शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
2
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
3
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
4
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
5
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...
6
'द फॅमिली मॅन' सीझन ३ 'या' तारखेला होणार प्रदर्शित; 'नोव्हेंबर'मध्ये थरार पाहण्यासाठी सज्ज व्हा!
7
Yogi Adityanath: आता यूपीतील लोकांना उपचारांसाठी दिल्लीला जाण्याची गरज नाही: योगी आदित्यनाथ 
8
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
9
२०२५ मध्ये तिसऱ्यांदा डिविडेंड देणार 'ही' डिफेन्स कंपनी, एका शेअरवर ६ रुपयांचा फायदा; पटापट चेक करा डिटेल्स
10
लाडकी बहीण योजनेसाठी सरकार किती निधी देते? ‘इतके’ कोटी होतात खर्च, आकडा पाहून व्हाल अवाक्
11
तुम्ही देखील सोने-चांदी खरेदी करुन घरात ठेवलंय? CA नितीन कौशिक म्हणतात ही गुंतवणूक नाही तर...
12
राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका पडणार लांबणीवर? समोर येतंय असं कारण 
13
Suryakumar Yadav: श्रेयसच्या दुखापतीची बातमी मिळताच सूर्याचा फिजिओला फोन, आता कशी आहे त्याची तब्येत?
14
"पुन्हा मलाच...", तिसरी वेळ राष्ट्राध्यक्ष बनण्याची इच्छा; स्वतःचं कौतुक करत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...
15
प्रत्येक टनामागे १ रुपया...! 'वसंतदादा शुगर'ची चौकशी लागली; शरद पवार, अजितदादांशी संबंधीत संस्था कचाट्यात
16
"पुढच्या दीड वर्षात सिनेमा बंद होईल...", महेश मांजरेकरांनी केलं भाकीत; असं का म्हणाले?
17
समस्त ओला ईलेक्ट्रीक स्कूटर मालकांसाठी महत्वाची बातमी! तुमचे तुम्हीच स्पेअर पार्ट घ्या, मेकॅनिककडून दुरुस्त करा...
18
२५ देशामध्ये अफाट संपत्ती, मॉलचेही आहेत मालक; 'हे' आहेत UAE चे सर्वात श्रीमंत भारतीय, ५० हजार कोटींपेक्षा अधिक नेटवर्थ
19
मंदीच्या काळातही ‘या’ 8 क्षेत्रांत कर्मचारी कपातीचा धोका नाही, भविष्यात मोठी संधी; जाणून घ्या...
20
VIRAL : महिला प्रवासी रिक्षात विसरली इयरफोन; वस्तू परत करण्यासाठी रिक्षा चालकाने लढवली 'अशी' शक्कल! होतंय कौतुक

अपूर्ण घरकूल उद्दिष्टपूर्तीमध्ये जळगाव राज्यात अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2017 08:45 IST

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने आधुनिक तंत्रज्ञान, सोशल मीडियाचा वापर करत दहा वर्षात ३७ हजार ८८५ जणांना घरकूलांचा लाभ मिळवून देत ९० टक्के काम पूर्ण केले आहे. 

जळगाव,दि.४ - जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत २००६ पासून ४१ हजार ९७८ घरकूले अपूर्ण होती. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने आधुनिक तंत्रज्ञान, सोशल मीडियाचा वापर करत दहा वर्षात ३७ हजार ८८५ जणांना घरकूलांचा लाभ मिळवून देत ९० टक्के काम पूर्ण केले आहे. या कामगिरीमुळे या अपूर्ण घरकुलांच्या उद्दिष्टपूर्तीमध्ये जळगाव जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे.

इंदिरा आवास योजना असे योजनेचे पूर्वीचे नाव आहे़ २०१५ पासून ही योजना प्रधानमंत्री आवास योजना या नावाने रुपांतरीत झाली़ २००५-०६ या आर्थिक वर्षात या योजनेतंर्गत ४१ हजार ९७८ घरकुले पूर्ण करण्याचे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेसमोर आव्हान होते़ ते पूर्ण करण्यासाठी यंत्रणा कामाला लागली होती. प्रत्येक तालुक्यात शिबिर, सभा घेण्यात आल्या़ यात अडचणी, तसेच आवश्यक त्या सूचनांचे मार्गदर्शन अधिकाºयांना तसेच लाभार्थींना करण्यात आले.

