शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

“सबका साथ, सबका विकासातून PM मोदी सरकारने भारताची मान जगात उंचावली”

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2022 10:22 IST

मोदी सरकारच्या धोरणांमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरही भारताची प्रतिमा बलशाली राष्ट्र अशी तयार झाली, या शब्दांत भाजप नेत्याने कौतुक केले आहे.

सोलापूर: केंद्रातील मोदी सरकारला ८ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजप देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करत आहे. मोदी सरकारच्या योजना, काम, धोरणे, कार्यक्रम देशवासीयांपर्यंत या माध्यमातून पोहोचवला जात आहे. मोदी सरकारच्या ८ वर्षांच्या कामगिरीवर विरोधकांनी सडकून टीका केलेली असली तरी, भाजपचे नेते मात्र पंतप्रधान मोदी आणि मोदी सरकारच्या सुशासनाचे गोडवे गाताना दिसत आहेत. अशातच एका भाजप खासदारांनी पंतप्रधान मोदींच्या कार्याचे कौतुक करत, मोदी सरकारच्या कमाल कामगिरीमुळे भारताची मान जगात उंचावल्याचे म्हटले आहे. 

मोदी सरकारच्या लोककल्याणकारी कार्यक्रमामुळे शोषित, वंचितांना दिलासा मिळाला आणि जगात भारताची मान उंचावल्याचा दावा सोलापूरचे भाजपाचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी केला. केंद्रातील मोदी सरकारच्या आठ वर्षांच्या कारभाराचा आढावा सादर करण्यासाठी सोलापूर शहर जिल्हा भाजपने आयोजिलेल्या पत्रकार परिषदेत खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य यांनी मोदी सरकारच्या कामांची प्रशंसा केली. 

गोरगरीब आणि वंचितांना आधार मिळाला 

कोरोना प्रादुर्भावाच्या काळात ८० कोटी जनतेला मोफत अन्नधान्य, ९ कोटी महिलांना मोफत स्वयंपाक गॅस जोडणी, कोटीपेक्षा अधिक लोकांना मालकीची घरे, ४१ कोटींहून अधिक जनधन खाती यांसारख्या योजनांतून मोदी सरकारने लोककल्याण कार्यक्रम प्रभावीपणे आखले आहेत. त्यामुळे गोरगरीब आणि वंचितांना आधार मिळाला आहे. जनमानसात पंतप्रधान मोदी यांची लोकप्रियता कायम असून यापुढेही कायम राहणार असल्याचे जयसिद्धेश्वर स्वामी म्हणाले. 

जागतिक पातळीवर भारताची ताकद वाढली

सब का साथ, सब का विकास, सब का विश्वास आणि सब का प्रयास हा मंत्र घेऊन मोदी सरकारने गेल्या आठ वर्षांत अंत्योदय आणि एकात्म मानववादाला केंद्रस्थानी ठेवत गोरगरिबांच्या कल्याणाच्या अनेक योजना प्रत्यक्षात आणल्या. त्याचबरोबर देशांतर्गत सुरक्षा मजबूत करणे, दहशतवादी शक्तींना त्याच भाषेत उत्तर देण्याचे कणखर धोरण यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरही भारताची प्रतिमा बलशाली राष्ट्र अशी तयार झाली असून जागतिक पातळीवर भारताची ताकद वाढल्याचे स्वामी यांनी नमूद केले. 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदीSolapurसोलापूर