शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

अपूर्ण घरकूल उद्दिष्टपूर्तीमध्ये जळगाव राज्यात अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2017 08:45 IST

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने आधुनिक तंत्रज्ञान, सोशल मीडियाचा वापर करत दहा वर्षात ३७ हजार ८८५ जणांना घरकूलांचा लाभ मिळवून देत ९० टक्के काम पूर्ण केले आहे. 

जळगाव,दि.४ - जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत २००६ पासून ४१ हजार ९७८ घरकूले अपूर्ण होती. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने आधुनिक तंत्रज्ञान, सोशल मीडियाचा वापर करत दहा वर्षात ३७ हजार ८८५ जणांना घरकूलांचा लाभ मिळवून देत ९० टक्के काम पूर्ण केले आहे. या कामगिरीमुळे या अपूर्ण घरकुलांच्या उद्दिष्टपूर्तीमध्ये जळगाव जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे.

इंदिरा आवास योजना असे योजनेचे पूर्वीचे नाव आहे़ २०१५ पासून ही योजना प्रधानमंत्री आवास योजना या नावाने रुपांतरीत झाली़ २००५-०६ या आर्थिक वर्षात या योजनेतंर्गत ४१ हजार ९७८ घरकुले पूर्ण करण्याचे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेसमोर आव्हान होते़ ते पूर्ण करण्यासाठी यंत्रणा कामाला लागली होती. प्रत्येक तालुक्यात शिबिर, सभा घेण्यात आल्या़ यात अडचणी, तसेच आवश्यक त्या सूचनांचे मार्गदर्शन अधिकाºयांना तसेच लाभार्थींना करण्यात आले.

३७ हजार ८८५ जणांचे घराचे स्वप्न साकारप्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत विभागाने गेल्या दहा वर्षात जिल्ह्यातील ३७ हजार ८८५ जणांच्या घराचे स्वप्न साकार करीत घरकुले मिळवून दिली आहे़ प्रत्येक लाभार्थीच्या थेट खात्यावर तीन टप्प्यात अनुदान जमा झाले. केवळ अनुदानच नाही तर घरकुले पूर्ण होईपर्यंत विभागाने पाठपुरावा केला. यात प्रत्येक घरकुलात शौचालयाबाबतही विशेष काळजी घेण्यात आली.तंत्रज्ञान विकसीत केलेघरकुले पूर्ण करण्यासाठी विभागाने केवळ सभा, शिबिरेच नाही तर तंत्रज्ञानाचाही वापर केला़ जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे जिल्हा समन्वयक सुनील मोरे यांनी गुगल ड्राईव्हच्या माध्यमातून तंत्रज्ञान विकसीत केले़ या तंत्रज्ञानानुसार मोरे यांच्याकडून यानुसार प्रत्येक तालुका, गाव येथील कामांचा आढावा घेतला जात होता़ व काम पूर्ण होईपर्यंत तंत्रज्ञानाच्या मदतीने जिल्ह्याच्या कामावर संनियंत्रण ठेवण्यात आले.हॉटस् अ‍ॅपचाही केला उपयोगहॉटस्अ‍ॅप व सोशल मीडीयाचाही उद्दीष्ट पूर्ण करताना वापर झाला़ जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून प्रकल्प संचालक विक्रांत बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली व्हॉटस् अ‍ॅपवर ग्रुप तयार करण्यात आला़ यात प्रकल्प संचालक, जि़प़मुख्य कार्यकारी अधिकारी, शाखा अभियंता, उपअभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, संगणक परिचालक तसेच घरकुलाशी संबंधित सर्व यंत्रणा यांचा समावेश होता़ गु्रपव्दारे दररोज कामाचा आढावा घेतला गेला़ व अडचणी तत्काळ सोडविण्यात आल्या़ परिणामी आपोआपच कामाचा वेग वाढला.आर्थिक जातीनिहाय सर्वेक्षणातील १२ हजार ७५७ जणांना घरकुलेअपूर्ण घरकुलांची उद्दिष्टपूर्ती करत असताना इतर योजनेतील घरकुल उद्दिष्टपूर्तीकडे विभागाचे दुर्लक्ष झाले नाही़ २०११ मध्ये शासनाने केलेल्या सामाजिक आर्थिक जातनिहाय सर्वेक्षणनुसार ८३ हजार ४९४ लाभार्थी प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांसाठी पात्र ठरले होते़ २०१६-१७ या आर्थिक वर्षात त्यापैकी १२ हजार ७५७ जणांना विभागाने लाभ मिळवून घरकुले पूर्ण केली आहे़ तसेच गेल्या वर्षी शबरी , रमाई तसेच पारधी या तिन्ही योजनेतील उद्दीष्टांनुसार एकूण तीन हजार १६८ लाभार्थींचे घरकुलांचे स्वप्न पूर्ण केले आहे़राज्यात जिल्हा अव्वलघरकुले ४१९७८पूर्ण ३७८८५अपूर्ण ४०९३९० टक्के काम पूर्णकोटअपूर्ण घरकुले पूर्ण करण्याच्या उपक्रमात जळगाव जिल्हा राज्यात प्रथम आहे. त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पंचायत समिती, गटविकास अधिकारी व संबंधित यंत्रणेतील अधिकारी, कर्मचाºयांचे सहकार्य मिळाले़ हे पूर्ण यंत्रणेचे यश आहे़ आगामी काळात विविध योजनांच्या उद्दिष्टपूर्तीमध्ये जिल्हा कसा अव्वल राहिल, यासाठी प्रयत्नशिल आहे़- विक्रांत बगाडे, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा