शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

जालना लाठीमार प्रकरण: 'ॲडिशनल डीजींच्या माध्यमातून चौकशी, कुणालाही पाठीशी घालणार नाही', मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

By निलेश जोशी | Updated: September 3, 2023 16:38 IST

Eknath Shinde: जालना येथील लाठीमार प्रकरणी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला असून ॲडीशनल डिजी (लॉ ॲन्ड ऑर्डर) सक्सेना यांच्या माध्यमतातून आंतरवली सराटी येथील लाठीमार प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे.

- नीलेश जोशीबुलढाणा - जालना येथील लाठीमार प्रकरणी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला असून ॲडीशनल डिजी (लॉ ॲन्ड ऑर्डर) सक्सेना यांच्या माध्यमतातून आंतरवली सराटी येथील लाठीमार प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. ४ सप्टेंबर रोजी ते जालन्यात पोहोचतील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

बुलढाणा येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमानिमित्ताने ते ३ सप्टेंबर रोजी आले असता त्यांनी ही बाब स्पष्ट केली. सोबतच गरज पडल्यास या प्रकरणी न्यायालयीन चौकशी करण्याचीही भूमिका त्यांनी अधोरेखीत केली आहे. मराठा समाजाला भक्क व टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नरत आहे. त्याशिवाय हे सरकार स्वस्थ बसणार नाही. त्याची प्रक्रियाही सुरू केली आहे. नेमके आम्ही काय करणार आहोत हे सगळच येथे सांगत नाही. कारण काड्या करणारे पुन्हा काड्या करतील, अशी टिकाही त्यांनी विराेधकांवर केली. लवकच मराठा समाजाला त्यांचे हक्काचे आरक्षण मिळेल. न्याय मिळेल असा आमचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथील घटना दुर्देवी आहे. ती व्हायला नको होती. आंदोलक मनोज जरंगे पाटील यांच्याशी तीन दिवसापूर्वी आपण बोललो होता. प्रकृती खालावत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचे आपण सांगितले होते. त्यांच्या मुद्द्यावरही राज्य शासन काम करत आहे. आपल्या जरंगे पाटील यांच्यासोबत तीन ते चार बैठका झाल्या होत्या. पण दुर्देवाने ही घटना घडली.

या दुर्देवी घटनेस जबाबदार असलेेले तेथील पोलिस अधीक्षक तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय घेण्याबाबत सांगण्यात आले आहे. सोबतच दुसरे ॲडीशनल एसपी व डीवायएसपींना जिल्ह्याबारे पाठविण्याचा निर्णयही घेण्यात येत आहे.

ॲडीशनल डिजी (लॉ ॲन्ड ऑर्डर) सक्सेना हे या प्रकरणाची चौकशी करणार आहे. ४ सप्टेंबर रोजी ते जालन्यात पोहोचतील. या प्रकरणाच्या चौकशीमध्ये जे दोषी आढळतील त्यांना त्वरित निलंबीत करण्यात येईल. वेळ पडली तर न्यायालयीन चौकशीही करण्यात येईल, याबाबत आपण आपणास आश्वस्त करत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

दरम्यान या मुद्द्यावर काहीजण आपली राजकीय पोळी भाजू इच्छित आहे. त्यांना बळी पडून नका. हे सरकार सर्वसामान्यांचे आहे. सामान्य माणसला अंतर दिले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेMaratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालनाbuldhanaबुलडाणा