शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

जव्हारला झोडपले, जिल्ह्यात रिपरिप सुरुच

By admin | Updated: July 15, 2017 02:58 IST

शहरातील आकार प्लाझा इमारती समोरील स्टॅण्डच्या शेजारच्या रस्त्याला ओढ्याचे स्वरूप येऊन परिसरातील व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले

लोकमत न्यूज नेटवर्कजव्हार : तालुक्यात बुधवारी रात्रीपासून पावसाची संततधार असून शहरातील आकार प्लाझा इमारती समोरील स्टॅण्डच्या शेजारच्या रस्त्याला ओढ्याचे स्वरूप येऊन परिसरातील व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. जिमखाना हॉल समोरील, जव्हारकर मिल समोरील रस्त्यावर एक ते दिड फूट पाणी भरून तेथील विक्रेत्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. शहरातील जिमखाना हॉल समोरील बिल्डींग मटेरीयल स्पलायचे दोन दुकाने व त्यांच्या बाजुला टायर व इनव्हर्टरचे दुकान असून बिल्डींग मटेरीयल मधील जुम्मानी व भुवर यांच्या दुकानात पाणी शिरल्यामुळे सिमेंटच्या गोणी भिजून मोठे नुकसान झाले. तर टायर व इनव्हर्टरच्या दुकानात पाणी शिरल्यामुळे त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. तसेच आकर प्लाझा व परिसरातील दुकानांतही मोठ्याप्रमाणात कपड्यांच्या व जनरल स्टोर्सच्या दुकानात पावसाचे पाणी शिरल्याने सामानांचे मोठे नुकसान झाले आहे. येथील अनियोजीत गटारांचे बांधकाम व त्यांची पावसापुर्वी साफसफाई न झाल्याने तुंबलेल्या गटारीमुळेच रस्त्यांवर पाणी साचून नुकसान झाल्यामुळे नगर परिषदेने झालेल्या नुकसानाची भरपाई करावी अशी मागणी इमरान जुम्मानी यांनी केली आहे. पावसामुळे काहीकाळ वाहतूकीवर परिणाम झाला होता.>पावसामुळे शेतीच्या कामांना सुरुवातविकमगड: तालुक्यात गेल्या आठवडयापासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे या भागातील शेतकऱ्याची भात लावण्याची कामे खोळबली होती. तालुक्यात ७,५५८ हेक्टर क्षेत्रावर भात शेती केली जाते. भात हे मुख्य पिक असून या वरच या भागातील आर्थिक उत्पन्न अवलूबन आहे. या अगोदर काही शेतकऱ्याची भात लावणी झाली होती ती पिके सुकू लागली होती काही शेतकऱ्यानी तरे विहिरपंप लाऊन भात लावणी सूरू केली परतू बुधवार पासून पुन्हा पावसाला चांगली सुरवात झाल्याने बळीराजाला दिलासा मिळाला असून पुन्हा शेतीची कामे सुरू झाली आहेत.गेले काही दिवस पावसाने तालुक्याातील शेतकऱ्यांना हुलकावणी दिल्यामुळे ते चांगलेच धास्तावले होते. मात्र आता पुन्हा तालुक्यात सर्वत्र शेतीच्या कामांना सुरवात झाली आहे. सलग पाऊस. झाल्यास यंदा भाताचे पीक चांगले येईल, असा अंदाज शेतकरी रणधिर पाटील यांनी लोकमतशी बोलतांना व्यक्त केला.>मोखाड्यात सर्वाधिक नोंदपालघर: गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने दमदार सुरु वात केली असून यामुळे बळीराजाची चिंता दूर होणार असे चित्र दिसत आहे. जिल्ह्यात शुक्रवारी सर्वाधिक पावसाची नोंद मोखाडा तालुक्यात १००.५ मिमी इतकी नोंद झाली आहे. त्याखालोखाल जव्हार ९४.० मिमी तर विक्र मगड तालुक्यात ६९.० मिमी, वाडा तालुक्यात ६८.३ मिमी, तलासरी ४३.१ मिमी,डहाणू तालुक्यात ३५.० मिमी, पालघर तालुक्यात १२.८ तर सर्वात कमी पाऊस वसई तालुक्यात झाला असून आजची तालुक्यातील पावसाची नोंद ४.२ अशी आहे.जिल्ह्यातील धरणांचा आजचा पाणीसाठा समाधान कारक असून धामणी धारण-प्रकल्पीय संकिल्पत क्षमता २७६.३५ दलघमी असून आजचा पाणीसाठा १९७.३७ दलघमी, कवडास-प्रकल्पीय संकिल्पत क्षमता ९.९६ दलघमी तर, आजचा पाणीसाठा ९.९६ दलघमी तर वांद्री -प्रकल्पीय संकिल्पत पाणीसाठा ३५.९४ दलघमी असून आजचा पाणीसाठा १६.२७ दलघमी आहे.>वसईत आभाळमायेला फुटला पाझरपारोळ : वसई भात लावणीच्या ऐन हंगामात आभाळमाया पातळ झाल्याने अनेक दिवसा पासून या परिसरात उन्ह सावली चा खेळ सुरु होता. तसेच भात लावणी हवा तसा पाऊस पडत असल्याने या भागात लावणीची कामे खोळंबली होती. पाऊस पडत नसल्याने लावणीचा हंगाम निघून जातो की काय अशी चिंता बळीराजाला लागली असतानाच आभाळ मायेने आपला पान्हा सोडल्यांने पुन्हा एकदा वसई भात लावणी च्या कामांना वेग आला आहे. गुरुवारी रात्रीपासूनच पावसाची संततधार असल्याने तालुक्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.या वर्षी पावसाची सरासरी जास्त असेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला तर पंचाग कर्त्यांनी नक्षत्र व त्यांचे वाहन या वर पावसाचा अंदाज बांधला. पण त्या अंदाजाला पावसाने खोटे ठरवले. दरम्यान, बळीराजाने मात्र अंदाजाच्या भरोशावर महागडी भात बियाणी पेरली आहेत. यावर्षी वेळोवेळी पावसाने दडी मारल्याने आधी पेरण्या नंतर आता भर भात लावणी च्या हंगामातही पाऊस सुट्टीवर गेल्याने बळीराजा हवालदिल झाला होता. पण पुनर्वसूच्या कोल्हाने लबाडी न करता चांगल्या पावसाच दान दिल्याने शेतीच्या कामांना वेग आला आहे.