शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
4
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
5
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
6
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
7
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
8
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
9
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
10
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
11
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
12
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
13
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
14
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
15
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
16
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
17
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
18
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
19
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
20
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!

जालना लाठीमार प्रकरण: 'ॲडिशनल डीजींच्या माध्यमातून चौकशी, कुणालाही पाठीशी घालणार नाही', मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

By निलेश जोशी | Updated: September 3, 2023 16:38 IST

Eknath Shinde: जालना येथील लाठीमार प्रकरणी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला असून ॲडीशनल डिजी (लॉ ॲन्ड ऑर्डर) सक्सेना यांच्या माध्यमतातून आंतरवली सराटी येथील लाठीमार प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे.

- नीलेश जोशीबुलढाणा - जालना येथील लाठीमार प्रकरणी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला असून ॲडीशनल डिजी (लॉ ॲन्ड ऑर्डर) सक्सेना यांच्या माध्यमतातून आंतरवली सराटी येथील लाठीमार प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. ४ सप्टेंबर रोजी ते जालन्यात पोहोचतील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

बुलढाणा येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमानिमित्ताने ते ३ सप्टेंबर रोजी आले असता त्यांनी ही बाब स्पष्ट केली. सोबतच गरज पडल्यास या प्रकरणी न्यायालयीन चौकशी करण्याचीही भूमिका त्यांनी अधोरेखीत केली आहे. मराठा समाजाला भक्क व टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नरत आहे. त्याशिवाय हे सरकार स्वस्थ बसणार नाही. त्याची प्रक्रियाही सुरू केली आहे. नेमके आम्ही काय करणार आहोत हे सगळच येथे सांगत नाही. कारण काड्या करणारे पुन्हा काड्या करतील, अशी टिकाही त्यांनी विराेधकांवर केली. लवकच मराठा समाजाला त्यांचे हक्काचे आरक्षण मिळेल. न्याय मिळेल असा आमचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथील घटना दुर्देवी आहे. ती व्हायला नको होती. आंदोलक मनोज जरंगे पाटील यांच्याशी तीन दिवसापूर्वी आपण बोललो होता. प्रकृती खालावत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचे आपण सांगितले होते. त्यांच्या मुद्द्यावरही राज्य शासन काम करत आहे. आपल्या जरंगे पाटील यांच्यासोबत तीन ते चार बैठका झाल्या होत्या. पण दुर्देवाने ही घटना घडली.

या दुर्देवी घटनेस जबाबदार असलेेले तेथील पोलिस अधीक्षक तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय घेण्याबाबत सांगण्यात आले आहे. सोबतच दुसरे ॲडीशनल एसपी व डीवायएसपींना जिल्ह्याबारे पाठविण्याचा निर्णयही घेण्यात येत आहे.

ॲडीशनल डिजी (लॉ ॲन्ड ऑर्डर) सक्सेना हे या प्रकरणाची चौकशी करणार आहे. ४ सप्टेंबर रोजी ते जालन्यात पोहोचतील. या प्रकरणाच्या चौकशीमध्ये जे दोषी आढळतील त्यांना त्वरित निलंबीत करण्यात येईल. वेळ पडली तर न्यायालयीन चौकशीही करण्यात येईल, याबाबत आपण आपणास आश्वस्त करत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

दरम्यान या मुद्द्यावर काहीजण आपली राजकीय पोळी भाजू इच्छित आहे. त्यांना बळी पडून नका. हे सरकार सर्वसामान्यांचे आहे. सामान्य माणसला अंतर दिले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेMaratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालनाbuldhanaबुलडाणा