शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

जैतापूर प्रकल्प राज्याला उद्ध्वस्त करणार!

By admin | Updated: April 30, 2015 01:53 IST

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प राज्याला उद्ध्वस्त करेल, असा आरोप जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पविरोधी जनहक्क सेवा समितीने केला.

मुंबई : जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प राज्याला उद्ध्वस्त करेल, असा आरोप जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पविरोधी जनहक्क सेवा समितीने केला. आपला दावा स्पष्ट करण्यासाठी समितीने काही पुरावेही समोर ठेवले. समितीने जैतापूर प्रकल्पाविरोधात मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रपरिषद घेतली. त्यात समितीचे निमंत्रक, पर्यावरण तज्ज्ञ गिरीश राऊत म्हणाले, की माहिती अधिकाराखाली अणुऊर्जा खात्याने समितीला काही महत्त्वपूर्ण अहवाल दिले आहेत. त्यात १९७२ सालच्या मार्गदर्शक सूचना देणाऱ्या चक्रवर्ती समितीचा अहवाल आहे. या अहवालात भूभ्रंशापासून ५ किलोमीटरच्या क्षेत्रात अणुभट्टी बांधता येणार नाही, अशी सूचना करण्यात आली आहे. मात्र २००२ सालच्या चतुर्वेदी समितीच्या स्थान निश्चिती संबंधी अहवालात याउलट परिस्थिती दिसते. चतुर्वेदी समितीच्या अहवालानुसार जेथे अणुभट्ट्या बांधल्या जाणार आहेत त्या माडबनच्या सड्यातूनच भूभ्रंश जात असल्याचे निदर्शनास येते. प्रकल्पाच्या स्थानापासून ५ किलोमीटर अंतराच्या आत आणखी दोन भूभ्रंश आहेत, असे ही कागदपत्रे सांगतात.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष असताना या प्रकल्पविरोधी मत प्रदर्शित केल्याची माहिती समितीचे कार्यकर्ते सत्यजित चव्हाण यांनी दिली. २०१३ साली झालेल्या चर्चेत खुद्द फडणवीस यांनी अमेरिकेतील सिनेट कमिटीच्या अध्यक्षांची भेट घेतल्याचे सांगितले होते. त्यात फडणवीस यांनी अध्यक्षांना अमेरिकेत १९७९ सालापासून अणुभट्टी बंद असल्याचे कारण विचारले होते. त्यावर पर्यावरणीय आणि आर्थिकदृष्ट्या अणुऊर्जा प्रकल्प देशाला घातक असल्याचे अध्यक्षांनी सांगितले होते. त्यामुळे विरोधी पक्षात असताना प्रकल्पविरोधी वक्तव्य करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी शांत राहणे वेगळाच संदेश देते, असे ते म्हणाले.डॉ. काकोडकरांचे वक्तव्य दिशाभूल करणारे ?जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला भूकंपाचे धक्के बसणार नाहीत, हे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांचे वक्तव्य दिशाभूल करणारे आहे, असा आरोपही समितीने केला. गेल्या २० वर्षांमध्ये प्रकल्पस्थळाला मध्यम व मोठ्या स्वरूपाचे ९३ धक्के बसल्याचा दावा समिती करते. ही माहिती अणुऊर्जा महामंडळाकडून (एनपीसीआयएल) मिळाल्याचे समितीने सांगितले. पश्चिम महाराष्ट्रालाही प्रकल्पाचा धोका : अणुऊर्जा प्रकल्पाचा धोका केवळ कोकणवासीयांना बसेल हा गैरसमज आहे. कोणताही अपघात झाल्यास अणुऊर्जा प्रकल्पापासून १०० कि़मी़ त्रिजेत येणाऱ्या परिसराला त्याचा तीव्र फटका बसेल. त्यात रत्नागिरी व सिंधुदुर्गसह कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांनाही झळ बसेल, असे समितीने सांगितले.