३७ हजार ८८५ जणांचे घराचे स्वप्न साकारप्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत विभागाने गेल्या दहा वर्षात जिल्ह्यातील ३७ हजार ८८५ जणांच्या घराचे स्वप्न साकार करीत घरकुले मिळवून दिली आहे़ प्रत्येक लाभार्थीच्या थेट खात्यावर तीन टप्प्यात अनुदान जमा झाले. केवळ अनुदानच नाही तर घरकुले पूर्ण होईपर्यंत विभागाने पाठपुरावा केला. यात प्रत्येक घरकुलात शौचालयाबाबतही विशेष काळजी घेण्यात आली.तंत्रज्ञान विकसीत केलेघरकुले पूर्ण करण्यासाठी विभागाने केवळ सभा, शिबिरेच नाही तर तंत्रज्ञानाचाही वापर केला़ जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे जिल्हा समन्वयक सुनील मोरे यांनी गुगल ड्राईव्हच्या माध्यमातून तंत्रज्ञान विकसीत केले़ या तंत्रज्ञानानुसार मोरे यांच्याकडून यानुसार प्रत्येक तालुका, गाव येथील कामांचा आढावा घेतला जात होता़ व काम पूर्ण होईपर्यंत तंत्रज्ञानाच्या मदतीने जिल्ह्याच्या कामावर संनियंत्रण ठेवण्यात आले.हॉटस् अ‍ॅपचाही केला उपयोगहॉटस्अ‍ॅप व सोशल मीडीयाचाही उद्दीष्ट पूर्ण करताना वापर झाला़ जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून प्रकल्प संचालक विक्रांत बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली व्हॉटस् अ‍ॅपवर ग्रुप तयार करण्यात आला़ यात प्रकल्प संचालक, जि़प़मुख्य कार्यकारी अधिकारी, शाखा अभियंता, उपअभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, संगणक परिचालक तसेच घरकुलाशी संबंधित सर्व यंत्रणा यांचा समावेश होता़ गु्रपव्दारे दररोज कामाचा आढावा घेतला गेला़ व अडचणी तत्काळ सोडविण्यात आल्या़ परिणामी आपोआपच कामाचा वेग वाढला.आर्थिक जातीनिहाय सर्वेक्षणातील १२ हजार ७५७ जणांना घरकुलेअपूर्ण घरकुलांची उद्दिष्टपूर्ती करत असताना इतर योजनेतील घरकुल उद्दिष्टपूर्तीकडे विभागाचे दुर्लक्ष झाले नाही़ २०११ मध्ये शासनाने केलेल्या सामाजिक आर्थिक जातनिहाय सर्वेक्षणनुसार ८३ हजार ४९४ लाभार्थी प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांसाठी पात्र ठरले होते़ २०१६-१७ या आर्थिक वर्षात त्यापैकी १२ हजार ७५७ जणांना विभागाने लाभ मिळवून घरकुले पूर्ण केली आहे़ तसेच गेल्या वर्षी शबरी , रमाई तसेच पारधी या तिन्ही योजनेतील उद्दीष्टांनुसार एकूण तीन हजार १६८ लाभार्थींचे घरकुलांचे स्वप्न पूर्ण केले आहे़राज्यात जिल्हा अव्वलघरकुले ४१९७८पूर्ण ३७८८५अपूर्ण ४०९३९० टक्के काम पूर्णकोटअपूर्ण घरकुले पूर्ण करण्याच्या उपक्रमात जळगाव जिल्हा राज्यात प्रथम आहे. त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पंचायत समिती, गटविकास अधिकारी व संबंधित यंत्रणेतील अधिकारी, कर्मचाºयांचे सहकार्य मिळाले़ हे पूर्ण यंत्रणेचे यश आहे़ आगामी काळात विविध योजनांच्या उद्दिष्टपूर्तीमध्ये जिल्हा कसा अव्वल राहिल, यासाठी प्रयत्नशिल आहे़- विक्रांत बगाडे, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा