शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
3
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
4
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
5
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
6
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
7
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
8
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
9
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
10
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
11
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
12
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
13
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
14
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
15
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
16
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
17
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
18
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
19
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
20
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा

जळगाव : संविधान मेळाव्यापूर्वीच ४१ जणांना अटक, लोकशाही हक्कांवर गदा आणल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 03:12 IST

पोलिसांची परवानगी नसताना रविवारी दुपारी येथे आयोजित संविधान जागर मेळावा घेण्याासाठी आलेल्या ४१ कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. रेल्वे स्थानक परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ लोकशाहीवादी नागरिक मंचतर्फे हा मेळावा घेण्यात येणार होता.

जळगाव : पोलिसांची परवानगी नसताना रविवारी दुपारी येथे आयोजित संविधान जागर मेळावा घेण्याासाठी आलेल्या ४१ कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. रेल्वे स्थानक परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ लोकशाहीवादी नागरिक मंचतर्फे हा मेळावा घेण्यात येणार होता. सरकारने लोकशाही हक्कांवर गदा आणल्याचा आरोप आंदोलकांनी केला.सुरुवातीला नूतन मराठा महाविद्यालयात गुजरातमधील दलित नेते व आमदार जिग्नेश मेवानी यांच्या मुख्य उपस्थितीत हा मेळावा होणार होता. मात्र कोरेगाव-भीमा येथील हल्ल्याच्या घटनेनंतर राज्यात हिंसक प्रतिक्रिया उमटली. त्यानंतर मेवानी यांच्या सभेला सध्या राज्यात कोठेही परवानगी न देण्याचा निर्णय पोलीस महासंचालकांनी घेतला आहे.कोल्हापूरमध्ये तोडफोड; १८० जणांना अटककोल्हापूर : कोरेगाव भीमा येथील हल्ल्याच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदमध्ये झालेल्या हिंसाचाराप्रकरणी रविवारी येथे आणखी १९ जणांना अटक करण्यात आली. तीन दिवसांत १८० आंदोलकांना अटक झाली आहे. पोलिसांनी सर्वांची छत्रपती प्रमिलाराजे (सीपीआर) रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. सीसीटीव्ही फुटेजवरून तोडफोड करणाºया आंदोलकांना पकडले जात आहे.कन्हैया कुमारच्या उपस्थितीत परिषद-पुणे : दलित महासंघाच्यावतीने जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता कन्हैया कुमार याच्या उपस्थितीत २८ जानेवारी रोजी ‘सावधान परिषदे’चे आयोजन करण्यात आल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष प्रा. मच्छिंद्र सकटे यांनी पत्रकारांना दिली. भीमा-कोरेगाव येथे दोन गटांत उद्भवलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मातंग समाजातील विविध संघटनांची बैठक आयोजित करण्यात आली होती. धर्मांध शक्तींपासून दलित समाजाला जागृत करण्यासाठी सावधान परिषदेचे आयोजन केल्याचे सकटे यांनी सांगितले. या परिषदेत लहुजी संघर्ष सेना, लहुजी महासंघ, दलित संघर्ष समिती, आ.ल.व.सा.फांऊडेशन, अखिल भारतीय बहुजन सेना, लहुजी स्मारक समिती संगमवाडी, दलित विकास आघाडीसह विविध संघटना भाग घेणार आहेत.प्रकाश आंबेडकरांविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची मागणी-सांगली : कोरेगाव-भीमा येथे आंबेडकरी अनुयायांवर झालेल्या हल्ल्यानंतर पुकारलेल्या ‘बंद’ला हिंसक वळण लागून त्यात एक-दोघांचा बळी गेल्याचा दावा शिवप्रतिष्ठानचे कार्यवाह नितीन चौगुले यांनी केला आहे. त्याप्रकरणी प्रकाश आंबेडकर यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. संभाजीराव भिडे यांच्याविरुद्धचे गुन्हे शासनाने सन्मानपूर्वक मागे घ्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.सरकार हमसे डरती है...पोलिसांनी धरपकड करताच, ‘सरकार हमसे डरती है, पुलीस को आगे करती है’ या घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. अटक झालेल्यांमध्ये प्रा. शेखर सोनाळकर, वासंती दीघे, गायत्री सोनवणे, मीराबाई सोनवणे, प्रतिभा शिरसाठ आदींचा समावेश आहे.कोरेगाव भीमा हिंसाचारामागे अदृश्य लोक - उद्धव ठाकरेमुंबई : अदृश्य लोक येतात आणि जातीपातीचे राजकारण करतात. जातीपातीचे राजकारण करत जो कोणी स्वत:ची पोळी भाजून घेणार असतील त्यांना शिवसेना सोडणार नाही. कोरेगाव-भीमा घडविणा-यांनी हिंमत असेल तर पुढे येऊन सांगावे असे आव्हान देतानाच राममंदिर बांधण्याची भाषा करणारे बाबरी मस्जिद पाडताना पळून का गेले, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी भाजपाला केला. चेंबूर येथे नव्याने उभारण्यात आलेल्या प्रवेशद्वाराच्या उद्घाटनप्रसंगी ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर सडकून टीका केली.

टॅग्स :Jalgaonजळगाव