शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

७५व्या वर्षी सासूला तुरुंगवास

By admin | Updated: January 23, 2015 02:07 IST

हुंड्यासाठी छळ करून सुनेला लग्नानंतर अवघ्या आठ महिन्यांत जाळून घेऊन आत्महत्या करण्यास भाग पाडणारी सासू जराही दया दाखविण्यास पात्र नाही,

मुंबई : हुंड्यासाठी छळ करून सुनेला लग्नानंतर अवघ्या आठ महिन्यांत जाळून घेऊन आत्महत्या करण्यास भाग पाडणारी सासू जराही दया दाखविण्यास पात्र नाही, असे ठाममणे सांगत सर्वोच्च न्यायालयाने कोल्हापूर जिल्ह्याच्या इचलकरंजी तालुक्यातील एका महिलेची वयाच्या ७५व्या वर्षी तुरुंगात रवानगी केली.जवाहरनगर, कबनूर येथील ताराबाई गंगाधर तरळकर हिचे अपील फेटाळताना सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. फकीर मोहम्मद इब्राहीम कलिफुल्ला व न्या. अभय मनोहर सप्रे यांच्या खंडपीठाने असेही नमूद केले की, सुनेने जाळून घेऊन आत्महत्या करण्यास ताराबाई हिच सर्वस्वी जबाबदार आहे, हे सप्रमाण सिद्ध झाल्याने, वयाचा विचार करून तिला दया दाखविण्याचे काहीच कारण नाही. उलट गुन्हा एवढा गंभीर असूनही फक्त सात वर्षांच्या साध्या कैदेची शिक्षा झाली याबद्दल ताराबाईने स्वत:ला नशिबवान मानायला हवे!वयाच्या अवघ्या विशीत असलेल्या सूनेने सासूच्या छळाला कंटाळून लग्नानंतर केवळ आठच महिन्यांत स्वत:ला जाळून घ्यावे ही मन विषण्ण करणारी घटना आहे. अशा प्रवृत्तींचा कठोरपणे बीमोड व्हायलाच हवा, असेही न्यायालयाने ठामपणे म्हटले. भगवान आणि मालू ढवळे यांची कन्या असलेल्या कृष्णाबाईचे कबनूर येथील हणमंत तरळकर याच्याशी १२ मे १९८९ रोजी लग्न झाले. तिच्या सासरी पतीखेरीज सासू ताराबाई, सासरे गंगाधर आणि १८ वर्षांची नणंद बाळाबाई असे लोक होते. लग्न होऊन आल्यापासून ताराबाईने, लग्नात माहेरहून सोनेनाणे, कपडे, पैसे वगैरे काहीही आणले नाही यावरून, कृष्णाबाईचा सतत शारीरिक व मानसिक छळ सुरू केला होता.सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा कामयराहत्या घरात १०० टक्के भाजल्याने सून कृष्णाबाई हिचा मृत्यू झाला तेव्हा (२३ मार्च १९९०) ताराबाई सुमारे ५० वर्षांची होती. कोल्हापूर सत्र न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयानंतर आता सर्वोच्च न्यायालयानेही सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा कायम केल्याने ताराबाईला आता शिक्षा भोगण्यासाठी वयाच्या ७५व्या वर्षी तुरुंगात जावे लागेल. सासऱ्याची साक्ष नाही : खरेतर त्या दिवशी घरात जे काही घडले ते कृष्णाबाईचे सासरे गंगाधर यांनी पाहिले होते. पण अभियोग पक्षाने किंवा आरोपी ताराबाईनेही त्यांना साक्षीदार म्हणून उभे केले नाही. ताराबाईचे बचावाचे अनेक मुद्दे फेटाळताना न्यायालयाने नेमके यावरच बोट ठेवले.