शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

जालना जिल्हा परिषदेवरही महाविकास आघाडीचा झेंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 16:02 IST

आता पुन्हा एकदा जालना जिल्हा परिषद महाविकास आघाडीने बिनविरोध आपल्याकडे राखली आहे. भाजपने माघार घेतल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली आहे.

मुंबई - मराठवाड्यात महाविकास आघाडीचा वरचष्मा होताना दिसत आहे. औरंगाबाद, बीड पाठोपाठ आता जालना जिल्ह्यातही महाविकास आघाडीने जिल्हा परिषद आपल्या ताब्यात कायम ठेवली आहे. भाजपने माघार घेतल्यामुळे निवडणूक बिनविरोध पार पडली. 

राज्यात भाजपला दूर ठेवण्यासाठी शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीची स्थापन केली. यामुळे विधानसभा निवडणुकीत पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरूनही भाजपला सत्तेपासून दूर राहावे लागले आहे. मात्र महाविकास आघाडीच्या या प्रयोगाला सुरुवात आधीच झाली होती. जालना जिल्हा परिषदेत हा प्रयोग आधीच अस्तित्वाल आला आणि यशस्वीही ठरला. 

जिल्हा परिषदेत काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादीने आपली सत्ता राखली आहे. यामध्ये शिवसेनेला जिल्हा परिषद अध्यक्षपद मिळाले होते. तर राष्ट्रवादीला उपाध्यक्षपद मिळाले होते. आता पुन्हा एकदा जालना जिल्हा परिषद महाविकास आघाडीने बिनविरोध राखली आहे. भाजपने माघार घेतल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. शिवसेनेचे उत्तम वानखेडे आणि महेंद्र पवार यांची अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.