक असणारे अचानक समर्थक होतात. मात्र यामुळे अनेकदा मतदार संघातील समिकरणेच बदलतात. याचाच प्रत्येय मान-खटाव मतदार संघातील काँग्रेस आमदार जयकुमार गोरे यांना येण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसविरुद्ध काम करणारे गोरे यांनी भाजप प्रवेश नाकारला असला तरी, आघाडीतून निवडणुकीला सामोरे जाताना गोरे यांना अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

जयकुमार गोरे यांनी माढा लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले होते. त्याच आमदार गोरे यांची काँग्रेसने विधीमंडळातील प्रतोद म्हणून नेमणूक केली होती. त्यामुळे गोरे काँग्रेसमध्ये राहणार हे निश्चितच आहे. तसेच ते मान-खटाव मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार राहतील यावरही शंका घेण्याचे कारण नाही.

तत्पूर्वी, आपण भाजपमध्ये जाणार नसल्याचे विजयकुमार गोरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले होते. भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये गोरे भाजपमध्ये येण्यास धडपडत असल्याचे बोलले जात होते. त्यावर गोरे यांनी जोरदार टीका केली होती. त्यामुळे गोरे यांचा देखील भाजपमध्ये जाण्याचा कोणताही मनोदय नसल्याचे दिसून आले. परंतु, राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकीत झालेली चर्चा गोरे यांच्यासाठी अडचण निर्माण करणारी ठरू शकते.

मान-खटाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी गोरे यांच्याविरुद्ध भूमिका घेणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच लोकसभा निवडणुकीत आघाडीच्या उमेदवाराविरुद्ध भूमिका घेणाऱ्याला स्वाभिमान जागृत ठेवून धडा शिकवण्याचा निर्धार केला आहे.

२०१४ विधानसभा निवडणुकीत जयकुमार गोरे यांना ७५ हजार ७०७ मते मिळाली होती. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या शेखर गोरे यांना ५२ हजार ३५७ मते मिळाली होती. तर राष्ट्रवादीचे सदाशिव पोळ यांना ३५ हजार ५६२ आणि शिवसेनेच्या रणजीत देशमुख यांना ३१ हजार ३२ मते मिळाली होती. आघाडीच्या उमेदवारासाठी राष्ट्रवादीची ३५ हजार मते निर्णायक ठरणार आहेत. त्यामुळे मतदार संघातील राष्ट्रवादीच्या नेत्यांची सजजूत काढण्याचे आव्हान जयकुमार गोरे यांच्यासमोर आहे.