शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

“सबका साथ, सबका विकासातून PM मोदी सरकारने भारताची मान जगात उंचावली”

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2022 10:22 IST

मोदी सरकारच्या धोरणांमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरही भारताची प्रतिमा बलशाली राष्ट्र अशी तयार झाली, या शब्दांत भाजप नेत्याने कौतुक केले आहे.

सोलापूर: केंद्रातील मोदी सरकारला ८ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजप देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करत आहे. मोदी सरकारच्या योजना, काम, धोरणे, कार्यक्रम देशवासीयांपर्यंत या माध्यमातून पोहोचवला जात आहे. मोदी सरकारच्या ८ वर्षांच्या कामगिरीवर विरोधकांनी सडकून टीका केलेली असली तरी, भाजपचे नेते मात्र पंतप्रधान मोदी आणि मोदी सरकारच्या सुशासनाचे गोडवे गाताना दिसत आहेत. अशातच एका भाजप खासदारांनी पंतप्रधान मोदींच्या कार्याचे कौतुक करत, मोदी सरकारच्या कमाल कामगिरीमुळे भारताची मान जगात उंचावल्याचे म्हटले आहे. 

मोदी सरकारच्या लोककल्याणकारी कार्यक्रमामुळे शोषित, वंचितांना दिलासा मिळाला आणि जगात भारताची मान उंचावल्याचा दावा सोलापूरचे भाजपाचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी केला. केंद्रातील मोदी सरकारच्या आठ वर्षांच्या कारभाराचा आढावा सादर करण्यासाठी सोलापूर शहर जिल्हा भाजपने आयोजिलेल्या पत्रकार परिषदेत खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य यांनी मोदी सरकारच्या कामांची प्रशंसा केली. 

गोरगरीब आणि वंचितांना आधार मिळाला 

कोरोना प्रादुर्भावाच्या काळात ८० कोटी जनतेला मोफत अन्नधान्य, ९ कोटी महिलांना मोफत स्वयंपाक गॅस जोडणी, कोटीपेक्षा अधिक लोकांना मालकीची घरे, ४१ कोटींहून अधिक जनधन खाती यांसारख्या योजनांतून मोदी सरकारने लोककल्याण कार्यक्रम प्रभावीपणे आखले आहेत. त्यामुळे गोरगरीब आणि वंचितांना आधार मिळाला आहे. जनमानसात पंतप्रधान मोदी यांची लोकप्रियता कायम असून यापुढेही कायम राहणार असल्याचे जयसिद्धेश्वर स्वामी म्हणाले. 

जागतिक पातळीवर भारताची ताकद वाढली

सब का साथ, सब का विकास, सब का विश्वास आणि सब का प्रयास हा मंत्र घेऊन मोदी सरकारने गेल्या आठ वर्षांत अंत्योदय आणि एकात्म मानववादाला केंद्रस्थानी ठेवत गोरगरिबांच्या कल्याणाच्या अनेक योजना प्रत्यक्षात आणल्या. त्याचबरोबर देशांतर्गत सुरक्षा मजबूत करणे, दहशतवादी शक्तींना त्याच भाषेत उत्तर देण्याचे कणखर धोरण यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरही भारताची प्रतिमा बलशाली राष्ट्र अशी तयार झाली असून जागतिक पातळीवर भारताची ताकद वाढल्याचे स्वामी यांनी नमूद केले. 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदीSolapurसोलापूर