शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

जैतापूरचा झटका कोणाला?

By admin | Updated: October 8, 2014 23:03 IST

राजापूर मतदार संघ : प्रकल्पग्रस्त कोणाच्या बाजूने झुकणार हा प्रश्नच

राजापूर : प्रखर विरोधानंतर केंद्रात सत्ता आल्यानंतरदेखील जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प रद्द करण्यात सेनेला आलेले अपयश, भाजपने त्या प्रकल्पाचे केलेले जाहीर समर्थन, समस्त मच्छीमारांच्या प्रकल्पविरोधी तीव्र भावना असतानादेखील त्यांचे नेते अमजद बोरकर यांनी केलेला भाजप प्रवेश तर आपली मूळ भूमिका कशी योग्य होती ते ठासून सांगण्याचा प्रयत्न करणारी काँग्रेस व राष्ट्रवादी, यामुळे देवाचे गोठणे व सागवे जिल्हा परिषद गटातील मतदार राजा यावेळी कुणाच्या पारड्यात मतदान करणार याला महत्व आले आहे.देशातील सर्वात मोठा १० हजार मेगावॅट अणुऊर्जा निर्मिती करणारा प्रकल्प जैतापूर परिसरात आला असून या प्रकल्पामुळे परिसरातील बागायती, शेती, मच्छीमारीवर विपरीत परिणाम होवून ती नष्ट होतील. या भीतीस्तव स्थानिक जनता मागील काही वर्षे कडाडून संघर्ष करत असून शिवसेनेने याच मुद्द्यावर रान पेटवत अनेक आंदोलन उभारली. त्यामुळे तालुक्यातील दोन्ही जिल्हा परिषद गट सेनेच्या पाठीशी राहिले. त्या बळावर सेनेने अनेक निवडणुकीत बाजी मारत विरोधकांना पराभूत केले होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार विनायक राऊत यांना या दोन्ही विभागांनी दणदणीत मताधिक्य दिले. मात्र त्यानंतर चार महिन्याचा कालावधी लोटला तरी शिवसेनेला केंद्रात सत्ता मिळूनही जैतापूर प्रकल्प रद्द करता आलेला नाही, हे वास्तव अधोरेखित ठरले आहे. राज्यात सेना भाजप युती तुटली असली तरी केंद्रातील सत्तेतून शिवसेना अद्याप बाहेर पडलेली नाही आणि प्रकल्पदेखील रद्द झालेला नाही. त्यामुळे इथले मतदार सेनेवर आणखी एक विश्वास दाखवतात का? हा महत्वाचा मुद्दा आहे.शिवसेनेने आजही प्रकल्प रद्द व्हावा, अशी भूमिका घेतली असतानाच सेनेचा मित्रपक्ष राहिलेल्या भाजपने मात्र केंद्रात सत्ता येताच जैतापूर प्रकल्पाचे समर्थन केल्यामुळे स्वतंत्रपणे लढणाऱ्या भाजपच्या उमेदवाराच्या पाठी इथला मतदार किती रहातो, हे निकालात स्पष्ट होईल. भाजपच्या भूमिकेबाबत मच्छीमारांना काय वाटते, हे १९ आॅक्टोबरला भाजप उमेदवाराला मिळणाऱ्या मतांवरुन स्पष्ट होणार आहे.युतीमधील सुंदोपसुंदीच्या पार्श्वभूमीवर जैतापुरात प्रकल्प आणणारी काँग्रेस व राष्ट्रवादी मात्र आपली त्यावेळची भूमिका कशी योग्य होती व सेनेने प्रकल्पग्रस्तांना कसे फसवले, ते आता ठासून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर इथला मतदार कोणती भूमिका घेतो त्यावरच प्रत्येक उमेदवाराला मिळणारी मते व विजयाकडे वाटचाल करताना लागणारे मताधिक्य यांची गणिते ठरणार आहेत. (प्रतिनिधी)भाजपचे प्रकल्पाला समर्थन असतानादेखील साखरीनाटेतील मच्छीमार नेते अमजद बोरकर यांनी रत्नागिरीतील भाजपच्या जाहीर प्रचारसभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यामुळे प्रेरित होऊन आपण भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जैतापूर प्रकल्पाला कडाडून विरोध करणाऱ्या मच्छीमार बांधवांचे नेतृत्व हे बोरकर करतात. केंद्र सरकार प्रकल्पाला समर्थन देत असतानादेखील बोरकर यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटले आहे.