शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

जैतापूर प्रकल्प राज्याला उद्ध्वस्त करणार!

By admin | Updated: April 30, 2015 01:53 IST

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प राज्याला उद्ध्वस्त करेल, असा आरोप जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पविरोधी जनहक्क सेवा समितीने केला.

मुंबई : जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प राज्याला उद्ध्वस्त करेल, असा आरोप जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पविरोधी जनहक्क सेवा समितीने केला. आपला दावा स्पष्ट करण्यासाठी समितीने काही पुरावेही समोर ठेवले. समितीने जैतापूर प्रकल्पाविरोधात मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रपरिषद घेतली. त्यात समितीचे निमंत्रक, पर्यावरण तज्ज्ञ गिरीश राऊत म्हणाले, की माहिती अधिकाराखाली अणुऊर्जा खात्याने समितीला काही महत्त्वपूर्ण अहवाल दिले आहेत. त्यात १९७२ सालच्या मार्गदर्शक सूचना देणाऱ्या चक्रवर्ती समितीचा अहवाल आहे. या अहवालात भूभ्रंशापासून ५ किलोमीटरच्या क्षेत्रात अणुभट्टी बांधता येणार नाही, अशी सूचना करण्यात आली आहे. मात्र २००२ सालच्या चतुर्वेदी समितीच्या स्थान निश्चिती संबंधी अहवालात याउलट परिस्थिती दिसते. चतुर्वेदी समितीच्या अहवालानुसार जेथे अणुभट्ट्या बांधल्या जाणार आहेत त्या माडबनच्या सड्यातूनच भूभ्रंश जात असल्याचे निदर्शनास येते. प्रकल्पाच्या स्थानापासून ५ किलोमीटर अंतराच्या आत आणखी दोन भूभ्रंश आहेत, असे ही कागदपत्रे सांगतात.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष असताना या प्रकल्पविरोधी मत प्रदर्शित केल्याची माहिती समितीचे कार्यकर्ते सत्यजित चव्हाण यांनी दिली. २०१३ साली झालेल्या चर्चेत खुद्द फडणवीस यांनी अमेरिकेतील सिनेट कमिटीच्या अध्यक्षांची भेट घेतल्याचे सांगितले होते. त्यात फडणवीस यांनी अध्यक्षांना अमेरिकेत १९७९ सालापासून अणुभट्टी बंद असल्याचे कारण विचारले होते. त्यावर पर्यावरणीय आणि आर्थिकदृष्ट्या अणुऊर्जा प्रकल्प देशाला घातक असल्याचे अध्यक्षांनी सांगितले होते. त्यामुळे विरोधी पक्षात असताना प्रकल्पविरोधी वक्तव्य करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी शांत राहणे वेगळाच संदेश देते, असे ते म्हणाले.डॉ. काकोडकरांचे वक्तव्य दिशाभूल करणारे ?जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला भूकंपाचे धक्के बसणार नाहीत, हे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांचे वक्तव्य दिशाभूल करणारे आहे, असा आरोपही समितीने केला. गेल्या २० वर्षांमध्ये प्रकल्पस्थळाला मध्यम व मोठ्या स्वरूपाचे ९३ धक्के बसल्याचा दावा समिती करते. ही माहिती अणुऊर्जा महामंडळाकडून (एनपीसीआयएल) मिळाल्याचे समितीने सांगितले. पश्चिम महाराष्ट्रालाही प्रकल्पाचा धोका : अणुऊर्जा प्रकल्पाचा धोका केवळ कोकणवासीयांना बसेल हा गैरसमज आहे. कोणताही अपघात झाल्यास अणुऊर्जा प्रकल्पापासून १०० कि़मी़ त्रिजेत येणाऱ्या परिसराला त्याचा तीव्र फटका बसेल. त्यात रत्नागिरी व सिंधुदुर्गसह कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांनाही झळ बसेल, असे समितीने सांगितले.