शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

जव्हारच्या जयसागर धरणाचे झाले नूतनीकरण

By admin | Updated: July 12, 2017 03:08 IST

भाद्रपद शुद्ध ४ शके १८८३ श्री गणेश चतुर्थी, दिनांक १४ सप्टेंबर १९६१ रोजी जव्हारचे राजे नरेश श्रीमंत यशवंतराव मुकणे राजे साहेब यांचे शुभहस्ते झाले होते.

हुसेन मेमन । लोकमत न्यूज नेटवर्कजव्हार : गेली ५३ वर्षे जव्हारकरांची तृष्णा भागवत असलेल्या जयसागर धरणाचे उदघाटन भाद्रपद शुद्ध ४ शके १८८३ श्री गणेश चतुर्थी, दिनांक १४ सप्टेंबर १९६१ रोजी जव्हारचे राजे नरेश श्रीमंत यशवंतराव मुकणे राजे साहेब यांचे शुभहस्ते झाले होते. आणि जव्हारकरांची पिण्याच्या पाण्यासाठीची पायपीट थांबली. त्यावेळेच्या ६ हजार लोकसंख्यसाठी बांधण्यात आलेले धारण असल्याने वाढत्या जव्हार शहरातील लोकसंख्येसाठी चिंतेची बाब बनत चालली होती. हे लक्षात घेवून जव्हार नगरपरिषदेने जय सागर धरणाचे नूतनीकरण करून पाणीसाठा वाढविण्यात आला आहे. त्यामुळे या जव्हार शहरातील जय सागर धरणावर पर्यटकांची गर्दी होतांना दिसत आहे. जव्हारच्या शहराला लागुनच १ कि.मी. अंतरावर झरिपा नावाचा, अनेक जिवंत झरे असलेल्या नाल्यावर हे धरण बांधण्यात आले आहे. तो ४०० फुट लांब व सुमारे ६० ते ६५ फुट उंचीचे हे धरण आहे. जव्हारच्या विकासाच्या व नागरी सुविधांच्या विविध संकल्पनांसह जनतेच्या पिण्याच्या पाण्याच्या सोयीसाठी धरण असावे असे स्वप्न जव्हार नरेश श्रीमंत यशवंतराव मुकणे राजे साहेब यांचे होते. हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी १० जून १९४८ साली जव्हार संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करतांना त्यांनी धरण बांधणेसाठी रु .५ लक्ष एवढा निधी राखून ठेवला व तो जव्हार नगरपालिकेकडे सुपूर्द केला होता. पुढे महाराष्ट्र शासनाने आवश्यक असलेला उर्विरत रु . ७,२७,१५८.०० इतका निधी धरण बांधणे कामी उपलब्ध करून दिला होता. जि.प. व जव्हार नगरपरिषदेच्या सहकार्याने जयसागर धरणला लागून असलेल्या गार्डनचे नूतनीकरण करण्यात आले असून जयसागर धरणाला जाण्यासाठी रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. धरणाजवळ असलेल्या गार्डनमध्ये नवीन गवताळ लावले असून, खुला रंगमंच, धरणामगील दरी बघण्यासाठी रेलिंग ही लावण्यात आले आहे, तसेच बच्चे कंपनी साठी खेळणी ही लावण्यात आली आहे. जयसागर धरणाचे नूतनीकरण केल्यामुळे नागरिक मोठया प्रमाणात धरणाला भेट देत आहेत. नूतनीकरण केल्यामुळे धरणाचा परिसर अत्यंत सुंदर झाला आहे.- पारस संजय सहाणे, पर्यटनप्रेमी, जव्हार.जयसागर धरण बागेचे नूतनीकरण झाले.