शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

जळगाव : संविधान मेळाव्यापूर्वीच ४१ जणांना अटक, लोकशाही हक्कांवर गदा आणल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 03:12 IST

पोलिसांची परवानगी नसताना रविवारी दुपारी येथे आयोजित संविधान जागर मेळावा घेण्याासाठी आलेल्या ४१ कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. रेल्वे स्थानक परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ लोकशाहीवादी नागरिक मंचतर्फे हा मेळावा घेण्यात येणार होता.

जळगाव : पोलिसांची परवानगी नसताना रविवारी दुपारी येथे आयोजित संविधान जागर मेळावा घेण्याासाठी आलेल्या ४१ कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. रेल्वे स्थानक परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ लोकशाहीवादी नागरिक मंचतर्फे हा मेळावा घेण्यात येणार होता. सरकारने लोकशाही हक्कांवर गदा आणल्याचा आरोप आंदोलकांनी केला.सुरुवातीला नूतन मराठा महाविद्यालयात गुजरातमधील दलित नेते व आमदार जिग्नेश मेवानी यांच्या मुख्य उपस्थितीत हा मेळावा होणार होता. मात्र कोरेगाव-भीमा येथील हल्ल्याच्या घटनेनंतर राज्यात हिंसक प्रतिक्रिया उमटली. त्यानंतर मेवानी यांच्या सभेला सध्या राज्यात कोठेही परवानगी न देण्याचा निर्णय पोलीस महासंचालकांनी घेतला आहे.कोल्हापूरमध्ये तोडफोड; १८० जणांना अटककोल्हापूर : कोरेगाव भीमा येथील हल्ल्याच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदमध्ये झालेल्या हिंसाचाराप्रकरणी रविवारी येथे आणखी १९ जणांना अटक करण्यात आली. तीन दिवसांत १८० आंदोलकांना अटक झाली आहे. पोलिसांनी सर्वांची छत्रपती प्रमिलाराजे (सीपीआर) रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. सीसीटीव्ही फुटेजवरून तोडफोड करणाºया आंदोलकांना पकडले जात आहे.कन्हैया कुमारच्या उपस्थितीत परिषद-पुणे : दलित महासंघाच्यावतीने जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता कन्हैया कुमार याच्या उपस्थितीत २८ जानेवारी रोजी ‘सावधान परिषदे’चे आयोजन करण्यात आल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष प्रा. मच्छिंद्र सकटे यांनी पत्रकारांना दिली. भीमा-कोरेगाव येथे दोन गटांत उद्भवलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मातंग समाजातील विविध संघटनांची बैठक आयोजित करण्यात आली होती. धर्मांध शक्तींपासून दलित समाजाला जागृत करण्यासाठी सावधान परिषदेचे आयोजन केल्याचे सकटे यांनी सांगितले. या परिषदेत लहुजी संघर्ष सेना, लहुजी महासंघ, दलित संघर्ष समिती, आ.ल.व.सा.फांऊडेशन, अखिल भारतीय बहुजन सेना, लहुजी स्मारक समिती संगमवाडी, दलित विकास आघाडीसह विविध संघटना भाग घेणार आहेत.प्रकाश आंबेडकरांविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची मागणी-सांगली : कोरेगाव-भीमा येथे आंबेडकरी अनुयायांवर झालेल्या हल्ल्यानंतर पुकारलेल्या ‘बंद’ला हिंसक वळण लागून त्यात एक-दोघांचा बळी गेल्याचा दावा शिवप्रतिष्ठानचे कार्यवाह नितीन चौगुले यांनी केला आहे. त्याप्रकरणी प्रकाश आंबेडकर यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. संभाजीराव भिडे यांच्याविरुद्धचे गुन्हे शासनाने सन्मानपूर्वक मागे घ्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.सरकार हमसे डरती है...पोलिसांनी धरपकड करताच, ‘सरकार हमसे डरती है, पुलीस को आगे करती है’ या घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. अटक झालेल्यांमध्ये प्रा. शेखर सोनाळकर, वासंती दीघे, गायत्री सोनवणे, मीराबाई सोनवणे, प्रतिभा शिरसाठ आदींचा समावेश आहे.कोरेगाव भीमा हिंसाचारामागे अदृश्य लोक - उद्धव ठाकरेमुंबई : अदृश्य लोक येतात आणि जातीपातीचे राजकारण करतात. जातीपातीचे राजकारण करत जो कोणी स्वत:ची पोळी भाजून घेणार असतील त्यांना शिवसेना सोडणार नाही. कोरेगाव-भीमा घडविणा-यांनी हिंमत असेल तर पुढे येऊन सांगावे असे आव्हान देतानाच राममंदिर बांधण्याची भाषा करणारे बाबरी मस्जिद पाडताना पळून का गेले, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी भाजपाला केला. चेंबूर येथे नव्याने उभारण्यात आलेल्या प्रवेशद्वाराच्या उद्घाटनप्रसंगी ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर सडकून टीका केली.

टॅग्स :Jalgaonजळगाव