शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
2
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
3
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
4
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
5
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
6
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
7
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
8
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
9
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
10
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
11
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
12
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
13
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
14
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
15
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
16
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
17
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
18
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
19
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
20
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
Daily Top 2Weekly Top 5

जालना लाठीमार प्रकरण: 'ॲडिशनल डीजींच्या माध्यमातून चौकशी, कुणालाही पाठीशी घालणार नाही', मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

By निलेश जोशी | Updated: September 3, 2023 16:38 IST

Eknath Shinde: जालना येथील लाठीमार प्रकरणी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला असून ॲडीशनल डिजी (लॉ ॲन्ड ऑर्डर) सक्सेना यांच्या माध्यमतातून आंतरवली सराटी येथील लाठीमार प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे.

- नीलेश जोशीबुलढाणा - जालना येथील लाठीमार प्रकरणी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला असून ॲडीशनल डिजी (लॉ ॲन्ड ऑर्डर) सक्सेना यांच्या माध्यमतातून आंतरवली सराटी येथील लाठीमार प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. ४ सप्टेंबर रोजी ते जालन्यात पोहोचतील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

बुलढाणा येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमानिमित्ताने ते ३ सप्टेंबर रोजी आले असता त्यांनी ही बाब स्पष्ट केली. सोबतच गरज पडल्यास या प्रकरणी न्यायालयीन चौकशी करण्याचीही भूमिका त्यांनी अधोरेखीत केली आहे. मराठा समाजाला भक्क व टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नरत आहे. त्याशिवाय हे सरकार स्वस्थ बसणार नाही. त्याची प्रक्रियाही सुरू केली आहे. नेमके आम्ही काय करणार आहोत हे सगळच येथे सांगत नाही. कारण काड्या करणारे पुन्हा काड्या करतील, अशी टिकाही त्यांनी विराेधकांवर केली. लवकच मराठा समाजाला त्यांचे हक्काचे आरक्षण मिळेल. न्याय मिळेल असा आमचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथील घटना दुर्देवी आहे. ती व्हायला नको होती. आंदोलक मनोज जरंगे पाटील यांच्याशी तीन दिवसापूर्वी आपण बोललो होता. प्रकृती खालावत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचे आपण सांगितले होते. त्यांच्या मुद्द्यावरही राज्य शासन काम करत आहे. आपल्या जरंगे पाटील यांच्यासोबत तीन ते चार बैठका झाल्या होत्या. पण दुर्देवाने ही घटना घडली.

या दुर्देवी घटनेस जबाबदार असलेेले तेथील पोलिस अधीक्षक तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय घेण्याबाबत सांगण्यात आले आहे. सोबतच दुसरे ॲडीशनल एसपी व डीवायएसपींना जिल्ह्याबारे पाठविण्याचा निर्णयही घेण्यात येत आहे.

ॲडीशनल डिजी (लॉ ॲन्ड ऑर्डर) सक्सेना हे या प्रकरणाची चौकशी करणार आहे. ४ सप्टेंबर रोजी ते जालन्यात पोहोचतील. या प्रकरणाच्या चौकशीमध्ये जे दोषी आढळतील त्यांना त्वरित निलंबीत करण्यात येईल. वेळ पडली तर न्यायालयीन चौकशीही करण्यात येईल, याबाबत आपण आपणास आश्वस्त करत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

दरम्यान या मुद्द्यावर काहीजण आपली राजकीय पोळी भाजू इच्छित आहे. त्यांना बळी पडून नका. हे सरकार सर्वसामान्यांचे आहे. सामान्य माणसला अंतर दिले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेMaratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालनाbuldhanaबुलडाणा