शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

“सबका साथ, सबका विकासातून PM मोदी सरकारने भारताची मान जगात उंचावली”

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2022 10:22 IST

मोदी सरकारच्या धोरणांमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरही भारताची प्रतिमा बलशाली राष्ट्र अशी तयार झाली, या शब्दांत भाजप नेत्याने कौतुक केले आहे.

सोलापूर: केंद्रातील मोदी सरकारला ८ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजप देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करत आहे. मोदी सरकारच्या योजना, काम, धोरणे, कार्यक्रम देशवासीयांपर्यंत या माध्यमातून पोहोचवला जात आहे. मोदी सरकारच्या ८ वर्षांच्या कामगिरीवर विरोधकांनी सडकून टीका केलेली असली तरी, भाजपचे नेते मात्र पंतप्रधान मोदी आणि मोदी सरकारच्या सुशासनाचे गोडवे गाताना दिसत आहेत. अशातच एका भाजप खासदारांनी पंतप्रधान मोदींच्या कार्याचे कौतुक करत, मोदी सरकारच्या कमाल कामगिरीमुळे भारताची मान जगात उंचावल्याचे म्हटले आहे. 

मोदी सरकारच्या लोककल्याणकारी कार्यक्रमामुळे शोषित, वंचितांना दिलासा मिळाला आणि जगात भारताची मान उंचावल्याचा दावा सोलापूरचे भाजपाचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी केला. केंद्रातील मोदी सरकारच्या आठ वर्षांच्या कारभाराचा आढावा सादर करण्यासाठी सोलापूर शहर जिल्हा भाजपने आयोजिलेल्या पत्रकार परिषदेत खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य यांनी मोदी सरकारच्या कामांची प्रशंसा केली. 

गोरगरीब आणि वंचितांना आधार मिळाला 

कोरोना प्रादुर्भावाच्या काळात ८० कोटी जनतेला मोफत अन्नधान्य, ९ कोटी महिलांना मोफत स्वयंपाक गॅस जोडणी, कोटीपेक्षा अधिक लोकांना मालकीची घरे, ४१ कोटींहून अधिक जनधन खाती यांसारख्या योजनांतून मोदी सरकारने लोककल्याण कार्यक्रम प्रभावीपणे आखले आहेत. त्यामुळे गोरगरीब आणि वंचितांना आधार मिळाला आहे. जनमानसात पंतप्रधान मोदी यांची लोकप्रियता कायम असून यापुढेही कायम राहणार असल्याचे जयसिद्धेश्वर स्वामी म्हणाले. 

जागतिक पातळीवर भारताची ताकद वाढली

सब का साथ, सब का विकास, सब का विश्वास आणि सब का प्रयास हा मंत्र घेऊन मोदी सरकारने गेल्या आठ वर्षांत अंत्योदय आणि एकात्म मानववादाला केंद्रस्थानी ठेवत गोरगरिबांच्या कल्याणाच्या अनेक योजना प्रत्यक्षात आणल्या. त्याचबरोबर देशांतर्गत सुरक्षा मजबूत करणे, दहशतवादी शक्तींना त्याच भाषेत उत्तर देण्याचे कणखर धोरण यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरही भारताची प्रतिमा बलशाली राष्ट्र अशी तयार झाली असून जागतिक पातळीवर भारताची ताकद वाढल्याचे स्वामी यांनी नमूद केले. 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदीSolapurसोलापूर