शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
3
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
4
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
5
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
6
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
7
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
8
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?
9
धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं
10
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
11
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
12
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
13
लोकांची उष्टी भांडी घासून गरीब वडिलांनी शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; आता होणार डॉक्टर
14
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
15
Jaipur Couple Video: रोमान्समध्ये इतके झाले तल्लीन की..., जयपूरमधील कपलचा हॉटेलमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल
16
ENG vs IND : मॅच आधी एक मिनिटाचे मौन! टीम इंडियासह इंग्लंडचे खेळाडू काळी पट्टी बांधून उतरले मैदानात (VIDEO)
17
Mumbai Local Fight: मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
18
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
19
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
20
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं

जव्हारच्या जयसागर धरणाचे झाले नूतनीकरण

By admin | Updated: July 12, 2017 03:08 IST

भाद्रपद शुद्ध ४ शके १८८३ श्री गणेश चतुर्थी, दिनांक १४ सप्टेंबर १९६१ रोजी जव्हारचे राजे नरेश श्रीमंत यशवंतराव मुकणे राजे साहेब यांचे शुभहस्ते झाले होते.

हुसेन मेमन । लोकमत न्यूज नेटवर्कजव्हार : गेली ५३ वर्षे जव्हारकरांची तृष्णा भागवत असलेल्या जयसागर धरणाचे उदघाटन भाद्रपद शुद्ध ४ शके १८८३ श्री गणेश चतुर्थी, दिनांक १४ सप्टेंबर १९६१ रोजी जव्हारचे राजे नरेश श्रीमंत यशवंतराव मुकणे राजे साहेब यांचे शुभहस्ते झाले होते. आणि जव्हारकरांची पिण्याच्या पाण्यासाठीची पायपीट थांबली. त्यावेळेच्या ६ हजार लोकसंख्यसाठी बांधण्यात आलेले धारण असल्याने वाढत्या जव्हार शहरातील लोकसंख्येसाठी चिंतेची बाब बनत चालली होती. हे लक्षात घेवून जव्हार नगरपरिषदेने जय सागर धरणाचे नूतनीकरण करून पाणीसाठा वाढविण्यात आला आहे. त्यामुळे या जव्हार शहरातील जय सागर धरणावर पर्यटकांची गर्दी होतांना दिसत आहे. जव्हारच्या शहराला लागुनच १ कि.मी. अंतरावर झरिपा नावाचा, अनेक जिवंत झरे असलेल्या नाल्यावर हे धरण बांधण्यात आले आहे. तो ४०० फुट लांब व सुमारे ६० ते ६५ फुट उंचीचे हे धरण आहे. जव्हारच्या विकासाच्या व नागरी सुविधांच्या विविध संकल्पनांसह जनतेच्या पिण्याच्या पाण्याच्या सोयीसाठी धरण असावे असे स्वप्न जव्हार नरेश श्रीमंत यशवंतराव मुकणे राजे साहेब यांचे होते. हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी १० जून १९४८ साली जव्हार संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करतांना त्यांनी धरण बांधणेसाठी रु .५ लक्ष एवढा निधी राखून ठेवला व तो जव्हार नगरपालिकेकडे सुपूर्द केला होता. पुढे महाराष्ट्र शासनाने आवश्यक असलेला उर्विरत रु . ७,२७,१५८.०० इतका निधी धरण बांधणे कामी उपलब्ध करून दिला होता. जि.प. व जव्हार नगरपरिषदेच्या सहकार्याने जयसागर धरणला लागून असलेल्या गार्डनचे नूतनीकरण करण्यात आले असून जयसागर धरणाला जाण्यासाठी रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. धरणाजवळ असलेल्या गार्डनमध्ये नवीन गवताळ लावले असून, खुला रंगमंच, धरणामगील दरी बघण्यासाठी रेलिंग ही लावण्यात आले आहे, तसेच बच्चे कंपनी साठी खेळणी ही लावण्यात आली आहे. जयसागर धरणाचे नूतनीकरण केल्यामुळे नागरिक मोठया प्रमाणात धरणाला भेट देत आहेत. नूतनीकरण केल्यामुळे धरणाचा परिसर अत्यंत सुंदर झाला आहे.- पारस संजय सहाणे, पर्यटनप्रेमी, जव्हार.जयसागर धरण बागेचे नूतनीकरण झाले.